शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

Lok Sabha Election 2019; सर्वदूर उत्सव पण आजंती शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:28 IST

मागील ४० वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या नेर तालुक्यातील आजंती येथील मतदारांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. एक हजार १८९९ पैकी १७० लोकांनी मतदान केले.

ठळक मुद्देमतदानावर बहिष्कार : पाणी प्रश्नाने त्रस्त नागरिकांचा रोष, प्रशासनाने निवेदन अडगळीत टाकले

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : मागील ४० वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या नेर तालुक्यातील आजंती येथील मतदारांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. एक हजार १८९९ पैकी १७० लोकांनी मतदान केले. दिवसभर पाण्याच्या शोधात बाहेर पडणारे महिलांचे पाय आज मात्र मतदानाच्यावेळी घरातच अडखळून पडले. या गावातील मतदान केंद्रावर सन्नाटा होता.गावातील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना तकलादू ठरल्या. दरवर्षी जानेवारी महिन्यातच गावातील जलस्रोत आटायला सुरू होते. एप्रिल आणि मे महिन्यात तर महिलांना रात्रंदिवस पाण्याचाच वेध असतो. बैलबंडीने दूर शेतातून पाणी आणावे लागते. पाणीटंचाईमुळे गावात विवाह समारंभ होत नाही. शहरातील खर्चिक अशा मंगल कार्यालयात जाऊन कार्यप्रसंग पार पाडावे लागतात.गतवर्षी गावातील महिलांनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले होते. यावर कुठलेही सकारात्मक पाऊल उचललेले नाही. गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला. सर्वांनीच याला समर्थन दिले. याविषयीचे निवेदन तहसील विभागाला देण्यात आले होते. याची दखल घेण्यात आली नाही. अखेर हा इशारा प्रत्यक्षात उतरविण्यात आला. या गावातील मतदान केंद्राच्या रस्त्यावर सकाळपासूनच शुकशुकाट होता. परिणामी तालुक्यात अल्प मतदानाची टक्केवारी आजंती येथील मतदान केंद्रावर पाहायला मिळाली. मात्र गावातील दुसºया गटाने मतदान करून या बहिष्काराला खो दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.नागरिकांनी नोंदविल्या तीव्र भावनामतदानावर बहिष्कार टाकताना या गावातील नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सुनीता श्रृंगारे यांच्या पतीचे गतवर्षी अपघाती निधन झाले. पाणी समस्या मांडण्यासाठी ते गेले होते. परतत असताना रेती तस्करीच्या ट्रकने त्यांचा जीव घेतला. त्यांनी प्रशासनाविषयी आपला रोष व्यक्त केला. कुसूमताई साबळे, राखी नीलेश जुनघरे, सतीश अरसोड, रमेश गायकवाड, नेर बाजार समितीचे उपसभापती दिवाकर राठोड, रेखा विजयकार आदी नागरिकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. प्रत्येक वर्षी पाण्यासाठी हाल सहन करावे लागत असेल तर मतदान कशाला करायचे, असा प्रश्न या गावातील लोकांनी मांडला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019