शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; सर्वदूर उत्सव पण आजंती शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:28 IST

मागील ४० वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या नेर तालुक्यातील आजंती येथील मतदारांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. एक हजार १८९९ पैकी १७० लोकांनी मतदान केले.

ठळक मुद्देमतदानावर बहिष्कार : पाणी प्रश्नाने त्रस्त नागरिकांचा रोष, प्रशासनाने निवेदन अडगळीत टाकले

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : मागील ४० वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या नेर तालुक्यातील आजंती येथील मतदारांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. एक हजार १८९९ पैकी १७० लोकांनी मतदान केले. दिवसभर पाण्याच्या शोधात बाहेर पडणारे महिलांचे पाय आज मात्र मतदानाच्यावेळी घरातच अडखळून पडले. या गावातील मतदान केंद्रावर सन्नाटा होता.गावातील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना तकलादू ठरल्या. दरवर्षी जानेवारी महिन्यातच गावातील जलस्रोत आटायला सुरू होते. एप्रिल आणि मे महिन्यात तर महिलांना रात्रंदिवस पाण्याचाच वेध असतो. बैलबंडीने दूर शेतातून पाणी आणावे लागते. पाणीटंचाईमुळे गावात विवाह समारंभ होत नाही. शहरातील खर्चिक अशा मंगल कार्यालयात जाऊन कार्यप्रसंग पार पाडावे लागतात.गतवर्षी गावातील महिलांनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले होते. यावर कुठलेही सकारात्मक पाऊल उचललेले नाही. गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला. सर्वांनीच याला समर्थन दिले. याविषयीचे निवेदन तहसील विभागाला देण्यात आले होते. याची दखल घेण्यात आली नाही. अखेर हा इशारा प्रत्यक्षात उतरविण्यात आला. या गावातील मतदान केंद्राच्या रस्त्यावर सकाळपासूनच शुकशुकाट होता. परिणामी तालुक्यात अल्प मतदानाची टक्केवारी आजंती येथील मतदान केंद्रावर पाहायला मिळाली. मात्र गावातील दुसºया गटाने मतदान करून या बहिष्काराला खो दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.नागरिकांनी नोंदविल्या तीव्र भावनामतदानावर बहिष्कार टाकताना या गावातील नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सुनीता श्रृंगारे यांच्या पतीचे गतवर्षी अपघाती निधन झाले. पाणी समस्या मांडण्यासाठी ते गेले होते. परतत असताना रेती तस्करीच्या ट्रकने त्यांचा जीव घेतला. त्यांनी प्रशासनाविषयी आपला रोष व्यक्त केला. कुसूमताई साबळे, राखी नीलेश जुनघरे, सतीश अरसोड, रमेश गायकवाड, नेर बाजार समितीचे उपसभापती दिवाकर राठोड, रेखा विजयकार आदी नागरिकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. प्रत्येक वर्षी पाण्यासाठी हाल सहन करावे लागत असेल तर मतदान कशाला करायचे, असा प्रश्न या गावातील लोकांनी मांडला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019