शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

Lok Sabha Election 2019; सर्वदूर उत्सव पण आजंती शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:28 IST

मागील ४० वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या नेर तालुक्यातील आजंती येथील मतदारांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. एक हजार १८९९ पैकी १७० लोकांनी मतदान केले.

ठळक मुद्देमतदानावर बहिष्कार : पाणी प्रश्नाने त्रस्त नागरिकांचा रोष, प्रशासनाने निवेदन अडगळीत टाकले

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : मागील ४० वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या नेर तालुक्यातील आजंती येथील मतदारांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. एक हजार १८९९ पैकी १७० लोकांनी मतदान केले. दिवसभर पाण्याच्या शोधात बाहेर पडणारे महिलांचे पाय आज मात्र मतदानाच्यावेळी घरातच अडखळून पडले. या गावातील मतदान केंद्रावर सन्नाटा होता.गावातील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना तकलादू ठरल्या. दरवर्षी जानेवारी महिन्यातच गावातील जलस्रोत आटायला सुरू होते. एप्रिल आणि मे महिन्यात तर महिलांना रात्रंदिवस पाण्याचाच वेध असतो. बैलबंडीने दूर शेतातून पाणी आणावे लागते. पाणीटंचाईमुळे गावात विवाह समारंभ होत नाही. शहरातील खर्चिक अशा मंगल कार्यालयात जाऊन कार्यप्रसंग पार पाडावे लागतात.गतवर्षी गावातील महिलांनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले होते. यावर कुठलेही सकारात्मक पाऊल उचललेले नाही. गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला. सर्वांनीच याला समर्थन दिले. याविषयीचे निवेदन तहसील विभागाला देण्यात आले होते. याची दखल घेण्यात आली नाही. अखेर हा इशारा प्रत्यक्षात उतरविण्यात आला. या गावातील मतदान केंद्राच्या रस्त्यावर सकाळपासूनच शुकशुकाट होता. परिणामी तालुक्यात अल्प मतदानाची टक्केवारी आजंती येथील मतदान केंद्रावर पाहायला मिळाली. मात्र गावातील दुसºया गटाने मतदान करून या बहिष्काराला खो दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.नागरिकांनी नोंदविल्या तीव्र भावनामतदानावर बहिष्कार टाकताना या गावातील नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सुनीता श्रृंगारे यांच्या पतीचे गतवर्षी अपघाती निधन झाले. पाणी समस्या मांडण्यासाठी ते गेले होते. परतत असताना रेती तस्करीच्या ट्रकने त्यांचा जीव घेतला. त्यांनी प्रशासनाविषयी आपला रोष व्यक्त केला. कुसूमताई साबळे, राखी नीलेश जुनघरे, सतीश अरसोड, रमेश गायकवाड, नेर बाजार समितीचे उपसभापती दिवाकर राठोड, रेखा विजयकार आदी नागरिकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. प्रत्येक वर्षी पाण्यासाठी हाल सहन करावे लागत असेल तर मतदान कशाला करायचे, असा प्रश्न या गावातील लोकांनी मांडला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019