शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

लोकसभा-विधानसभा; काँग्रेसचे उमेदवार ठरणार बूथवरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 14:18 IST

दिल्लीत बसून लोकसभा, विधानसभेचे उमेदवार ठरविण्याची काँग्रेसची अनेक दशकांची परंपरा आता मोडित निघणार आहे. कारण यापुढे हे उमेदवार दिल्लीतून नव्हे तर मतदारसंघातील पक्षाच्या बुथ स्तरावरुन निश्चित केले जाणार आहे.

ठळक मुद्दे‘वन बूथ, टेन युथ’ने युवकांना ‘अच्छे दिन’

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिल्लीत बसून लोकसभा, विधानसभेचे उमेदवार ठरविण्याची काँग्रेसची अनेक दशकांची परंपरा आता मोडित निघणार आहे. कारण यापुढे हे उमेदवार दिल्लीतून नव्हे तर मतदारसंघातील पक्षाच्या बुथ स्तरावरुन निश्चित केले जाणार आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर काँग्रेसचीही गावखेड्यापर्यंत नव्याने सूक्ष्म पक्षबांधणी केली जात आहे. त्याचे नियंत्रण थेट पक्षाध्यक्ष राहुल गांधी करीत आहे. ‘वन बुथ, टेन युथ’ हा नवा कार्यक्रम काँग्रेस खास युवकांसाठी राबवित आहे.

उमेदवारीत युवकांनाही ‘कोटा’काँग्रेसची ही नवी रचना व बांधणी युवकांना व पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’ येण्याचे संकेत देत आहे. यापुढे पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याचे मतही विचारात घेतले जाईल, असे संकेत मिळत आहे. युवकांवर पक्षबांधणीची जबाबदारी देत असतानाच त्यांना सर्वच निवडणुकांमध्ये जागा वाटपात अधिकाधिक स्थान (कोटा) दिले जाणार असल्याचे सांगितले जाते.

दिलेल्या शब्दाची अंमलबजावणीजानेवारीमध्ये दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात व्यासपीठावर बहुतांश खुर्च्या रिकाम्या ठेवण्यात आल्या होत्या. युवकांसाठी या खुर्च्या मी रिक्त ठेवल्या आहेत, समोर बसलेल्यांमधून सक्षम व्यक्तींना उचलून या खुर्च्यांवर बसविले जाईल, असे त्यांनी सांगितले होते. राहुल गांधींनी दिलेला हा शब्द ‘वन बुथ टेन युथ’च्या माध्यमातून पाळला जात असल्याचे मानले जाते.‘शक्ती अ‍ॅप’द्वारे थेट राहूल गांधींच्या पोर्टलवर कनेक्टीव्हीटीप्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोनशे ते सव्वादोनशे बुथ राहणार आहे. प्रत्येक बुथला ८०० ते १२०० मतदार कनेक्ट राहतील.या बुथमध्ये दहा सदस्य राहणार आहेत. त्यातील एक बुथ प्रमुख, दुसरा समन्वयक राहणार आहे. उर्वरित आठ सदस्य असतील.या मतदारसंघातील जातनिहाय लोकसंख्येच्या आधारावर बुथ सदस्य म्हणून प्रतिनिधीत्व दिले जाणार आहे. त्यातही युवक आणि ज्येष्ठ असा समतोल साधला जाईल.बुथ सदस्य म्हणून संधी दिल्या जाणाऱ्यांची सर्व पैलूंनी माहिती, रेकॉर्ड, सामाजिक पत, पक्षासाठी योगदान, निष्ठा आदी बाबी तपासल्या जाणार आहे.या बुथच्या सदस्यांना काँग्रेसच्या ‘शक्ती अ‍ॅप’द्वारे थेट राहुल गांधींच्या कार्यालयांच्या पोर्टलवर कनेक्ट केले जाईल.हे कार्यालय केव्हाही या सदस्यांशी संपर्क साधू शकेल. तर हे सदस्यसुद्धा या अ‍ॅपद्वारे थेट राहुल गांधींना आपल्या भागातील पक्षस्थिती, पदाधिकाऱ्यांची कनेक्टीव्हीटी, उपयोगिता, आपल्या क्षेत्रातील समस्या सांगू शकतील.त्या-त्या मतदारसंघाचा लोकसभेचा व विधानसभेचा उमेदवार निश्चित करताना या बुथ सदस्यांची मते, शिफारसी, सूचना आवर्जुन विचारात घेतल्या जाणार आहे. त्यांची मतेही क्रॉस चेक केली जातील.या बुथ मधून येणाऱ्या शिफारसींच्या आधारावरच काँग्रेसचा आगामी लोकसभा व विधानसभेचा उमेदवार निश्चित होणार आहे. यापुढे पक्षाचा कोणताही उमेदवार थेट दिल्लीतून ठरणार नाही, असे काँग्रेसमधील सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेस