शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

लोहारा बायपास परिसर जलमय

By admin | Updated: September 1, 2014 23:56 IST

वाघापूर-लोहारा बायपास मार्गावर असलेल्या नवीन वसाहती पाण्याखाली आल्या आहे. परिसरात एक ते दीड फूटपर्यंत पाणी साचले आहे. रस्त्यावरून धो-धो पाणी वाहात असल्याने पायदळ

यवतमाळ : वाघापूर-लोहारा बायपास मार्गावर असलेल्या नवीन वसाहती पाण्याखाली आल्या आहे. परिसरात एक ते दीड फूटपर्यंत पाणी साचले आहे. रस्त्यावरून धो-धो पाणी वाहात असल्याने पायदळ मार्ग काढणे कठीण झाले आहे. शिवाय या परिसरात विजेचाही लपंडाव सुरू आहे. लोहारा-वाघापूर मार्गावर असलेले मैथिलीनगर, राऊतनगर, अहल्यानगरी, साठवणे ले-आऊट आदी भागांमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या बांधलेल्या नाही. पावसाचे पाणी वाट मिळेल तिकडे वाहत जाते. गेली दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाचे पाणी सखल भागात साचले आहे. अनेक घरे पाण्याखाली आली आहे. संपूर्ण घराला विळखा पडला आहे. या भागामध्ये काही दिवसांपूर्वीच रस्त्याचे डांबरीकरण झाले, काही ठिकाणी खडीकरणही करण्यात आले. मात्र पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रमुख रस्त्यावरील खोलगट भागातून नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचते. त्यात सरपटणारे प्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत. यापासून धोका निर्माण झाला आहे. घरासमोरील रस्त्यावरून वाहणारे पाणी कित्येक दिवसपर्यंत थांबत नाही. ग्रामपंचायतीने काही दिवसांपूर्वी मुरूम टाकलेले रस्तेही आता चिखलमय झालेले आहे. आता त्यातून मार्ग काढण्याचा प्रश्न या भागातील हजारो नागरिकांपुढे आहे. काही दिवसांपूर्वी अहल्यानगरीत सिमेंट नाल्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र पाणी मुख्य नाल्याला जोडण्यापर्यंत काढण्यात आलेले नाही. त्यामुळे या भागातील नव्यानेच तयार झालेल्या डांबरी रस्त्यांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे नागरिकांच्या घरापर्यंत दुर्गंधीयुक्त पाणी पोहोचत आहे. नालीचे बांधकाम करताना पाईप टाकण्यात आलेले नाहीत. शिवाय कामही अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या अंगणात शिरत आहे. मैथिलीनगरातून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी मुख्य नाल्यापर्यंत काढण्याचे सौजन्य ग्रामपंचायतीने गेली अनेक वर्षांपासून दाखविलेले नाही. या भागातील सर्व पाणी अहल्यानगरी, साठवणे ले-आऊट आदी भागात शिरत आहे. मुख्य रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहात असल्याने मार्ग काढताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या भागात गेली काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. तास-अर्धा तासाने वीज पुरवठा खंडित होत आहे. या मागील नेमके कारण शोधण्याचे सौजन्य विद्युत कंपनीकडून दाखविले जात नाही. या भागात असलेल्या रोहित्रांच्या पेट्यांची दारेही बेपत्ता आहेत. त्यामुळे जीवित हानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. शिवाय दिवसाही पथदिवे सुरू राहण्याचा आजार या भागाला जडला आहे. दुसरीकडे अनेक खांबांवरील दिवे कित्येक दिवसांपासून बंद आहेत. वारंवार सांगितल्यानंतरही संबंधितांकडून दुर्लक्ष केले जाते. सदर भाग लोहारा ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्र.५ मध्ये येतो. या ग्रामपंचायतीच्या सरपंचही याच प्रभागातून निवडून आलेल्या आहेत. शिवाय दोन सदस्यही आहे. त्यांनी या भागातील नागरिकांच्या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)