शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

‘लाॅकडाऊन’मुळे रोजगार गेला; आता गरिबांना व बेघरांना रोटी देणार ‘शिवभोजन’ थाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 05:00 IST

गुरुवारपासून मोफत शिवभोजन थाळीला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. जिल्ह्यात २१ शिवभोजन केंद्रे आहेत. या ठिकाणांवरून पार्सल स्वरूपात शिवभोजन दिले जाणार आहे. २,२५० लाभार्थी या ठिकाणांवरून शिवभोजनाचा लाभ घेत आहेत. मोफत शिवभोजनामुळे ही संख्या दुप्पट वाढण्याचा अंदाज केंद्रचालकांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात २२०० जणांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा उद्रेक वाढल्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊनचा निर्णय घेतला. यातून अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. अशा परिस्थितीत मोफत शिवभोजन थाळीने अनेकांना दिलासा दिला आहे. गुरुवारपासून मोफत शिवभोजन थाळीला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. जिल्ह्यात २१ शिवभोजन केंद्रे आहेत. या ठिकाणांवरून पार्सल स्वरूपात शिवभोजन दिले जाणार आहे. २,२५० लाभार्थी या ठिकाणांवरून शिवभोजनाचा लाभ घेत आहेत. मोफत शिवभोजनामुळे ही संख्या दुप्पट वाढण्याचा अंदाज केंद्रचालकांनी व्यक्त केला आहे. मोफत शिवभोजनामुळे रुग्णांचे नातेवाईक, भिक्षेकरी, कामगार यासह गरजवंतांना एका वेळच्या जेवणाची व्यवस्था झाली आहे. काही नागरिकांनी दोन वेळेस जेवणाची व्यवस्था झाली तर मोठा आधार मिळेल, असे मतही ‘लोकमत’कडे व्यक्त केले. रात्रीच्या वेळी सर्व काही बंद राहते. अशा परिस्थितीत पोटाला दोन घास मिळाले तर त्याचा फायदाच होणार आहे. शिवभोजनाची व्यापकता वाढविण्याची मागणी गावपातळीवरून होत आहे.  

थाळीचा लाभ घेणारे

शिवभोजन थाळीने मोठा दिलासा मिळाला आहे. किमान एका वेळच्या भोजनाची व्यवस्था झाली. यामुळे हाताला काम नसले तरी पोटापाण्याचा प्रश्न मात्र मिटला आहे. शासनाने सुरू केलेली योजना चांगली आहे. याचा मी दररोज लाभ घेत आहे.- मनोज दातार

लाॅकडाऊनमध्ये रोजगार भेटत नाही. मजूर, गरजू, रुग्णांचे नातेवाईक यांना या काळात शिवथाळी मोलाचा आधार ठरत आहे. यामुळे जेवणाची गैरसोय टळली आहे. रात्रीच्या वेळी शिवभोजन थाळी मिळाली तर त्याचा मोठा आधार होईल. कारण लाॅकडाऊनमध्ये सारेच बंद आहे. - विशाल पवार

शिवभोजन एक वेळेस नाही तर दोन वेळेस मिळाले पाहिजे. मग, चिंताच राहणार नाही. यातून पोटाला मोठा आधार मिळाला आहे. मोफत भोजनाची व्यवस्था १५ दिवसच नव्हेतर, पुढेही कायमस्वरूपी असावी. - गजानन निघोट 

दररोज अनेकांना मिळतो लाभ...

 वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार आहे. एका वेळच्या भोजनाची चिंता मिटते.

भिक्षेकरी, कामगार, वाटसरू, सुशिक्षित बेरोजगार यासह अनेकांना शिवभोजन केंद्रावर भोजनाची व्यवस्था करण्यात येते. यामुळे रोजगार नसला तरी पोटापाण्याची व्यवस्था झाली आहे.

 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय