शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

‘लाॅकडाऊन’मुळे रोजगार गेला; आता गरिबांना व बेघरांना रोटी देणार ‘शिवभोजन’ थाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 05:00 IST

गुरुवारपासून मोफत शिवभोजन थाळीला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. जिल्ह्यात २१ शिवभोजन केंद्रे आहेत. या ठिकाणांवरून पार्सल स्वरूपात शिवभोजन दिले जाणार आहे. २,२५० लाभार्थी या ठिकाणांवरून शिवभोजनाचा लाभ घेत आहेत. मोफत शिवभोजनामुळे ही संख्या दुप्पट वाढण्याचा अंदाज केंद्रचालकांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात २२०० जणांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा उद्रेक वाढल्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊनचा निर्णय घेतला. यातून अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. अशा परिस्थितीत मोफत शिवभोजन थाळीने अनेकांना दिलासा दिला आहे. गुरुवारपासून मोफत शिवभोजन थाळीला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. जिल्ह्यात २१ शिवभोजन केंद्रे आहेत. या ठिकाणांवरून पार्सल स्वरूपात शिवभोजन दिले जाणार आहे. २,२५० लाभार्थी या ठिकाणांवरून शिवभोजनाचा लाभ घेत आहेत. मोफत शिवभोजनामुळे ही संख्या दुप्पट वाढण्याचा अंदाज केंद्रचालकांनी व्यक्त केला आहे. मोफत शिवभोजनामुळे रुग्णांचे नातेवाईक, भिक्षेकरी, कामगार यासह गरजवंतांना एका वेळच्या जेवणाची व्यवस्था झाली आहे. काही नागरिकांनी दोन वेळेस जेवणाची व्यवस्था झाली तर मोठा आधार मिळेल, असे मतही ‘लोकमत’कडे व्यक्त केले. रात्रीच्या वेळी सर्व काही बंद राहते. अशा परिस्थितीत पोटाला दोन घास मिळाले तर त्याचा फायदाच होणार आहे. शिवभोजनाची व्यापकता वाढविण्याची मागणी गावपातळीवरून होत आहे.  

थाळीचा लाभ घेणारे

शिवभोजन थाळीने मोठा दिलासा मिळाला आहे. किमान एका वेळच्या भोजनाची व्यवस्था झाली. यामुळे हाताला काम नसले तरी पोटापाण्याचा प्रश्न मात्र मिटला आहे. शासनाने सुरू केलेली योजना चांगली आहे. याचा मी दररोज लाभ घेत आहे.- मनोज दातार

लाॅकडाऊनमध्ये रोजगार भेटत नाही. मजूर, गरजू, रुग्णांचे नातेवाईक यांना या काळात शिवथाळी मोलाचा आधार ठरत आहे. यामुळे जेवणाची गैरसोय टळली आहे. रात्रीच्या वेळी शिवभोजन थाळी मिळाली तर त्याचा मोठा आधार होईल. कारण लाॅकडाऊनमध्ये सारेच बंद आहे. - विशाल पवार

शिवभोजन एक वेळेस नाही तर दोन वेळेस मिळाले पाहिजे. मग, चिंताच राहणार नाही. यातून पोटाला मोठा आधार मिळाला आहे. मोफत भोजनाची व्यवस्था १५ दिवसच नव्हेतर, पुढेही कायमस्वरूपी असावी. - गजानन निघोट 

दररोज अनेकांना मिळतो लाभ...

 वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार आहे. एका वेळच्या भोजनाची चिंता मिटते.

भिक्षेकरी, कामगार, वाटसरू, सुशिक्षित बेरोजगार यासह अनेकांना शिवभोजन केंद्रावर भोजनाची व्यवस्था करण्यात येते. यामुळे रोजगार नसला तरी पोटापाण्याची व्यवस्था झाली आहे.

 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय