शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

शासकीय रुग्णालयात तिघांना जीवदान

By admin | Updated: September 12, 2016 01:44 IST

डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यात सर्पदंशाच्या घटना अलिकडे वाढल्या आहेत.

सर्पदंश झाल्याने २४ तास झुंज : दोन डॉक्टर बनले रुग्णांसाठी देवदूतउमरखेड : डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यात सर्पदंशाच्या घटना अलिकडे वाढल्या आहेत. मात्र येथील शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नाने सर्पदंश झालेल्या रुग्णांना जीवदान मिळत आहे. दोन दिवसापूर्वी तिघांना सर्पदंश झाला होता. या तिघांवर वेळीच योग्य उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले. दोन डॉक्टर या तिघांसाठी देवदूत ठरले.उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून सर्पदंश झालेल्या रुग्णांवर खात्रीने उपचार होत आहे. त्यामुळे सर्पदंश झाला की, ग्रामीण भागातील नागरिक थेट शासकीय रुग्णालय गाठतात. त्या ठिकाणी असलेले डॉ.श्रीकांत जयस्वाल आणि शेख मोहंमद गौस हे उपलब्ध साधन सामुग्रीतून रुग्णांवर उपचार करतात. १५ दिवसापूर्वी पळशी येथील शिल्पा जोगदंडे आणि साखरा येथील सिंपल बडवे या दोघींना डॉक्टरांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणले. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा सर्पदंशानंतर गावठी उपचार करण्यापेक्षा शासकीय रुग्णालयात जाण्याकडे कल वाढला.अशातच दोन दिवसापूर्वी उमरखेड तालुक्यातील हातला येथील निवृत्ती विठ्ठल ढोले या शेतकऱ्याला शेतात सर्पदंश झाला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर शर्तीने उपचार केले. उपचार सुरू असतानाच गाजेगाव येथील गोविंद मस्के या ३० वर्षीय तरुणाला सर्पदंश झाल्याने रुग्णालयात दाखल केले. त्या पाठोपाठ चिल्ली येथील अर्जुन आत्माराम राठोड याही सर्पदंशाचा रुग्ण रुग्णालयात दाखल झाला. एकाच वेळी तीन रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना मोठे परिश्रम घ्यावे लागले. सतत २४ तास या तिघांवर निगरानी ठेऊन उपचार करण्यात आले. यासाठी परिचारिका शीतल बोडगे, तेजल बोडगे, शिवा सावळे, त्रिनेत्रा स्वामी, मोगलाजी जोरगेवार यांनी सहकार्य केले. या तिघाही रुग्णांची प्रकृती आता ठणठणीत झाली आहे.सर्पदंशावर खात्रीशीर उपचार शासकीय रुग्णालयाकडे पाहण्याचा दृष्टीकोण तसा वेगळा असतो. परंतु डॉ. श्रीकांत जयस्वाल यांनी गत दोन वर्षात सर्पदंश झालेल्या शेकडो रुग्णांना जीवदान दिले. त्यामुळे उमरखेड तालुक्यात डॉ. जयस्वाल यांच्याकडे सर्पदंशावरील उपचाराचे तज्ज्ञ म्हणूनच बघितले जाते. ग्रामीण भागातील जनताही आता अंधश्रद्धेच्या आहारी न जाता थेट रुग्णालयात येतात. या ठिकाणी उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन जातात. (शहर प्रतिनिधी)