शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

शिक्षणासाठी जीव धोक्यात

By admin | Updated: December 20, 2014 22:46 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे चित्र महागाव तालुक्यातील फुलसावंगी परिसरात दिसत आहे. एसटी बसची एकही फेरी नसल्याने परिसरातील

खासगी वाहनाने प्रवास : अनेक गावांत एसटी बसची फेरीच नाहीदेवानंद पुजारी - फुलसावंगीग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे चित्र महागाव तालुक्यातील फुलसावंगी परिसरात दिसत आहे. एसटी बसची एकही फेरी नसल्याने परिसरातील गावातील विद्यार्थी फुलसावंगी आणि टेंभी येथे शिक्षणासाठी खासगी वाहनाने येतात. अनेकदा या विद्यार्थ्यांना पायदान आणि टपावरून प्रवास करावा लागतो. महागाव तालुक्यातील फुलसावंगी आणि टेंभी येथे माध्यमिक शिक्षणाची सुविधा आहे. त्यामुळे परिसरातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. परंतु घरापासून शाळेपर्यंत येण्यासाठी एसटी बसची कोणतीही फेरी नाही. त्यामुळे चिल्लीसह अनेक गावातील विद्यार्थी चक्क खासगी वाहनाने प्रवास करतात. अनेकदा या वाहनांमध्ये जागा नसल्याने विद्यार्थी वाहनाच्या मागण्या बाजूला लटकून तर अनेकदा टपावर बसून प्रवास करताना दिसून येतात. विशेष म्हणजे महागाव-फुलसावंगी, फुलसावंगी-निगनूर आणि फुलसावंगी किनवट या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहे. अशा रस्त्यावरून विद्यार्थी केवळ शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करताना दिसतात. आॅटोरिक्षामध्ये अथवा जीपमध्ये बसण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जातात. त्यावेळी या विद्यार्थ्यांना लटकून प्रवास करावा लागतो. अशा स्थितीत अपघाताची भीती नाकारता येत नाही. परंतु शिक्षणासाठी हा धोका हे चिमुकले घेत असल्याचे चित्र आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना दारापासून शाळेपर्यंत वाहनाची व्यवस्था केली जाते. सर्व सुविधा दिल्या जातात. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी खडतर प्रवास करावा लागत असल्याचे चित्र फुलसावंगी परिसरात दिसून येते. अनेकदा या वाहनांमुळे अपघात होतात. लहान-मोठ्या अपघाताकडे कुणी लक्षही देत नाही. महागाव पोलिसांना हा प्रकार माहीत आहे. परंतु बसच नसल्याने विद्यार्थी जाणार तरी कसे, असा प्रश्न करीत तेही या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. विशेष म्हणजे अनेक आॅटोरिक्षांचे चालक हे अप्रशिक्षित असतात. लायसनही नसते. मात्र विद्यार्थी अशा वाहनातून प्रवास करताना दिसून येतात. राज्य परिवहन महामंडळाने अनेक मार्गावरील आपल्या बसफेऱ्या कमी केल्या आहे. बसफेऱ्या कमी करताना उत्पन्न आणि रस्ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे केले जाते. याच कारणाने महागाव तालुक्यातील ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद आहे. परिणामी विद्यार्थ्यांना अशा खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो.