शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

शिक्षणासाठी जीव धोक्यात

By admin | Updated: December 20, 2014 22:46 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे चित्र महागाव तालुक्यातील फुलसावंगी परिसरात दिसत आहे. एसटी बसची एकही फेरी नसल्याने परिसरातील

खासगी वाहनाने प्रवास : अनेक गावांत एसटी बसची फेरीच नाहीदेवानंद पुजारी - फुलसावंगीग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे चित्र महागाव तालुक्यातील फुलसावंगी परिसरात दिसत आहे. एसटी बसची एकही फेरी नसल्याने परिसरातील गावातील विद्यार्थी फुलसावंगी आणि टेंभी येथे शिक्षणासाठी खासगी वाहनाने येतात. अनेकदा या विद्यार्थ्यांना पायदान आणि टपावरून प्रवास करावा लागतो. महागाव तालुक्यातील फुलसावंगी आणि टेंभी येथे माध्यमिक शिक्षणाची सुविधा आहे. त्यामुळे परिसरातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. परंतु घरापासून शाळेपर्यंत येण्यासाठी एसटी बसची कोणतीही फेरी नाही. त्यामुळे चिल्लीसह अनेक गावातील विद्यार्थी चक्क खासगी वाहनाने प्रवास करतात. अनेकदा या वाहनांमध्ये जागा नसल्याने विद्यार्थी वाहनाच्या मागण्या बाजूला लटकून तर अनेकदा टपावर बसून प्रवास करताना दिसून येतात. विशेष म्हणजे महागाव-फुलसावंगी, फुलसावंगी-निगनूर आणि फुलसावंगी किनवट या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहे. अशा रस्त्यावरून विद्यार्थी केवळ शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करताना दिसतात. आॅटोरिक्षामध्ये अथवा जीपमध्ये बसण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जातात. त्यावेळी या विद्यार्थ्यांना लटकून प्रवास करावा लागतो. अशा स्थितीत अपघाताची भीती नाकारता येत नाही. परंतु शिक्षणासाठी हा धोका हे चिमुकले घेत असल्याचे चित्र आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना दारापासून शाळेपर्यंत वाहनाची व्यवस्था केली जाते. सर्व सुविधा दिल्या जातात. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी खडतर प्रवास करावा लागत असल्याचे चित्र फुलसावंगी परिसरात दिसून येते. अनेकदा या वाहनांमुळे अपघात होतात. लहान-मोठ्या अपघाताकडे कुणी लक्षही देत नाही. महागाव पोलिसांना हा प्रकार माहीत आहे. परंतु बसच नसल्याने विद्यार्थी जाणार तरी कसे, असा प्रश्न करीत तेही या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. विशेष म्हणजे अनेक आॅटोरिक्षांचे चालक हे अप्रशिक्षित असतात. लायसनही नसते. मात्र विद्यार्थी अशा वाहनातून प्रवास करताना दिसून येतात. राज्य परिवहन महामंडळाने अनेक मार्गावरील आपल्या बसफेऱ्या कमी केल्या आहे. बसफेऱ्या कमी करताना उत्पन्न आणि रस्ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे केले जाते. याच कारणाने महागाव तालुक्यातील ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद आहे. परिणामी विद्यार्थ्यांना अशा खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो.