शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी जीव धोक्यात

By admin | Updated: December 20, 2014 22:46 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे चित्र महागाव तालुक्यातील फुलसावंगी परिसरात दिसत आहे. एसटी बसची एकही फेरी नसल्याने परिसरातील

खासगी वाहनाने प्रवास : अनेक गावांत एसटी बसची फेरीच नाहीदेवानंद पुजारी - फुलसावंगीग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे चित्र महागाव तालुक्यातील फुलसावंगी परिसरात दिसत आहे. एसटी बसची एकही फेरी नसल्याने परिसरातील गावातील विद्यार्थी फुलसावंगी आणि टेंभी येथे शिक्षणासाठी खासगी वाहनाने येतात. अनेकदा या विद्यार्थ्यांना पायदान आणि टपावरून प्रवास करावा लागतो. महागाव तालुक्यातील फुलसावंगी आणि टेंभी येथे माध्यमिक शिक्षणाची सुविधा आहे. त्यामुळे परिसरातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. परंतु घरापासून शाळेपर्यंत येण्यासाठी एसटी बसची कोणतीही फेरी नाही. त्यामुळे चिल्लीसह अनेक गावातील विद्यार्थी चक्क खासगी वाहनाने प्रवास करतात. अनेकदा या वाहनांमध्ये जागा नसल्याने विद्यार्थी वाहनाच्या मागण्या बाजूला लटकून तर अनेकदा टपावर बसून प्रवास करताना दिसून येतात. विशेष म्हणजे महागाव-फुलसावंगी, फुलसावंगी-निगनूर आणि फुलसावंगी किनवट या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहे. अशा रस्त्यावरून विद्यार्थी केवळ शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करताना दिसतात. आॅटोरिक्षामध्ये अथवा जीपमध्ये बसण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जातात. त्यावेळी या विद्यार्थ्यांना लटकून प्रवास करावा लागतो. अशा स्थितीत अपघाताची भीती नाकारता येत नाही. परंतु शिक्षणासाठी हा धोका हे चिमुकले घेत असल्याचे चित्र आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना दारापासून शाळेपर्यंत वाहनाची व्यवस्था केली जाते. सर्व सुविधा दिल्या जातात. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी खडतर प्रवास करावा लागत असल्याचे चित्र फुलसावंगी परिसरात दिसून येते. अनेकदा या वाहनांमुळे अपघात होतात. लहान-मोठ्या अपघाताकडे कुणी लक्षही देत नाही. महागाव पोलिसांना हा प्रकार माहीत आहे. परंतु बसच नसल्याने विद्यार्थी जाणार तरी कसे, असा प्रश्न करीत तेही या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. विशेष म्हणजे अनेक आॅटोरिक्षांचे चालक हे अप्रशिक्षित असतात. लायसनही नसते. मात्र विद्यार्थी अशा वाहनातून प्रवास करताना दिसून येतात. राज्य परिवहन महामंडळाने अनेक मार्गावरील आपल्या बसफेऱ्या कमी केल्या आहे. बसफेऱ्या कमी करताना उत्पन्न आणि रस्ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे केले जाते. याच कारणाने महागाव तालुक्यातील ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद आहे. परिणामी विद्यार्थ्यांना अशा खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो.