शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

चलो अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला, नांदेड, वाशिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू झाल्याने २२ मार्चपासून एसटीची चाके रुतली होती. कालांतराने लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्यात आली. तेव्हा जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. आता जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला गुरुवार २२ ऑगस्टपासून मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातून गुरुवारपासून १२९ शेड्यूल सोडले जाणार आहे.

ठळक मुद्दे‘लालपरी’ आजपासून जिल्ह्याबाहेर : पाच महिन्यांपासून अडकून पडलेले नागरिक आता घरी पोहोचणार

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आंतरजिल्हा वाहतुकीची मुभा मिळाल्याने गुरुवारी जिल्ह्यातील सर्व नऊही आगारातून जिल्ह्याबाहेर बसेस सोडल्या जाणार आहे. अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला यासह लागून असलेल्या सर्व जिल्ह्यात यवतमाळ विभागातून लालपरी जाणार आहे. एसटीच्या प्रवासासाठी ई-पास लागणार नसल्याने गेली पाच महिन्यांपासून बाहेरजिल्ह्यात अडकून पडलेल्या सामान्य लोकांना आपल्या गावी येता येणार आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू झाल्याने २२ मार्चपासून एसटीची चाके रुतली होती. कालांतराने लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्यात आली. तेव्हा जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. आता जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला गुरुवार २२ ऑगस्टपासून मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातून गुरुवारपासून १२९ शेड्यूल सोडले जाणार आहे. अर्थात एसटी बसेसच्या जवळपास ६५ फेऱ्या होणार आहे. सर्वच आगारातून बाहेर जिल्ह्यासाठी बसेस सोडल्या जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्याला लागून असेल्या अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला, नांदेड याठिकाणी प्रायोगिक तत्वावर बसेस सोडल्या जातील. सकाळी ७ वाजतापासून फेऱ्या सोडण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लालून देण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करून प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. बाहेरून आलेल्या सर्व बसेस सॅनिटराईज करण्यात येणार असून, आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार आहे. प्रवासी संख्या वाढल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसफेऱ्यां वाढविण्यात येणार आहे. बसने प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज भासणार नाही. नागरिकांना बाहेर जिल्ह्याचा प्रवास सोयीचा होईल. लॉकडाऊनपूर्वी यवतमाळ विभागातून दररोज सुमारे ४६० शेड्यूल सोडले जात होते. जसजशी प्रवाशी संख्या वाढत जाईल, तसतशी बसफेऱ्यांची संख्याही वाढविली जाणार आहे. थेट अन् फक्त २२ प्रवासी घेणारसोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी केवळ २२ प्रवासी घेऊनच वाहतूक केली जाणार आहे. तेही थेट प्रवासी असणार आहे. ही संख्या पूर्ण झाल्याशिवाय बस फलाटावरून सोडली जाणार नाही. ही अट केवळ बाहेर जिल्ह्यात जाणाºया बसेसकरिताच आहे. सध्या सुरू असलेल्या बसेस आहे त्यानुसारच धावणार आहे. महालक्ष्मी, गणपती हे सण उत्सव कॅश करण्यासाठी लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्याचाही प्रयत्न यवतमाळ विभागाचा राहणार आहे.गुरुवारपासून १२९ शेड्यूल सोडण्याची तयारी आहे. यवतमाळला लागून असलेल्या सर्वच जिल्ह्यात फेºया सोडल्या जातील. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले सर्व नियम पाळले जाईल. प्रवाशांची सुरक्षितता महत्वाची आहे. प्रवाशी संख्या वाढल्यानंतर फेºयाही वाढविल्या जाईल.- श्रीनिवास जोशी,विभाग नियंत्रक, यवतमाळ

टॅग्स :state transportएसटी