शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

चलो अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला, नांदेड, वाशिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू झाल्याने २२ मार्चपासून एसटीची चाके रुतली होती. कालांतराने लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्यात आली. तेव्हा जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. आता जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला गुरुवार २२ ऑगस्टपासून मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातून गुरुवारपासून १२९ शेड्यूल सोडले जाणार आहे.

ठळक मुद्दे‘लालपरी’ आजपासून जिल्ह्याबाहेर : पाच महिन्यांपासून अडकून पडलेले नागरिक आता घरी पोहोचणार

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आंतरजिल्हा वाहतुकीची मुभा मिळाल्याने गुरुवारी जिल्ह्यातील सर्व नऊही आगारातून जिल्ह्याबाहेर बसेस सोडल्या जाणार आहे. अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला यासह लागून असलेल्या सर्व जिल्ह्यात यवतमाळ विभागातून लालपरी जाणार आहे. एसटीच्या प्रवासासाठी ई-पास लागणार नसल्याने गेली पाच महिन्यांपासून बाहेरजिल्ह्यात अडकून पडलेल्या सामान्य लोकांना आपल्या गावी येता येणार आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू झाल्याने २२ मार्चपासून एसटीची चाके रुतली होती. कालांतराने लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्यात आली. तेव्हा जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. आता जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला गुरुवार २२ ऑगस्टपासून मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातून गुरुवारपासून १२९ शेड्यूल सोडले जाणार आहे. अर्थात एसटी बसेसच्या जवळपास ६५ फेऱ्या होणार आहे. सर्वच आगारातून बाहेर जिल्ह्यासाठी बसेस सोडल्या जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्याला लागून असेल्या अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला, नांदेड याठिकाणी प्रायोगिक तत्वावर बसेस सोडल्या जातील. सकाळी ७ वाजतापासून फेऱ्या सोडण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लालून देण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करून प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. बाहेरून आलेल्या सर्व बसेस सॅनिटराईज करण्यात येणार असून, आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार आहे. प्रवासी संख्या वाढल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसफेऱ्यां वाढविण्यात येणार आहे. बसने प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज भासणार नाही. नागरिकांना बाहेर जिल्ह्याचा प्रवास सोयीचा होईल. लॉकडाऊनपूर्वी यवतमाळ विभागातून दररोज सुमारे ४६० शेड्यूल सोडले जात होते. जसजशी प्रवाशी संख्या वाढत जाईल, तसतशी बसफेऱ्यांची संख्याही वाढविली जाणार आहे. थेट अन् फक्त २२ प्रवासी घेणारसोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी केवळ २२ प्रवासी घेऊनच वाहतूक केली जाणार आहे. तेही थेट प्रवासी असणार आहे. ही संख्या पूर्ण झाल्याशिवाय बस फलाटावरून सोडली जाणार नाही. ही अट केवळ बाहेर जिल्ह्यात जाणाºया बसेसकरिताच आहे. सध्या सुरू असलेल्या बसेस आहे त्यानुसारच धावणार आहे. महालक्ष्मी, गणपती हे सण उत्सव कॅश करण्यासाठी लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्याचाही प्रयत्न यवतमाळ विभागाचा राहणार आहे.गुरुवारपासून १२९ शेड्यूल सोडण्याची तयारी आहे. यवतमाळला लागून असलेल्या सर्वच जिल्ह्यात फेºया सोडल्या जातील. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले सर्व नियम पाळले जाईल. प्रवाशांची सुरक्षितता महत्वाची आहे. प्रवाशी संख्या वाढल्यानंतर फेºयाही वाढविल्या जाईल.- श्रीनिवास जोशी,विभाग नियंत्रक, यवतमाळ

टॅग्स :state transportएसटी