शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

चलो अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला, नांदेड, वाशिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू झाल्याने २२ मार्चपासून एसटीची चाके रुतली होती. कालांतराने लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्यात आली. तेव्हा जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. आता जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला गुरुवार २२ ऑगस्टपासून मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातून गुरुवारपासून १२९ शेड्यूल सोडले जाणार आहे.

ठळक मुद्दे‘लालपरी’ आजपासून जिल्ह्याबाहेर : पाच महिन्यांपासून अडकून पडलेले नागरिक आता घरी पोहोचणार

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आंतरजिल्हा वाहतुकीची मुभा मिळाल्याने गुरुवारी जिल्ह्यातील सर्व नऊही आगारातून जिल्ह्याबाहेर बसेस सोडल्या जाणार आहे. अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला यासह लागून असलेल्या सर्व जिल्ह्यात यवतमाळ विभागातून लालपरी जाणार आहे. एसटीच्या प्रवासासाठी ई-पास लागणार नसल्याने गेली पाच महिन्यांपासून बाहेरजिल्ह्यात अडकून पडलेल्या सामान्य लोकांना आपल्या गावी येता येणार आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू झाल्याने २२ मार्चपासून एसटीची चाके रुतली होती. कालांतराने लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्यात आली. तेव्हा जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. आता जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला गुरुवार २२ ऑगस्टपासून मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातून गुरुवारपासून १२९ शेड्यूल सोडले जाणार आहे. अर्थात एसटी बसेसच्या जवळपास ६५ फेऱ्या होणार आहे. सर्वच आगारातून बाहेर जिल्ह्यासाठी बसेस सोडल्या जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्याला लागून असेल्या अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला, नांदेड याठिकाणी प्रायोगिक तत्वावर बसेस सोडल्या जातील. सकाळी ७ वाजतापासून फेऱ्या सोडण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लालून देण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करून प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. बाहेरून आलेल्या सर्व बसेस सॅनिटराईज करण्यात येणार असून, आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार आहे. प्रवासी संख्या वाढल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसफेऱ्यां वाढविण्यात येणार आहे. बसने प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज भासणार नाही. नागरिकांना बाहेर जिल्ह्याचा प्रवास सोयीचा होईल. लॉकडाऊनपूर्वी यवतमाळ विभागातून दररोज सुमारे ४६० शेड्यूल सोडले जात होते. जसजशी प्रवाशी संख्या वाढत जाईल, तसतशी बसफेऱ्यांची संख्याही वाढविली जाणार आहे. थेट अन् फक्त २२ प्रवासी घेणारसोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी केवळ २२ प्रवासी घेऊनच वाहतूक केली जाणार आहे. तेही थेट प्रवासी असणार आहे. ही संख्या पूर्ण झाल्याशिवाय बस फलाटावरून सोडली जाणार नाही. ही अट केवळ बाहेर जिल्ह्यात जाणाºया बसेसकरिताच आहे. सध्या सुरू असलेल्या बसेस आहे त्यानुसारच धावणार आहे. महालक्ष्मी, गणपती हे सण उत्सव कॅश करण्यासाठी लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्याचाही प्रयत्न यवतमाळ विभागाचा राहणार आहे.गुरुवारपासून १२९ शेड्यूल सोडण्याची तयारी आहे. यवतमाळला लागून असलेल्या सर्वच जिल्ह्यात फेºया सोडल्या जातील. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले सर्व नियम पाळले जाईल. प्रवाशांची सुरक्षितता महत्वाची आहे. प्रवाशी संख्या वाढल्यानंतर फेºयाही वाढविल्या जाईल.- श्रीनिवास जोशी,विभाग नियंत्रक, यवतमाळ

टॅग्स :state transportएसटी