शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

साहित्यिकांनी अगत्याने येऊन आपले म्हणणे मांडावे, यवतमाळ जिल्हावासीयांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 17:51 IST

यवतमाळ जिल्ह्याला ४५ वर्षानंतर साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला. संमेलनाच्या उद्घाटकाचे निमंत्रण रद्द करणे ही अतिशय दुर्दैवी घटना येथे घडली.

यवतमाळ - जिल्ह्याला ४५ वर्षानंतर साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला. संमेलनाच्या उद्घाटकाचे निमंत्रण रद्द करणे ही अतिशय दुर्दैवी घटना येथे घडली. मात्र यवतमाळकरांच्या अस्मितेला ठेच पोहोचल्यानंतरही हे संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्वजण एकत्र आलो आहोत. साहित्यिकांनीही त्यांच्या भावना, विचार संमेलनात सहभागी होऊन व्यक्त कराव्या, अशी भूमिका यवतमाळकर जनतेच्यावतीने आयोजित पत्रपरिषदेत मांडण्यात आली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी समितीचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते व त्यांच्या सहकार्यांनी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले. महत प्रयासानंतर यवतमाळकरांना साहित्य संमेलनाचे यजमान पद भूषविण्याची संधी मिळाली. जिल्ह्याला समृद्ध अशी साहित्यिकांची परंपरा लाभली आहे. त्यातच संमेलन यवतमाळात होणार याचा अत्यानंद सर्वांनाच झाला. संमेलनाच्या आयोजनासाठी समितीनेही कठोर परिश्रम घेतले. त्यानंतर मुख्य उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द झाले. या दुर्दैवी घटनेनंतर अनेक घडामोडी सातत्याने होत आहेत. अशा स्थितीत अनेक साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार टाकण्याचीच घोषणा केली आहे. मात्र यवतमाळकर नागरिक या नात्याने साहित्य संमेलनाशी प्रत्येकाची अस्मिता जुळल्या गेली आहे. जे झाले ते वाईट झाले आता संमेलन मात्र यशस्वीरीत्या पार पडायला हवे. साहित्यिकांनीही त्यांच्या भावना येथे येऊन व्यक्त कराव्या, असे आवाहन यवतमाळकरांच्यावतीने करण्यात आले. मराठी साहित्याने कूस बदलली ंआहे.पहिल्यांदाच संमेलनाच्या अध्यक्ष व उद्घाटक या दोन्हीही महिलाच होत्या. आता महिला अध्यक्ष असणेही भूषणवाहबाब आहे.  यवतमाळात येणारा मराठी साहित्यिक  हा पाहुणा नसून आमचं गणगोत आहे या भावनेतून त्यांचे स्वागत केले जाईल, अशी भूमिका पत्रपरिषदेतून मांडली. यावेळी माजी आमदार दिवाकर पांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, डॉ. विजय कालवकर, डॉ.टी.सी. राठोड, अ‍ॅड. जयसिंह चव्हाण, साहित्यिक आनंद गायकवाड, अशोक बोबडे, नानाभाऊ गाडबैले, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष  मनीष पाटील, सुरेश राठी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. मिनाज मलनस, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, प्रा. डॉ. नितीन खर्चे, जिल्हा बँकेचे संचालक बाबूपाटील वानखडे, विद्या खडसे, नगरसेवक वैशाली सवाई, दिनेश गोगरकर, सुरेश चिंचोळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ