शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

पोषण आहाराकडे विद्यार्थ्यांची पाठ

By admin | Updated: May 29, 2015 00:16 IST

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीमध्येसुद्धा खिचडीचे वितरण व्हायला पाहिजे.

पुसद : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीमध्येसुद्धा खिचडीचे वितरण व्हायला पाहिजे. शासनाच्या या योजनेचे सध्या तीनतेरा वाजले आहे. शाळेत विद्यार्थीच नाही. त्यामुळे खिचडी खाणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.शासन आदेशानुसार जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे उन्हाळी सुटीतही मुलांना खिचडीचे वाटप करण्यात यावे, या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शाळांनी नियोजन करून शिक्षकांना जबाबदारी दिली आहे. खिचडीचे वाटप न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशही शासनाने दिले.१ मे रोजी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी शाळेत आलेच नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी २० ते ३० टक्के विद्यार्थी उपस्थित होते. मात्र त्यानंतर कोणत्याही शाळेत खिचडी शिजलीच नाही. हे चित्र पुसद तालुक्यात सर्वच ठिकाणी पाहायला मिळते. तर शहरातील शाळांमध्ये परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी निकालाच्या दिवशी शाळेत गेले. नंतर त्यांनी मात्र कडाक्याच्या उन्हामुळे शाळेकडे पाठ फिरविली. दीड महिन्यापासून शहरातील शाळांमध्ये खिचडी शिजलीच नाही. ही वस्तुस्थिती आहे. उल्लेखनीय म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात विद्यार्थी सुट्यांमुळे शाळेत येत नाही. अनेक विद्यार्थी पालकांसोबत बाहेरगावी जातात. तर कडक उन्हामुळे पालकही मुलांना केवळ खिचडीसाठी शाळेत पाठविणे टाळतात. असे असताना शासनाकडून मात्र विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करण्याचे आदेश आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शासनाच्या या आदेशाला कोणत्याही शिक्षक संघटनेने विरोध केला नाही. ग्रामपंचायतचे पदाधिकारी, शिक्षण समित्यांचे पदाधिकारी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा शासनाला वस्तुस्थिती अवगत करून दिली नाही. सध्या परिस्थिती शाळेत विद्यार्थीच नसल्यामुळे खिचडी शिजत नसली तरीदेखील खिचडी शिजविणाऱ्या महिला उपस्थित आहे. जवळपास सर्व शाळांमध्ये खिचडी शिजविण्यासाठी दोन ते तीन महिला नियुक्त केलेल्या आहे. या महिलांना एक ते दोन हजार रुपये महिना द्यावा लागतो. तेव्हा त्यांच्या दोन महिन्यांचे वेतन कोठून आणायचे, हा प्रश्न शिक्षकांसमोर उभा आहे. या महिलांना वेतन द्यायचे असल्यास विद्यार्थ्यांची ३० ते ४० टक्के उपस्थिती असणे अनिवार्य आहे. असे अधिकारीस्तरावर सांगितल्या जाते. जर कुणी चुकीची माहिती देवून वेतन काढले तर त्यावर कारवाई होवू शकते. त्यामुळे आपण विद्यार्थीच नसल्याने त्यांची पटसंख्या शून्य दाखवत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)