शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कर्ज मेळाव्याकडे बँकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 21:43 IST

तालुक्यातील अंजनखेड येथे शनिवारी अर्ज द्या-कर्ज घ्या मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याकडे बँकांनी पाठ फिरविल्याने सकाळपासून उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देअर्ज द्या-कर्ज घ्या : अंजनखेड परिसरातील शेतकरी संतापले

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील अंजनखेड येथे शनिवारी अर्ज द्या-कर्ज घ्या मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याकडे बँकांनी पाठ फिरविल्याने सकाळपासून उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.अंजनखेड ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी मंडळातील शेतकऱ्यांसाठी अर्ज द्या-कर्ज घ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील शेकडो शेतकरी मेळाव्याला आले होते. मात्र तेथे साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. मंडळ अधिकारी जे.के. जयस्वाल, मंडळातील तीन तलाठी यावेळी उपस्थित होते. मात्र बँकेचे अधिकारी शेवटपर्यंत आलेच नाही. मंडळ अधिकारयांनी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र बँकेकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेली.यानंतर स्वत: तहसीलदारांनी बँकेशी संपर्क साधला. तरीही बँकेचे प्रतिनिधी आले नाही. एकप्रकारे शासनाच्या धोरणाला बँकेकडून मूठमाती दिली गेली. बँकांच्या या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी भरडले जात आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जासाठी भटकंती करावी लागत आहे.लोकप्रतिनिधी केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. यामुळे मेळाव्याला उपस्थित शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावीअंजनखेड येथे शेतकरी मेळावा व मार्गदर्शनासाठी उपस्थित शेतकºयांनी आता जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना सहज आणि सुलभरित्या कर्ज मिळावे म्हणून असे मेळावे घेतले जातात. मात्र त्याबाबत बँंका उदासीन आहे. या बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी वठणीवर आणावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शनिवारी शेतकऱ्यांना तास न् तास प्रतीक्षा करूनही स्टेट बँकेने उदासीनता दाखविली. बँकेच्या संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज