शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

नऊ हजार विद्यार्थ्यांची फेरपरीक्षेकडे पाठ

By admin | Updated: July 10, 2017 01:01 IST

दहावी-बारावीच्या परीक्षेत काही कारणास्तव अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी फेरपरीक्षा घेतली जात आहे.

दहावी-बारावी अनुत्तीर्ण : ईच्छाशक्तीचा अभाव, केवळ पाच हजार विद्यार्थी देणार फेरपरीक्षालोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावी-बारावीच्या परीक्षेत काही कारणास्तव अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी फेरपरीक्षा घेतली जात आहे. मात्र, यंदा अनुत्तीर्ण झालेल्या १४ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ५ हजार विद्यार्थीच फेरपरीक्षेला बसणार आहेत. त्यामुळे फेरपरीक्षेबाबत शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांपर्यंत माहितीच पोहोचविली की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.येत्या ११ ते २८ जुलै या कालावधीत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे इयत्ता बारावीची फेरपरीक्षा घेण्यात येत आहे. त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील ९ शाळांमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. लेखी परीक्षेपूर्वी या विद्यार्थ्यांची सध्या १ ते १० जुलैदरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जात आहे. परंतु, विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य दिसते. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ३३ हजार ४१५ विद्यार्थी बसले होते. त्यातील ५ हजार ७९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेतून वर्ष वाचविण्याची उत्तम संधी असतानाही केवळ २ हजार १३६ विद्यार्थीच बारावीच्या फेरपरीक्षेला बसले आहेत. तर ३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरविली आहे.मार्चमध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात साडेनऊ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्यासाठी आता १८ जुलै ते २ आॅगस्टपर्यंत फेरपरीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी जिल्ह्यात १५ परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. तर १० ते १७ जुलैदरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा होत आहे. परंतु, जिल्ह्यातील साडेनऊ हजार अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ हजार ७२६ विद्यार्थीच फेरपरीक्षेला बसणार आहेत. उर्वरित साडेपाच हजार विद्यार्थी परीक्षेला का बसले नाही, याचे उत्तर शिक्षण विभागाकडेही नाही. विशेष म्हणजे, फेरपरीक्षेला पात्र असलेला कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, याबाबत दक्षता घेण्याची सूचना अमरावती विभागीय मंडळाचे सचिव संजय यादगिरे यांनी केली होती.अशी आहेत जिल्ह्यातील परीक्षा केंद्रेदहावी : यवतमाळ लोकनायक अणे विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय, नेर शिवाजी विद्यालय, दारव्हा शिवाजी विद्यालय, आर्णी भारती विद्यालय, पुसद नाईक कॉन्व्हेंट, उमरखेड साकळे विद्यालय, जिल्हा परिषद कन्या हायस्कूल, महागाव जिल्हा परिषद हायस्कूल, कळंब शिवशक्ती महाविद्यालय, पांढरकवडा जिल्हा परिषद हायस्कूल, वणी जनता विद्यालय, घाटंजी समर्थ शाळा, राळेगाव न्यू इंग्लिश हायस्कूल, मारेगाव राष्ट्रीय विद्यालय.बारावी : यवतमाळ अँग्लो हिंदी विद्यालय, दारव्हा मुंगसाजी महाविद्यालय, पुसद के.डी. जाधव विद्यालय, लोकहीत विद्यालय, कळंब चिंतामणी महाविद्यालय, इंदिरा महाविद्यालय, पांढरकवडा केईएस महाविद्यालय, वणी लोकमान्य टिळक महाविद्यालय.