शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
4
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
5
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
6
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
7
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
8
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
9
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
11
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
12
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
13
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
14
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
15
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
16
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
17
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
18
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
19
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
20
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

आमदारांनी घेतली आढावा बैठक

By admin | Updated: December 6, 2015 02:25 IST

उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये, यासाठीच पूर्व नियोजन करण्यासाठी शुक्रवारी झरी पंचायत समिती सभागृहात आमदारांनी पाणी टंचाई आढावा बैठक घेतली.

अधिकाऱ्यांची खरडपट्टी : ९० टक्के गावे पाणी टंचाईमुक्त, मुकुटबनची समस्या कायमचमुकुटबन : उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये, यासाठीच पूर्व नियोजन करण्यासाठी शुक्रवारी झरी पंचायत समिती सभागृहात आमदारांनी पाणी टंचाई आढावा बैठक घेतली.आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कासावार, पंचायत समिती सभापती मिथुन सोयाम, पंचायत समिती सदस्य शीतल पंधरे, गटविकास अधिकारी बी.एम. मेघावत, तहसीलदार अशोक देवकर, अनिल पावडे, प्रवीण विधाते, सरपंच शंकर लाकडे, सहायक गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत बैठक्ीला उपस्थित होते. प्रथम मुकुटबनचा पाणी प्रश्न हाताळण्यात आला. येथे पाच वर्षांपासून भारत निर्माण प्रकल्प रखडलेला आहे. सध्या ग्रामस्थ फ्लोराईड युक्त पाणी पीत असल्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागतो. याबाबत वरिष्ठांना विचारपूस केल्यास ते कानाडोळा करतात, असे सरपंच लाकडे यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांना सभेतूनच फोन करून विचारले असता, निधी आहे पण कामात संथगती असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आमदार भडकले. त्यांनी येत्या २६ जानेवारीपर्यंत प्रकल्प सुरू करण्याचे आदेश दिले. यानंतर झरी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या सरपंच, सचिवांनी समस्या मांडल्या. त्यात जवळपास ९० टक्के गावे पाणी टंचाईपासून मुक्त असल्याचे आढळले. काही ठिकाणी विहिरी आहे, मात्र मोटार व केबलमुळे प्रकल्प रखडले आहे. याबाबत महावितरणचे मानकर यांनी लक्ष देऊन रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आमदारांनी सुचविले. उर्वरित १० टक्के गावात राजूर, हिरापूर (नवीन), मूळगव्हाण, माथार्जून, मार्की, मुकुटबन, येदलापूर, धानोरा, दिग्रस येथील सरपंचांनी पाणी समस्या मांडल्या. पुढील बैठकीपूर्वी त्यांचे निरसन करण्यात येणार असल्याचे आमदारांनी सांगितले. पाणी पुरवठा विभागाचे जयस्वाल यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे आमदारांनी त्यांना चांगलेच खडसावले. (शहर प्रतिनिधी)केवळ बैठकच, अंमलबजावणी शून्ययेदलापूर येथील दयाकर गेडाम यांनी गावातील पाणी समस्येचा प्रश्न मांडला. सुरूवातीला ४० लाख रूपये मंजूर झाले. थातुरमाथूर काम झाले. मात्र गावात पाणी पोहोचले नाही. नेमके पाणी मुरले कुठे, असा प्रश्न त्यांनी केला. केवळ नेहमी बैठक होते. मात्र अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मांडवी येथे चार हातपंप असून दोन बंद आहे. शेतकऱ्यांनी बोअरवेल मारल्यामुळे गावातील दोन हातपंप बंद झाल्याचा आरोप उपसरपंच राजू गोंड्रावार यांनी केला.