शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आमदारांनी घेतली आढावा बैठक

By admin | Updated: December 6, 2015 02:25 IST

उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये, यासाठीच पूर्व नियोजन करण्यासाठी शुक्रवारी झरी पंचायत समिती सभागृहात आमदारांनी पाणी टंचाई आढावा बैठक घेतली.

अधिकाऱ्यांची खरडपट्टी : ९० टक्के गावे पाणी टंचाईमुक्त, मुकुटबनची समस्या कायमचमुकुटबन : उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये, यासाठीच पूर्व नियोजन करण्यासाठी शुक्रवारी झरी पंचायत समिती सभागृहात आमदारांनी पाणी टंचाई आढावा बैठक घेतली.आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कासावार, पंचायत समिती सभापती मिथुन सोयाम, पंचायत समिती सदस्य शीतल पंधरे, गटविकास अधिकारी बी.एम. मेघावत, तहसीलदार अशोक देवकर, अनिल पावडे, प्रवीण विधाते, सरपंच शंकर लाकडे, सहायक गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत बैठक्ीला उपस्थित होते. प्रथम मुकुटबनचा पाणी प्रश्न हाताळण्यात आला. येथे पाच वर्षांपासून भारत निर्माण प्रकल्प रखडलेला आहे. सध्या ग्रामस्थ फ्लोराईड युक्त पाणी पीत असल्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागतो. याबाबत वरिष्ठांना विचारपूस केल्यास ते कानाडोळा करतात, असे सरपंच लाकडे यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांना सभेतूनच फोन करून विचारले असता, निधी आहे पण कामात संथगती असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आमदार भडकले. त्यांनी येत्या २६ जानेवारीपर्यंत प्रकल्प सुरू करण्याचे आदेश दिले. यानंतर झरी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या सरपंच, सचिवांनी समस्या मांडल्या. त्यात जवळपास ९० टक्के गावे पाणी टंचाईपासून मुक्त असल्याचे आढळले. काही ठिकाणी विहिरी आहे, मात्र मोटार व केबलमुळे प्रकल्प रखडले आहे. याबाबत महावितरणचे मानकर यांनी लक्ष देऊन रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आमदारांनी सुचविले. उर्वरित १० टक्के गावात राजूर, हिरापूर (नवीन), मूळगव्हाण, माथार्जून, मार्की, मुकुटबन, येदलापूर, धानोरा, दिग्रस येथील सरपंचांनी पाणी समस्या मांडल्या. पुढील बैठकीपूर्वी त्यांचे निरसन करण्यात येणार असल्याचे आमदारांनी सांगितले. पाणी पुरवठा विभागाचे जयस्वाल यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे आमदारांनी त्यांना चांगलेच खडसावले. (शहर प्रतिनिधी)केवळ बैठकच, अंमलबजावणी शून्ययेदलापूर येथील दयाकर गेडाम यांनी गावातील पाणी समस्येचा प्रश्न मांडला. सुरूवातीला ४० लाख रूपये मंजूर झाले. थातुरमाथूर काम झाले. मात्र गावात पाणी पोहोचले नाही. नेमके पाणी मुरले कुठे, असा प्रश्न त्यांनी केला. केवळ नेहमी बैठक होते. मात्र अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मांडवी येथे चार हातपंप असून दोन बंद आहे. शेतकऱ्यांनी बोअरवेल मारल्यामुळे गावातील दोन हातपंप बंद झाल्याचा आरोप उपसरपंच राजू गोंड्रावार यांनी केला.