शहरं
Join us  
Trending Stories
1
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
2
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
3
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
4
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
5
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
6
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
7
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
8
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
9
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
10
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
11
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
12
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
13
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
14
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
15
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
16
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
17
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
18
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
19
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
20
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले

आमदारांनी घेतली आढावा बैठक

By admin | Updated: December 6, 2015 02:25 IST

उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये, यासाठीच पूर्व नियोजन करण्यासाठी शुक्रवारी झरी पंचायत समिती सभागृहात आमदारांनी पाणी टंचाई आढावा बैठक घेतली.

अधिकाऱ्यांची खरडपट्टी : ९० टक्के गावे पाणी टंचाईमुक्त, मुकुटबनची समस्या कायमचमुकुटबन : उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये, यासाठीच पूर्व नियोजन करण्यासाठी शुक्रवारी झरी पंचायत समिती सभागृहात आमदारांनी पाणी टंचाई आढावा बैठक घेतली.आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कासावार, पंचायत समिती सभापती मिथुन सोयाम, पंचायत समिती सदस्य शीतल पंधरे, गटविकास अधिकारी बी.एम. मेघावत, तहसीलदार अशोक देवकर, अनिल पावडे, प्रवीण विधाते, सरपंच शंकर लाकडे, सहायक गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत बैठक्ीला उपस्थित होते. प्रथम मुकुटबनचा पाणी प्रश्न हाताळण्यात आला. येथे पाच वर्षांपासून भारत निर्माण प्रकल्प रखडलेला आहे. सध्या ग्रामस्थ फ्लोराईड युक्त पाणी पीत असल्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागतो. याबाबत वरिष्ठांना विचारपूस केल्यास ते कानाडोळा करतात, असे सरपंच लाकडे यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांना सभेतूनच फोन करून विचारले असता, निधी आहे पण कामात संथगती असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आमदार भडकले. त्यांनी येत्या २६ जानेवारीपर्यंत प्रकल्प सुरू करण्याचे आदेश दिले. यानंतर झरी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या सरपंच, सचिवांनी समस्या मांडल्या. त्यात जवळपास ९० टक्के गावे पाणी टंचाईपासून मुक्त असल्याचे आढळले. काही ठिकाणी विहिरी आहे, मात्र मोटार व केबलमुळे प्रकल्प रखडले आहे. याबाबत महावितरणचे मानकर यांनी लक्ष देऊन रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आमदारांनी सुचविले. उर्वरित १० टक्के गावात राजूर, हिरापूर (नवीन), मूळगव्हाण, माथार्जून, मार्की, मुकुटबन, येदलापूर, धानोरा, दिग्रस येथील सरपंचांनी पाणी समस्या मांडल्या. पुढील बैठकीपूर्वी त्यांचे निरसन करण्यात येणार असल्याचे आमदारांनी सांगितले. पाणी पुरवठा विभागाचे जयस्वाल यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे आमदारांनी त्यांना चांगलेच खडसावले. (शहर प्रतिनिधी)केवळ बैठकच, अंमलबजावणी शून्ययेदलापूर येथील दयाकर गेडाम यांनी गावातील पाणी समस्येचा प्रश्न मांडला. सुरूवातीला ४० लाख रूपये मंजूर झाले. थातुरमाथूर काम झाले. मात्र गावात पाणी पोहोचले नाही. नेमके पाणी मुरले कुठे, असा प्रश्न त्यांनी केला. केवळ नेहमी बैठक होते. मात्र अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मांडवी येथे चार हातपंप असून दोन बंद आहे. शेतकऱ्यांनी बोअरवेल मारल्यामुळे गावातील दोन हातपंप बंद झाल्याचा आरोप उपसरपंच राजू गोंड्रावार यांनी केला.