शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
2
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
3
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
4
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
5
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
6
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
7
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
8
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
9
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
10
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
11
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
12
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
13
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
14
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
15
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
16
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
17
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
18
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
19
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
20
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराच्या दत्तक गावात दिव्यांगांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:24 IST

दुर्गम भागात राहात असलेल्या दिव्यांगांना त्यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती मिळावी यासाठी पंचायत समितीमध्ये महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी बैठक घेतली जाते. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित राहतात.

ठळक मुद्देसमाज कल्याण अधिकारी : पंचायत समितीत दिव्यांग बांधव ताटकळत

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : दुर्गम भागात राहात असलेल्या दिव्यांगांना त्यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती मिळावी यासाठी पंचायत समितीमध्ये महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी बैठक घेतली जाते. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित राहतात. उमरखेडमध्ये मात्र आमदारांच्या दत्तक गावातीलच दिव्यांगांची परवड सुरू आहे. समाज कल्याण अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत दिवसभर दिव्यांग ताटकळत होते.तालुक्यात विकास योजनांचा बट्ट्याबोळ सुरू आहे. प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक नाही. समाज कल्याण अधिकाºयांपुढे आपल्या योजनांच्या लाभातील अडचणी मांडाव्या यासाठी मोरचंडी व आकोली येथील दिव्यांग बांधव पंचायत समितीत पोहोचले. विशेष म्हणजे मोरचंडी हे गाव आमदार राजेंद्र नजरधने यांनी दत्तक घेतले आहे. त्यानंतरही येथील दिव्यांगांना आपला हक्क मिळविण्यासाठी तालुका पंचायत समिती कार्यालयात यावे लागले. महिन्याचा तिसरा मंगळवार असल्याने जिल्हा समाज कल्याण अधिकारी येतील व आपल्या अडचणी दूर करतील या आशेवर हे दिव्यांग बांधव दिवसभर बसून होते. मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता समाज कल्याण अधिकारी आलेच नाही. यामुळे दिव्यांग बांधवांची घोर निराशा झाली. दोनही पाय नसलेले दामू चव्हाण, उत्तम राठोड, सावित्री भुरके, दादाराव गाडेकर, आनंद पलकोंडवार, गजानन हाके, गणेश तिरकमदार, गुलाब जाधव या सर्व दिव्यांग बांधवांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र बजेट केले असून ठराविक निधी आरक्षित केला आहे. हा निधीच जाणीवपूर्वक खर्च केला जात नाही. दिव्यांगांना त्यांचा अधिकार देण्यात टाळाटाळ केली जाते. किमान हा प्रकार सत्ताधारी आमदाराच्या दत्तक गावातील दिव्यांगांबाबत होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी मुजोर झाल्याने कोणालाच जुमानत नसल्याचे दिसून येते.आमदारावर अधिकारी शिरजोरदत्तक ग्राम ही संकल्पना राज्य शसनाकडून राबविली जात आहे. आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घरपोच मिळावा, हा त्यामागचा उद्देश आहे. प्रत्यक्ष मात्र उमरखेड तालुक्यात आमदारांचेच दत्तक गावाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. त्यामुळेच दिव्यांग बांधवांना शारीरिक मर्यादा सहन करत आपल्या हक्कासाठी घराबाहेर पडावे लागत आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीgovernment schemeसरकारी योजना