शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

आमदाराच्या दत्तक गावात दिव्यांगांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:24 IST

दुर्गम भागात राहात असलेल्या दिव्यांगांना त्यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती मिळावी यासाठी पंचायत समितीमध्ये महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी बैठक घेतली जाते. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित राहतात.

ठळक मुद्देसमाज कल्याण अधिकारी : पंचायत समितीत दिव्यांग बांधव ताटकळत

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : दुर्गम भागात राहात असलेल्या दिव्यांगांना त्यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती मिळावी यासाठी पंचायत समितीमध्ये महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी बैठक घेतली जाते. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित राहतात. उमरखेडमध्ये मात्र आमदारांच्या दत्तक गावातीलच दिव्यांगांची परवड सुरू आहे. समाज कल्याण अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत दिवसभर दिव्यांग ताटकळत होते.तालुक्यात विकास योजनांचा बट्ट्याबोळ सुरू आहे. प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक नाही. समाज कल्याण अधिकाºयांपुढे आपल्या योजनांच्या लाभातील अडचणी मांडाव्या यासाठी मोरचंडी व आकोली येथील दिव्यांग बांधव पंचायत समितीत पोहोचले. विशेष म्हणजे मोरचंडी हे गाव आमदार राजेंद्र नजरधने यांनी दत्तक घेतले आहे. त्यानंतरही येथील दिव्यांगांना आपला हक्क मिळविण्यासाठी तालुका पंचायत समिती कार्यालयात यावे लागले. महिन्याचा तिसरा मंगळवार असल्याने जिल्हा समाज कल्याण अधिकारी येतील व आपल्या अडचणी दूर करतील या आशेवर हे दिव्यांग बांधव दिवसभर बसून होते. मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता समाज कल्याण अधिकारी आलेच नाही. यामुळे दिव्यांग बांधवांची घोर निराशा झाली. दोनही पाय नसलेले दामू चव्हाण, उत्तम राठोड, सावित्री भुरके, दादाराव गाडेकर, आनंद पलकोंडवार, गजानन हाके, गणेश तिरकमदार, गुलाब जाधव या सर्व दिव्यांग बांधवांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र बजेट केले असून ठराविक निधी आरक्षित केला आहे. हा निधीच जाणीवपूर्वक खर्च केला जात नाही. दिव्यांगांना त्यांचा अधिकार देण्यात टाळाटाळ केली जाते. किमान हा प्रकार सत्ताधारी आमदाराच्या दत्तक गावातील दिव्यांगांबाबत होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी मुजोर झाल्याने कोणालाच जुमानत नसल्याचे दिसून येते.आमदारावर अधिकारी शिरजोरदत्तक ग्राम ही संकल्पना राज्य शसनाकडून राबविली जात आहे. आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घरपोच मिळावा, हा त्यामागचा उद्देश आहे. प्रत्यक्ष मात्र उमरखेड तालुक्यात आमदारांचेच दत्तक गावाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. त्यामुळेच दिव्यांग बांधवांना शारीरिक मर्यादा सहन करत आपल्या हक्कासाठी घराबाहेर पडावे लागत आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीgovernment schemeसरकारी योजना