शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

पैसे खर्च करून शिका अन् वर्षभरच काम करा, तेही फुकट ! सरकारचा अजब निर्णय

By अविनाश साबापुरे | Updated: December 2, 2023 17:05 IST

फाॅरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांची बेरोजगारी १३ वर्षांपासून संपेना.

यवतमाळ : दिवसरात्र अभ्यास करून फाॅरेन्सिक तज्ज्ञ झालेले हजारो तरुण गेल्या तेरा वर्षांपासून बेरोजगार आहेत. त्यांच्या नोकरीसाठी कोणतेही पाऊल न उचलणाऱ्या सरकारने आता त्यांनी फुकटात काम करावे, असा अजब निर्णय घेतला आहे. वेळ आणि पैसा खर्चून पदव्या घेतलेल्या या तरुणांनी शासनाच्या फाॅरेन्सिक लॅबमध्ये विनामानधन काम करावे, असा निर्णय गृह विभागाने जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, ही संधी हजारो तरुणांपैकी केवळ १५२ जणांनाच दिली जाणार असून तीही केवळ एका वर्षापुरतीच. दुसरी वर्षी तेही बेरोजगार !

 किचकट गुन्ह्यांचा माग काढण्यासाठी फाॅरेन्सिक तज्ज्ञ गरजेचे असतात. एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना देशात १ लाख १४ हजार फाॅरेन्सिक तज्ज्ञांची कमतरता असल्याचे केंद्र शासनाने तीन वर्षांपूर्वी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात फाॅरेन्सिक सायन्सचे शिक्षण घेतलेले हजारो तरुण बेरोजगार असूनही त्यांना नोकऱ्या नाहीत. या पदवीचे शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात तीन ठिकाणी न्यायसहायक विज्ञान संस्था सुरू करण्यात आल्या. त्यापैकी मुंबई व छत्रपती संभाजीनगरमध्ये २००९ साली तर नागपूर येथे २०११ साली ही संस्था सुरू झाली.

त्यातून आजवर तीन हजारांवर तरुण-तरुणी फाॅरेन्सिक सायन्सचे पदवीधर होऊन बाहेर पडले आहेत. मात्र त्यांना कुठल्याही पदावर शासनाने नोकरीची संधी दिलेली नाही. त्यात भर म्हणून आता शासनाने ‘फुकटात काम करा अन् अनुभव प्रमाणपत्र मिळवा’ असा निर्णय २१ नोव्हेंबर रोजी जारी केल्याने बेरोजगारांच्या जखमेवर मिठ चोळले गेले. १३ वर्षांपूर्वी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यालाही आता फाॅरेन्सिक लॅबमध्ये विनामोबदला इंटर्नशिप करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, ही इंटर्नशिप संपल्यावर नोकरीची हमी राहणार नाही, असे या निर्णयातच स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना इतर राज्यात संधीच नाही :

महाराष्ट्रात बीएस्सी फाॅरेन्सिक सायन्स पदवी केलेल्या विद्यार्थ्यांना इतर राज्यातही नोकरीची संधी मिळत नाही. कारण इतर राज्यांमध्ये तेथे बीएस्सी फाॅरेन्सिक सायन्स असा कोर्सच नाही. तर तेथील लॅबमध्ये पदभरतीसाठी पदवीला केमिस्ट्री, बायोलाॅजी, फिजिक्स असे विषय बंधनकारक केले जातात. त्यामुळे महाराष्ट्रातील फाॅरेन्सिक लॅबमध्ये इंटर्नशिप देण्यापेक्षा कायमस्वरुपी जागा भराव्या, अशी मागणी बेरोजगारांनी केली आहे. 

४५ फाॅरेन्सिक व्हॅन कर्मचाऱ्यांविना:

राज्यात २०१७ साली गुन्ह्याच्या घटनास्थळाचा वैज्ञानिकदृष्ट्या पंचनामा करता यावा, यासाठी मोबाईल फाॅरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात आल्या. अशा ४५ व्हॅन सुरू करण्यात आल्या. त्या व्हॅनसाठी सर्व पदे कायमस्वरुपी मंजूर करण्यात आली होती. मात्र पहिल्या वर्षी केवळ ११ महिन्यांसाठी कंत्राटी भरती करण्यात आली. त्यानंतर ही पदे आजवर रिक्तच आहेत.

‘फाॅरेन्सिक’च्या बेरोजगारीची कारणे :

- हे शिक्षण गुन्हे तपासाशी संबंधित असल्याने रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. फाॅरेन्सिक लॅबशिवाय पर्याय नाही.

- फॉरेन्सिक लॅबकडून वेगवेगळी कारणे देऊन नव्या नियुक्त्यांना विरोध केला जात आहे.

- सेवाप्रवेश नियम सुधारणासाठी एमपीएससीने काढलेल्या त्रृटीचीही पूर्तता शासनाकडून करण्यात आली नाही.

- रोजगाराच्या नावाखाली केवळ एका वर्षाची इंटर्नशिप दिली जाते. त्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांना रोजगारासाठी तडफड करावी लागते.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ