शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

नेते झिजवताहेत मतदारांच्या घरांचे उंबरठे

By admin | Updated: October 28, 2015 02:37 IST

नगरपंचायतीची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. प्रचाराने जोर पडकला आहे.

मारेगाव : नगरपंचायतीची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. प्रचाराने जोर पडकला आहे. विविध पक्षांच्या दिग्गजांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई बनली असून एका-एका मतासाठी नेते मतदारांच्या घराचे उंबरठे झिजवताना दिसत आहे. मनसे वगळता इतर सर्वच पक्षांच्या राज्यस्तरीय नेत्यांनी प्रचाराकडे मात्र पाठ फिरविली आहे.यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत फारसा रस न घेणाऱ्या वणी विधानसभा क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी यावर्षी येथील नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेना व काँग्रेसच्या दिग्गजांनी तर उमेदवारी वाटपापासूनच ढवळाढवळ करायला सुरूवात केली. त्यामुळे काही प्रभागात स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी पसरून बंडखोरी झाली आहे. त्यांच्या बंडखोरीचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वणी विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे दिग्गज नेते एका-एका मतासाठी मतदारांच्या घराचे उंबरठे झिजवत आहे. काँग्रेसकडून माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, पंचायत समितीच्या माजी सभापती अरूणा खंडाळकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह प्रचार सुरू आहे. प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन आमचा पक्ष निवडून आल्यास शहराचा विकास कसा करणार, हे ते समजावून सांगत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नरेंद्र ठाकरे यांनी आम्ही स्वबळावर निवडून येऊ, असा दावा केला आहे.भाजपाने येथील नगरपंचायत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ येणार, असा दावा केला आहे. तसा विश्वास स्थानिक नेत्यांमध्ये आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार मतदारांच्या घरी जाऊन मतांचा जोगवा मागत आहे. या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही स्वबळावर सत्तेत येणार असल्याचा दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीने तूर्तास निवडणुकीत अनपेक्षितपणे आघाडी घेतल्याचे दिसत आहे. निवडणूक घोषित होण्यापूर्वी राष्ट्रवादी स्पर्धेत टिकणार नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून संजय देरकर यांनी प्रचारात प्रचंड मेहनत घेऊन चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे कुबड्यांच्या आधाराने आपण सत्तेत येवू, अशी आशा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. किमान पाच ते सहा जागा निश्चित मिळतील, अशी त्यांना अपेक्षा आहे. शिवसेना मात्र या निवडणुकीत अनपेक्षितपणे माघारल्याचे बोलले जात आहे. सुरूवातीला शिवसेनेकडे उमेदवारी मागणाऱ्यांची प्रचंड संख्या होती. त्यामुळे हा पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असेच सर्वत्र बोलले जात होते. मात्र उमेदवारी वाटपावरून झालेले मतभेद आणि नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेला ही निवडणूक जड जाण्याची चर्चा आहे. (शहर प्रतिनिधी)