शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

नेते झिजवताहेत मतदारांच्या घरांचे उंबरठे

By admin | Updated: October 28, 2015 02:37 IST

नगरपंचायतीची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. प्रचाराने जोर पडकला आहे.

मारेगाव : नगरपंचायतीची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. प्रचाराने जोर पडकला आहे. विविध पक्षांच्या दिग्गजांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई बनली असून एका-एका मतासाठी नेते मतदारांच्या घराचे उंबरठे झिजवताना दिसत आहे. मनसे वगळता इतर सर्वच पक्षांच्या राज्यस्तरीय नेत्यांनी प्रचाराकडे मात्र पाठ फिरविली आहे.यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत फारसा रस न घेणाऱ्या वणी विधानसभा क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी यावर्षी येथील नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेना व काँग्रेसच्या दिग्गजांनी तर उमेदवारी वाटपापासूनच ढवळाढवळ करायला सुरूवात केली. त्यामुळे काही प्रभागात स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी पसरून बंडखोरी झाली आहे. त्यांच्या बंडखोरीचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वणी विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे दिग्गज नेते एका-एका मतासाठी मतदारांच्या घराचे उंबरठे झिजवत आहे. काँग्रेसकडून माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, पंचायत समितीच्या माजी सभापती अरूणा खंडाळकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह प्रचार सुरू आहे. प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन आमचा पक्ष निवडून आल्यास शहराचा विकास कसा करणार, हे ते समजावून सांगत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नरेंद्र ठाकरे यांनी आम्ही स्वबळावर निवडून येऊ, असा दावा केला आहे.भाजपाने येथील नगरपंचायत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ येणार, असा दावा केला आहे. तसा विश्वास स्थानिक नेत्यांमध्ये आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार मतदारांच्या घरी जाऊन मतांचा जोगवा मागत आहे. या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही स्वबळावर सत्तेत येणार असल्याचा दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीने तूर्तास निवडणुकीत अनपेक्षितपणे आघाडी घेतल्याचे दिसत आहे. निवडणूक घोषित होण्यापूर्वी राष्ट्रवादी स्पर्धेत टिकणार नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून संजय देरकर यांनी प्रचारात प्रचंड मेहनत घेऊन चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे कुबड्यांच्या आधाराने आपण सत्तेत येवू, अशी आशा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. किमान पाच ते सहा जागा निश्चित मिळतील, अशी त्यांना अपेक्षा आहे. शिवसेना मात्र या निवडणुकीत अनपेक्षितपणे माघारल्याचे बोलले जात आहे. सुरूवातीला शिवसेनेकडे उमेदवारी मागणाऱ्यांची प्रचंड संख्या होती. त्यामुळे हा पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असेच सर्वत्र बोलले जात होते. मात्र उमेदवारी वाटपावरून झालेले मतभेद आणि नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेला ही निवडणूक जड जाण्याची चर्चा आहे. (शहर प्रतिनिधी)