शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

झरीत पट्टेदार वाघीण मृतावस्थेत आढळली

By admin | Updated: March 15, 2016 04:17 IST

पांढरकवडा वन विभागांतर्गत झरी तालुक्यात एका पट्टेदार वाघिनीचा कुजलेला मृतदेह सोमवारी सकाळी

झरीजामणी : पांढरकवडा वन विभागांतर्गत झरी तालुक्यात एका पट्टेदार वाघिनीचा कुजलेला मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला. या वाघिणीच्या शिकारीची बाब वन खात्याने स्पष्टपणे फेटाळून लावली असली तरी तिच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट न झाल्याने घातपाताची शंका कायम आहे. झरी तालुक्यातील बोपापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर वन विकास महामंडळाच्या पवनार येथील जंगलात कक्ष क्र. २३ मध्ये पाण्यात वाघिनीचा मृतदेह आढळला. स्वयंसेवी संस्थांचे सुरेश बावणे व राजू देवाळकर हे दोन कार्यकर्ते रविवारी सायंकाळी त्या भागात फिरत असताना त्यांना दुर्गंधी आली. त्यांनी याची कल्पना वन खात्याला दिली. त्यावरून मुकुटबनचे वन परिक्षेत्र अधिकारी रत्नपारखी यांनी रविवारी सकाळपासूनच दुर्गंधी येत असलेल्या दिशेने शोधमोहीम चालविली. तेव्हा एका पट्टेदार वाघिनीचा अर्धाअधिक कुजलेला मृतदेह पाण्यात आढळून आला. सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. सव्वा मीटर उंच आणि चार ते साडेचार वर्ष वयाच्या या वाघिनीची नखे, दात, कातडे शाबूत असल्याने शिकारीचा उद्देश नसावा, असे वन अधिकारी दाव्याने सांगत आहे. मात्र तिच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पांढरकवडा येथील उपवनसंरक्षक जी.गुरूप्रसाद (आयएफएस) यांच्या उपस्थितीत सदर वाघिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वाघिनीवर शिकारीच्या दृष्टीने विष प्रयोग करण्यात आला का, शेताच्या कुंपनाच्या तारेचा वीज स्पर्श होऊन मृत्यू झाला का, की पाण्यात बुडून मृत्यू झाला या सर्व पैलूंनी वन विभागाची यंत्रणा चौकशी करीत आहे. या वाघिनीचा नैसर्गिक मृत्यू झाला असण्याची शक्यताही वन अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.दरम्यान घटनास्थळी पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनाही पाचारण करण्यात आले. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.बावणे, डॉ.नाळे, बनसोड, डॉ.देवकर आदींनी वाघीणीच्या मृतदेहाचा पंचनामा केला. या घटनेने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. (शहर प्रतिनिधी) पांढरकवडा वन विभागात १० वाघांची नोंद४पांढरकवडा वन विभागांतर्गत विखुरलेल्या संरक्षित जंगलांमध्ये नऊ ते दहा वाघांचे अस्तित्व असल्याची नोंद वन विभागाच्या दप्तरी आहे. व्याघ्र गणनेमध्ये ती वारंवार सिद्ध झाली. या वाघिनीच्या मृत्यूने मात्र या विभागात पट्टेदार वाघांची संख्या घटली आहे. याशिवाय पांढरकवडा तालुक्यातच असलेल्या टिपेश्वर अभयारण्यामध्येसुद्धा १२ ते १६ वाघांचे अस्तित्व आढळून आले आहे. प्रत्यक्षात नोंद मात्र पाच ते सहाच वाघांची आहे. मानवाचे पाच बळी वाघाचा पहिलाच ४पांढरकवडा-वणी विभागांतर्गत वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत महिलांसह पाच शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. वाघाने शिकार केलेल्या पाळीव जनावरांची संख्या तर डझनाने आहे. या वाघांची झरी व वणी तालुक्यात सर्वाधिक दहशत पहायला मिळते. अनेक गावकऱ्यांना व्याघ्र दर्शन झाले आहे. त्यामुळे सायंकाळपूर्वीच शेतकरी-शेतमजूर घराची वाट धरतात. पांढरकवडा वन विभागात वाघिनीच्या मृत्यूचे मात्र हे पहिलेच प्रकरण आढळून आले आहे. पट्टेदार वाघिनीच्या मृत्यूचे नेमके कारण शोधले जात आहे. व्हिसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. शरीराचे सर्व भाग सुस्थितीत असल्याने शिकार नक्कीच नाही. - जी.गुरूप्रसादउपवनसंरक्षक, पांढरकवडा.