शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
2
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
3
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
4
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
5
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
6
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
7
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
8
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
9
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
10
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
11
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
12
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
13
"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
14
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
15
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
16
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
17
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
18
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
19
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
20
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
Daily Top 2Weekly Top 5

नव्या तरुणांकडे नेतृत्व द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:46 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शासनकर्ती जमात व्हा, असा संदेश दिला. अनेक जण शासनात गेलेही, पण अनेकांनी केवळ ‘लिडरशिप’ करण्यात धन्यता मानली.

ठळक मुद्देचंद्रकांत हंडोरे : आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलनाचे उद्घाटन

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शासनकर्ती जमात व्हा, असा संदेश दिला. अनेक जण शासनात गेलेही, पण अनेकांनी केवळ ‘लिडरशिप’ करण्यात धन्यता मानली. आता ६५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नेत्यांना बाद करा आणि बाबासाहेबांच्या विचारांना मानणाºया तरुणांकडे नेतृत्व द्या, असे आवाहन माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले.शनिवारी येथील बचत भवनात दुसऱ्या आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष प्रसेनजित ताकसांडे, प्रमुख अतिथी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, स्वागताध्यक्ष संजय मानकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, हेमंत कांबळे, आनंद गायकवाड, भीमशक्ती संघटनेचे अविनाश भगत, सुनिल भेले, बळी खैरे आदी उपस्थित होते.यावेळी हंडोरे म्हणाले, अशा साहित्य संमेलनातून श्रमिकांच्या वेदना समोर आल्या पाहिजे. आरक्षणातून होणाºया पदोन्नत्या थांबविण्याच्या हालचाली सुरू आहे. रिक्त जागा रद्द करण्याचा डाव आखला जात आहे. अशावेळी आपली भूमिका मांडून श्रमिकांच्या प्रश्नांना वाचा फोडलीच पाहिजे.विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले, शेतमजुरांचे जगणे मी स्वत: पाहिले आहे. पण आजही श्रमिकांना कष्टमय जीवन जगावे लागत आहे. आरक्षित प्रवर्गातील गुणवंतांना सध्या खुल्या गटातून अर्ज करण्यावर बंदी घातली जात आहे. आरक्षणाचा लाभ मिळू नये म्हणून खासगीकरण वाढविले जात आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी श्रमिक संमेलनातून आवाज उठविला जावा.संमेलनाध्यक्ष प्रसेनजित ताकसांडे म्हणाले, सौंदर्यवादी साहित्यिकांनी लेखक आणि जनता यात दुरावा निर्माण केला. मी केवळ माझ्या आनंदासाठी लिहितो असे म्हणण्यात काही अर्थ नाही. समाजाच्या भल्यासाठीच साहित्यिकांनी लेखन केले पाहिजे.प्रास्ताविक आनंद गायकवाड यांनी केले. संचालन सुनिल वासनिक यांनी केले. तर आभार सुमेध ठमके यांनी मानले. संदेश वाचन संदीप नगराळे, साहेबराव कदम यांनी केले. यावेळी बळी खैरे आणि संजय ओरके यांच्या ‘पोस्टर पोएट्री’ या आगळ्या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रा. संजय वानरे, प्रेम हनुवते, प्रा. विलास भवरे, कवडुजी नगराळे, दिलीप भोजराज, भाई सुकदाने, अविनाश भगत, प्रा. अशोक कांबळे, अ‍ॅड. प्रदीप वानखडे, गोपीचंद कांबळे, सतीश राणा, संजय ढोले, प्रा. युवराज मानकर, सुनील पुनवटकर, संजय बोरकर, डॉ. सुभाष जमधाडे, भीमराव गायकवाड, दीपक नगराळे, अजय गोरकार, आनंद डोंगरे, सरस्वती जोगळेकर, ज्योती खोब्रागडे, मालती गायकवाड, रंजना ताकसांडे, सुषमा डोंगरे आदींची उपस्थिती होती.