शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नव्या तरुणांकडे नेतृत्व द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:46 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शासनकर्ती जमात व्हा, असा संदेश दिला. अनेक जण शासनात गेलेही, पण अनेकांनी केवळ ‘लिडरशिप’ करण्यात धन्यता मानली.

ठळक मुद्देचंद्रकांत हंडोरे : आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलनाचे उद्घाटन

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शासनकर्ती जमात व्हा, असा संदेश दिला. अनेक जण शासनात गेलेही, पण अनेकांनी केवळ ‘लिडरशिप’ करण्यात धन्यता मानली. आता ६५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नेत्यांना बाद करा आणि बाबासाहेबांच्या विचारांना मानणाºया तरुणांकडे नेतृत्व द्या, असे आवाहन माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले.शनिवारी येथील बचत भवनात दुसऱ्या आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष प्रसेनजित ताकसांडे, प्रमुख अतिथी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, स्वागताध्यक्ष संजय मानकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, हेमंत कांबळे, आनंद गायकवाड, भीमशक्ती संघटनेचे अविनाश भगत, सुनिल भेले, बळी खैरे आदी उपस्थित होते.यावेळी हंडोरे म्हणाले, अशा साहित्य संमेलनातून श्रमिकांच्या वेदना समोर आल्या पाहिजे. आरक्षणातून होणाºया पदोन्नत्या थांबविण्याच्या हालचाली सुरू आहे. रिक्त जागा रद्द करण्याचा डाव आखला जात आहे. अशावेळी आपली भूमिका मांडून श्रमिकांच्या प्रश्नांना वाचा फोडलीच पाहिजे.विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले, शेतमजुरांचे जगणे मी स्वत: पाहिले आहे. पण आजही श्रमिकांना कष्टमय जीवन जगावे लागत आहे. आरक्षित प्रवर्गातील गुणवंतांना सध्या खुल्या गटातून अर्ज करण्यावर बंदी घातली जात आहे. आरक्षणाचा लाभ मिळू नये म्हणून खासगीकरण वाढविले जात आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी श्रमिक संमेलनातून आवाज उठविला जावा.संमेलनाध्यक्ष प्रसेनजित ताकसांडे म्हणाले, सौंदर्यवादी साहित्यिकांनी लेखक आणि जनता यात दुरावा निर्माण केला. मी केवळ माझ्या आनंदासाठी लिहितो असे म्हणण्यात काही अर्थ नाही. समाजाच्या भल्यासाठीच साहित्यिकांनी लेखन केले पाहिजे.प्रास्ताविक आनंद गायकवाड यांनी केले. संचालन सुनिल वासनिक यांनी केले. तर आभार सुमेध ठमके यांनी मानले. संदेश वाचन संदीप नगराळे, साहेबराव कदम यांनी केले. यावेळी बळी खैरे आणि संजय ओरके यांच्या ‘पोस्टर पोएट्री’ या आगळ्या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रा. संजय वानरे, प्रेम हनुवते, प्रा. विलास भवरे, कवडुजी नगराळे, दिलीप भोजराज, भाई सुकदाने, अविनाश भगत, प्रा. अशोक कांबळे, अ‍ॅड. प्रदीप वानखडे, गोपीचंद कांबळे, सतीश राणा, संजय ढोले, प्रा. युवराज मानकर, सुनील पुनवटकर, संजय बोरकर, डॉ. सुभाष जमधाडे, भीमराव गायकवाड, दीपक नगराळे, अजय गोरकार, आनंद डोंगरे, सरस्वती जोगळेकर, ज्योती खोब्रागडे, मालती गायकवाड, रंजना ताकसांडे, सुषमा डोंगरे आदींची उपस्थिती होती.