शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नव्या तरुणांकडे नेतृत्व द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:46 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शासनकर्ती जमात व्हा, असा संदेश दिला. अनेक जण शासनात गेलेही, पण अनेकांनी केवळ ‘लिडरशिप’ करण्यात धन्यता मानली.

ठळक मुद्देचंद्रकांत हंडोरे : आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलनाचे उद्घाटन

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शासनकर्ती जमात व्हा, असा संदेश दिला. अनेक जण शासनात गेलेही, पण अनेकांनी केवळ ‘लिडरशिप’ करण्यात धन्यता मानली. आता ६५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नेत्यांना बाद करा आणि बाबासाहेबांच्या विचारांना मानणाºया तरुणांकडे नेतृत्व द्या, असे आवाहन माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले.शनिवारी येथील बचत भवनात दुसऱ्या आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष प्रसेनजित ताकसांडे, प्रमुख अतिथी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, स्वागताध्यक्ष संजय मानकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, हेमंत कांबळे, आनंद गायकवाड, भीमशक्ती संघटनेचे अविनाश भगत, सुनिल भेले, बळी खैरे आदी उपस्थित होते.यावेळी हंडोरे म्हणाले, अशा साहित्य संमेलनातून श्रमिकांच्या वेदना समोर आल्या पाहिजे. आरक्षणातून होणाºया पदोन्नत्या थांबविण्याच्या हालचाली सुरू आहे. रिक्त जागा रद्द करण्याचा डाव आखला जात आहे. अशावेळी आपली भूमिका मांडून श्रमिकांच्या प्रश्नांना वाचा फोडलीच पाहिजे.विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले, शेतमजुरांचे जगणे मी स्वत: पाहिले आहे. पण आजही श्रमिकांना कष्टमय जीवन जगावे लागत आहे. आरक्षित प्रवर्गातील गुणवंतांना सध्या खुल्या गटातून अर्ज करण्यावर बंदी घातली जात आहे. आरक्षणाचा लाभ मिळू नये म्हणून खासगीकरण वाढविले जात आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी श्रमिक संमेलनातून आवाज उठविला जावा.संमेलनाध्यक्ष प्रसेनजित ताकसांडे म्हणाले, सौंदर्यवादी साहित्यिकांनी लेखक आणि जनता यात दुरावा निर्माण केला. मी केवळ माझ्या आनंदासाठी लिहितो असे म्हणण्यात काही अर्थ नाही. समाजाच्या भल्यासाठीच साहित्यिकांनी लेखन केले पाहिजे.प्रास्ताविक आनंद गायकवाड यांनी केले. संचालन सुनिल वासनिक यांनी केले. तर आभार सुमेध ठमके यांनी मानले. संदेश वाचन संदीप नगराळे, साहेबराव कदम यांनी केले. यावेळी बळी खैरे आणि संजय ओरके यांच्या ‘पोस्टर पोएट्री’ या आगळ्या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रा. संजय वानरे, प्रेम हनुवते, प्रा. विलास भवरे, कवडुजी नगराळे, दिलीप भोजराज, भाई सुकदाने, अविनाश भगत, प्रा. अशोक कांबळे, अ‍ॅड. प्रदीप वानखडे, गोपीचंद कांबळे, सतीश राणा, संजय ढोले, प्रा. युवराज मानकर, सुनील पुनवटकर, संजय बोरकर, डॉ. सुभाष जमधाडे, भीमराव गायकवाड, दीपक नगराळे, अजय गोरकार, आनंद डोंगरे, सरस्वती जोगळेकर, ज्योती खोब्रागडे, मालती गायकवाड, रंजना ताकसांडे, सुषमा डोंगरे आदींची उपस्थिती होती.