शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जातविहीन समाज व्यवस्थेसाठी कायदा आवश्यक

By admin | Updated: March 2, 2015 02:10 IST

जातविहीन समाज रचना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना होती. तो मानवतेचा लढा होता. जातीच्या बंधनातून मुक्त होण्याचा हा लढा महात्मा फुलेंनी सुरू केला.

यवतमाळ : जातविहीन समाज रचना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना होती. तो मानवतेचा लढा होता. जातीच्या बंधनातून मुक्त होण्याचा हा लढा महात्मा फुलेंनी सुरू केला. तो पुढे शाहू महाराजांनी चालविला आणि त्या लढ्याला बाबासाहेबांनी कायदेशीर स्वरूप दिले, असे मत अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले. पांढरकवडा येथील जनपतकर गुरूजींच्या सत्कार सोहळ््याला आले असता ते यवतमाळातील विश्रामगृहात शनिवारी दुपारी पत्रकारांशी बोलत होते. अ‍ॅड़ आंबेडकर म्हणाले जातीने आम्हाला कधीही प्रतिष्ठा दिली नाही. जोपर्यंत इथल्या जाती नष्ट होत नाही तोपर्यंत हा देश उभा राहू शकत नाही. आपल्याला आता नव्या टप्प्याची सुरूवात करावी लागेल. त्यासाठी येथील जात नष्ट होण्याची गरज आहे. या लढ्याला किती दिवस लागतील हे आपण सांगू शकत नाही. ज्या दिवशी भावनिक बाबासाहेबांबरोबर वैचारिक बाबासाहेब सांगायला प्रारंभ होईल, त्यादिवशी आंबेडकरी चळवळ विकसीत होईल. जातीबाबात बोलताना ते म्हणाले, जातीव्यवस्था आपल्या मनात एवढी भिनली आहे की, जे जातीचे नाहीत त्यांच्या बाबतीत आपण एकतर न्युट्रल राहतो, विराध करतो किंवा व्देष करतो. आज स्वातंत्र्य असले तरी देशबांधवात आपुलकीची भावना दिसत नाही. जातीय राजकीय नेतृत्व संपणार आहे. पार्टीच्या विरोधात भूमिका शेवटचा नेता म्हणून अटलबिहारी वाजपेयींचा उल्लेख करता येईल. राजकीय व्यवस्थेत नव्या पिढीला नव्या सामाजिक आशयाचा अजेंडा मांडायला आम्ही तयार असून, त्यासाठी जात नसावी हे आमचे पहिले पाऊल असेल. कायद्याने स्त्री-पुरूष समान असूनही महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे. संशोधन क्षेत्रात खास करून महिलांचा दबदबा आहे. तसेच अ‍ॅथलेटीक्स आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातही त्यांचे भरिव योगदान राहिले आहे. अनेक कुटुंबांची ओळख त्या महिलेच्या कतृत्वामुळे आहे. त्यानंतरही पुरूषप्रधान संस्कृतीमुळे पाल्यांना बापाचीच जात लावली जाते. प्रेमविवाह करणाऱ्या मुलांसाठी जातीचा कॉलम वगळण्यात यावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल इत्यादी संघटनांनीही या प्रश्नावर स्वत:ची भूमिका स्पष्ट केली तर चर्चा घडून येईल. विचारांची घुसळण होऊन दिशा ठरेल. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)