शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

जातविहीन समाज व्यवस्थेसाठी कायदा आवश्यक

By admin | Updated: March 2, 2015 02:10 IST

जातविहीन समाज रचना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना होती. तो मानवतेचा लढा होता. जातीच्या बंधनातून मुक्त होण्याचा हा लढा महात्मा फुलेंनी सुरू केला.

यवतमाळ : जातविहीन समाज रचना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना होती. तो मानवतेचा लढा होता. जातीच्या बंधनातून मुक्त होण्याचा हा लढा महात्मा फुलेंनी सुरू केला. तो पुढे शाहू महाराजांनी चालविला आणि त्या लढ्याला बाबासाहेबांनी कायदेशीर स्वरूप दिले, असे मत अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले. पांढरकवडा येथील जनपतकर गुरूजींच्या सत्कार सोहळ््याला आले असता ते यवतमाळातील विश्रामगृहात शनिवारी दुपारी पत्रकारांशी बोलत होते. अ‍ॅड़ आंबेडकर म्हणाले जातीने आम्हाला कधीही प्रतिष्ठा दिली नाही. जोपर्यंत इथल्या जाती नष्ट होत नाही तोपर्यंत हा देश उभा राहू शकत नाही. आपल्याला आता नव्या टप्प्याची सुरूवात करावी लागेल. त्यासाठी येथील जात नष्ट होण्याची गरज आहे. या लढ्याला किती दिवस लागतील हे आपण सांगू शकत नाही. ज्या दिवशी भावनिक बाबासाहेबांबरोबर वैचारिक बाबासाहेब सांगायला प्रारंभ होईल, त्यादिवशी आंबेडकरी चळवळ विकसीत होईल. जातीबाबात बोलताना ते म्हणाले, जातीव्यवस्था आपल्या मनात एवढी भिनली आहे की, जे जातीचे नाहीत त्यांच्या बाबतीत आपण एकतर न्युट्रल राहतो, विराध करतो किंवा व्देष करतो. आज स्वातंत्र्य असले तरी देशबांधवात आपुलकीची भावना दिसत नाही. जातीय राजकीय नेतृत्व संपणार आहे. पार्टीच्या विरोधात भूमिका शेवटचा नेता म्हणून अटलबिहारी वाजपेयींचा उल्लेख करता येईल. राजकीय व्यवस्थेत नव्या पिढीला नव्या सामाजिक आशयाचा अजेंडा मांडायला आम्ही तयार असून, त्यासाठी जात नसावी हे आमचे पहिले पाऊल असेल. कायद्याने स्त्री-पुरूष समान असूनही महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे. संशोधन क्षेत्रात खास करून महिलांचा दबदबा आहे. तसेच अ‍ॅथलेटीक्स आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातही त्यांचे भरिव योगदान राहिले आहे. अनेक कुटुंबांची ओळख त्या महिलेच्या कतृत्वामुळे आहे. त्यानंतरही पुरूषप्रधान संस्कृतीमुळे पाल्यांना बापाचीच जात लावली जाते. प्रेमविवाह करणाऱ्या मुलांसाठी जातीचा कॉलम वगळण्यात यावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल इत्यादी संघटनांनीही या प्रश्नावर स्वत:ची भूमिका स्पष्ट केली तर चर्चा घडून येईल. विचारांची घुसळण होऊन दिशा ठरेल. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)