शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पुसद उपविभागातील सहकाराला अखेरची घरघर

By admin | Updated: August 20, 2014 23:47 IST

उपविभागातील सहकार क्षेत्राला पुढाऱ्यांच्या उदासीनतेने अखेरची घरघर लागल्याचे दिसत आहे. सहकारातील कारखाने, सोसायट्या डबघाईस आल्या आहे. शोकडो हातांना काम देणारे कारखाने

पुसद : उपविभागातील सहकार क्षेत्राला पुढाऱ्यांच्या उदासीनतेने अखेरची घरघर लागल्याचे दिसत आहे. सहकारातील कारखाने, सोसायट्या डबघाईस आल्या आहे. शोकडो हातांना काम देणारे कारखाने बंद झाल्याने उपविभागातील शेकडो कुटुंब रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होत आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही गाव सोडून दुसरीकडे धाव घ्यावी लागत आहे. पुसद उपविभाग राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात सुपरिचित आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या देदीप्यमान ११ वर्षांच्या कारकिर्दीने तर पुसदला देशाच्या नकाशावर नेऊन पोहोचविले. पुसद उपविभाग आदिवासी वाड्या व बंजारा तांड्यांनी बहरलेला आहे. माजी मुख्यमंत्रीद्वय वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या द्रष्टेपणातून वसंत सहकारी साखर कारखाना, पोफाळी, सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना, गुंज तसेच पुसद येथे जिल्हा सहकारी सूत गिरणी आदींची उभारणी करण्यात आली होती. मात्र या सहकार क्षेत्राला अखेरची घरघर लागली आहे. अपवाद पोफाळीचा वसंत साखर कारखाना आहे. पुसदची सूत गिरणी अनेक वर्षांपासून पूर्णत: बंद असून येथील तब्बल १ हजार २०० कामगारांचे संसार उघड्यावर पडले आहेत, हे विशेष.तसेच माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्याला उद्योगधंद्यांची निर्मिती व्हावी, या हेतूने सन १९९२ मध्ये एमआयडीसी निर्माण करण्याचा निर्णय घेतला. परंतु पुसदला लाल दिवा सातत्याने असूनही पुसदची एमआयडीसी अद्यापही विकसित झाली नाही, हे वास्तव आहे. त्यामुळेच नाईलाजाने गरीब कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी कामासाठी परजिल्हा व परप्रांतातही जावे लागत आहे.मजुरांच्या मोठ्या प्रमाणात स्थलांतराने त्यांच्या चिमुकल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनातर्फे मजुरांच्या मुलामुलींकरिता चालविण्यात येणारी हंगामी वसतिगृहेदेखील आता शासनाने बंद केली असून मजूरवर्ग आपल्या पाल्यांना सोबत घेवूनच कामाला जात असल्याचे चित्र सर्वदूर आहे. राजकारणी लोक आपल्याच विश्वात मश्गूल असल्याने आम्हाला नाईलाजाने घर सोडावे लागत असल्याची खंत दुसऱ्या मजुराने व्यक्त केली. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर पुसदची एमआयडीसी व सहकार क्षेत्राला नवीन उजाळा दिल्या जाऊ शकतो. तसेच शेतीला पूरक जोडधंद्यांसाठीही लोकांना प्रोत्साहीत करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्या तोंडून या निमित्ताने बाहेर पडत आहेत. त्या ऐकून तरी लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करून पुढाकार घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)