शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

पुसद उपविभागातील सहकाराला अखेरची घरघर

By admin | Updated: August 20, 2014 23:47 IST

उपविभागातील सहकार क्षेत्राला पुढाऱ्यांच्या उदासीनतेने अखेरची घरघर लागल्याचे दिसत आहे. सहकारातील कारखाने, सोसायट्या डबघाईस आल्या आहे. शोकडो हातांना काम देणारे कारखाने

पुसद : उपविभागातील सहकार क्षेत्राला पुढाऱ्यांच्या उदासीनतेने अखेरची घरघर लागल्याचे दिसत आहे. सहकारातील कारखाने, सोसायट्या डबघाईस आल्या आहे. शोकडो हातांना काम देणारे कारखाने बंद झाल्याने उपविभागातील शेकडो कुटुंब रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होत आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही गाव सोडून दुसरीकडे धाव घ्यावी लागत आहे. पुसद उपविभाग राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात सुपरिचित आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या देदीप्यमान ११ वर्षांच्या कारकिर्दीने तर पुसदला देशाच्या नकाशावर नेऊन पोहोचविले. पुसद उपविभाग आदिवासी वाड्या व बंजारा तांड्यांनी बहरलेला आहे. माजी मुख्यमंत्रीद्वय वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या द्रष्टेपणातून वसंत सहकारी साखर कारखाना, पोफाळी, सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना, गुंज तसेच पुसद येथे जिल्हा सहकारी सूत गिरणी आदींची उभारणी करण्यात आली होती. मात्र या सहकार क्षेत्राला अखेरची घरघर लागली आहे. अपवाद पोफाळीचा वसंत साखर कारखाना आहे. पुसदची सूत गिरणी अनेक वर्षांपासून पूर्णत: बंद असून येथील तब्बल १ हजार २०० कामगारांचे संसार उघड्यावर पडले आहेत, हे विशेष.तसेच माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्याला उद्योगधंद्यांची निर्मिती व्हावी, या हेतूने सन १९९२ मध्ये एमआयडीसी निर्माण करण्याचा निर्णय घेतला. परंतु पुसदला लाल दिवा सातत्याने असूनही पुसदची एमआयडीसी अद्यापही विकसित झाली नाही, हे वास्तव आहे. त्यामुळेच नाईलाजाने गरीब कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी कामासाठी परजिल्हा व परप्रांतातही जावे लागत आहे.मजुरांच्या मोठ्या प्रमाणात स्थलांतराने त्यांच्या चिमुकल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनातर्फे मजुरांच्या मुलामुलींकरिता चालविण्यात येणारी हंगामी वसतिगृहेदेखील आता शासनाने बंद केली असून मजूरवर्ग आपल्या पाल्यांना सोबत घेवूनच कामाला जात असल्याचे चित्र सर्वदूर आहे. राजकारणी लोक आपल्याच विश्वात मश्गूल असल्याने आम्हाला नाईलाजाने घर सोडावे लागत असल्याची खंत दुसऱ्या मजुराने व्यक्त केली. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर पुसदची एमआयडीसी व सहकार क्षेत्राला नवीन उजाळा दिल्या जाऊ शकतो. तसेच शेतीला पूरक जोडधंद्यांसाठीही लोकांना प्रोत्साहीत करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्या तोंडून या निमित्ताने बाहेर पडत आहेत. त्या ऐकून तरी लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करून पुढाकार घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)