शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ंएमआयडीसीतील उद्योग मोजताहे अखेरच्या घटका

By admin | Updated: October 28, 2015 02:41 IST

बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या येथील एमआयडीसीतील उद्योगांवर भारनियमन आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अवकळा आली आहे.

सुविधांचा अभाव : भारनियमन, अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा फटकाअखिलेश अग्रवाल पुसद बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या येथील एमआयडीसीतील उद्योगांवर भारनियमन आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अवकळा आली आहे. बहुतांश सर्वच उद्योग अखेरच्या घटका मोजत असून प्रशासकीय यंत्रणेच्या निष्क्रियतेने औद्योगिक विकासाचे स्वप्न भंगले आहे. पुसद येथे १९९२-९३ मध्ये औद्योगिक वसाहत मंजूर झाली. दिग्रस मार्गावरील धुंदी घाटोळी परिसरात १६९ हेक्टर भूखंड घेण्यात आला. मुख्य रस्त्यालगत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असा मोठा फलक लावला आहे. फलकापासून दूरवर दिसणारी ओसाड जमीन आणि औद्योगिक वसाहत आपली व्यथा सांगताना दिसत आहे. उद्योगाच्या घरी रिद्धीसिद्धी पाणी भरी, असे म्हणतात, परंतु औद्योगिक वसाहतीत कोणी चिटपाखरुही फिरकताना दिसत नाही. या संपूर्ण परिसरात पसरलेली उदासीनता क्षणाक्षणाला जाणवते. सरकारी नोकरीचा ध्यास लावून बसलेल्या तरुणांना शासनाने उद्योजक होण्याचे आवाहन केले. परंतु येथील एमआयडीसी उद्योगासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गरजांची पूर्तताच केली नाही. त्यामुळे एमआयडीसीतील ९० टक्के भूखंड रिकामे आहे. सुरुवातीचे सहा वर्षतर या परिसरात एकही उद्योग आला नाही. १६ वर्षानंतरही येथे मोठा उद्योग उभा झाला नाही. एका उद्योजकाने निंबाळी खताचा उद्योग उभारला. त्यानंतर हळूहळू ३० उद्योग या ठिकाणी सुरू झाले. त्यात आईस फॅक्टरी, बायोकोल, मिनरल वॉटर पॅकिंग प्लाँट, कागद कारखाना, जिनिंग, सिमेंट वॉटर टँक, वीज खांब निर्मिती उद्योग, दूध डेअरी आदींचा समावेश आहे. सुरुवातीला भरभराटीस आलेल्या या उद्योगांना अलिकडे भारनियमनाचा मोठा फटका सहन करावा लागतो. कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने मशनरी नष्ट होण्याची भीती असते. तसेच उद्योगासाठी लागणारा पाणीपुरवठाही अनियमित आहे. त्यामुळे पाण्याचा साठा करावा लागतो. परंतु तेही शक्य होत नाही. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या आग्रहास्तव पुसदच्या एमआयडीसीला स्पेशल दर्जा देण्यात आला. परंतु सुविधा मात्र मिळाल्या नाही. या एमआयडीसीत विजेसाठी अतिरिक्त फिडरची गरज आहे. परंतु ही व्यवस्था येथे नसल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. वीज समस्येबाबत येथील उद्योजकांनी वारंवार वरिष्ठांना कळविले. परंतु कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे आता तर अनेकांनी येथील उद्योग गुंडाळण्याची तयारी चालविली आहे. यामुळे येथील उद्योगाला अखेरची घरघर लागली आहे.