शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

तरुणाला ट्रकने चिरडल्याने लासिनात चक्काजाम

By admin | Updated: March 8, 2015 02:02 IST

घराच्या अंगणात उभ्या असलेल्या एका तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील लासिना येथे शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली.

नेर/सोनखास : घराच्या अंगणात उभ्या असलेल्या एका तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील लासिना येथे शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी चक्काजाम करून आठ ट्रकची तोडफोड केली. तर, अपघातानंतर पळून जाताना ट्रकने येलगुंडा येथे पाच गार्इंनाही चिरडून ठार केले. लासिना येथे तब्बल तीन तास चक्काजाम करण्यात आला. अभय गौतम सोनोने (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. अभयचे घर यवतमाळ-अमरावती राज्यमार्गालगत आहे. शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास तो घराच्या अंगणात उभा होता. त्यावेळी चंद्रपूरवरून अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रकने (एम.एच.३४/७९६१) निंबाच्या झाडाला धडक देत अंगणात शिरून अभयला चिरडले. यात तो जागीच ठार झाला. हा प्रकार माहीत होताच गावकऱ्यांनी ट्रकचा पाठलाग केला. मात्र ट्रकचालक ट्रक घेऊन पळून गेला. ट्रक भरधाव वेगाने जात असताना नेरजवळील येलगुंडा येथे रस्त्यावरून जाणाऱ्या पाच गार्इंना चिरडले. गणेश राठोड, सुभाष राठोड, विष्णू राठोड, नीळकंठ महानोर यांच्या मालकीच्या त्या गाई होत्या. या घटनेची माहिती नेर पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार गणेश भावसार, जमादार हरिशचंद्र कार, राजेश चौधरी, महेश तडसे, राजेश भगत, जीवन राठोड, अशोक चव्हाण यांनी हा ट्रक मोठ्या प्रयत्नाने अडवून ताब्यात घेतला. पोलिसांनी ट्रकचालक मोहमद अनिस रा.कोपा जि. प्रतापगड (मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले.तर लासिना येथे संतप्त नागरिकांनी चक्काजाम सुरू केला. या ठिकाणी थांबलेल्या आठ ते नऊ ट्रकच्या काचा फोडण्यात आल्या. तर काही वाहनातील हवा सोडून दिली. यामुळे लासिना येथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. नागरिक लासिना येथे गतिरोधक देण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी करीत होते. अपघातानंतर दीड तासपर्यंत लाडखेड पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यानंतर काही पोलीस कर्मचारी घटनास्थळावर आले. तर यवतमाळ येथून वाहतूक शाखा आणि दंगल नियंत्रण पथक लासिना येथे पोहचले. तरुणाला चिरडणारा ट्रक हा चढ्ढा कंपनीचा असून संतप्त नागरिकांना याच कंपनीच्या ट्रकला लक्ष करीत त्यांच्या काचा फोडल्यात. दरम्यान, बांधकाम विभागाचे एम.आर. राठी यांनी गावकऱ्यांना सोमवारपर्यंत गतिरोधक बांधून देण्याचे आश्वासन दिल्याने चक्काजाम मागे घेतला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.(तालुका प्रतिनिधी)