शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

तरुणाला ट्रकने चिरडल्याने लासिनात चक्काजाम

By admin | Updated: March 8, 2015 02:02 IST

घराच्या अंगणात उभ्या असलेल्या एका तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील लासिना येथे शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली.

नेर/सोनखास : घराच्या अंगणात उभ्या असलेल्या एका तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील लासिना येथे शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी चक्काजाम करून आठ ट्रकची तोडफोड केली. तर, अपघातानंतर पळून जाताना ट्रकने येलगुंडा येथे पाच गार्इंनाही चिरडून ठार केले. लासिना येथे तब्बल तीन तास चक्काजाम करण्यात आला. अभय गौतम सोनोने (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. अभयचे घर यवतमाळ-अमरावती राज्यमार्गालगत आहे. शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास तो घराच्या अंगणात उभा होता. त्यावेळी चंद्रपूरवरून अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रकने (एम.एच.३४/७९६१) निंबाच्या झाडाला धडक देत अंगणात शिरून अभयला चिरडले. यात तो जागीच ठार झाला. हा प्रकार माहीत होताच गावकऱ्यांनी ट्रकचा पाठलाग केला. मात्र ट्रकचालक ट्रक घेऊन पळून गेला. ट्रक भरधाव वेगाने जात असताना नेरजवळील येलगुंडा येथे रस्त्यावरून जाणाऱ्या पाच गार्इंना चिरडले. गणेश राठोड, सुभाष राठोड, विष्णू राठोड, नीळकंठ महानोर यांच्या मालकीच्या त्या गाई होत्या. या घटनेची माहिती नेर पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार गणेश भावसार, जमादार हरिशचंद्र कार, राजेश चौधरी, महेश तडसे, राजेश भगत, जीवन राठोड, अशोक चव्हाण यांनी हा ट्रक मोठ्या प्रयत्नाने अडवून ताब्यात घेतला. पोलिसांनी ट्रकचालक मोहमद अनिस रा.कोपा जि. प्रतापगड (मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले.तर लासिना येथे संतप्त नागरिकांनी चक्काजाम सुरू केला. या ठिकाणी थांबलेल्या आठ ते नऊ ट्रकच्या काचा फोडण्यात आल्या. तर काही वाहनातील हवा सोडून दिली. यामुळे लासिना येथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. नागरिक लासिना येथे गतिरोधक देण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी करीत होते. अपघातानंतर दीड तासपर्यंत लाडखेड पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यानंतर काही पोलीस कर्मचारी घटनास्थळावर आले. तर यवतमाळ येथून वाहतूक शाखा आणि दंगल नियंत्रण पथक लासिना येथे पोहचले. तरुणाला चिरडणारा ट्रक हा चढ्ढा कंपनीचा असून संतप्त नागरिकांना याच कंपनीच्या ट्रकला लक्ष करीत त्यांच्या काचा फोडल्यात. दरम्यान, बांधकाम विभागाचे एम.आर. राठी यांनी गावकऱ्यांना सोमवारपर्यंत गतिरोधक बांधून देण्याचे आश्वासन दिल्याने चक्काजाम मागे घेतला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.(तालुका प्रतिनिधी)