शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

३९६ रुपये मीटरचे भूखंड पोहोचले २७०० वर

By admin | Updated: July 17, 2017 01:41 IST

एकीकडे औद्योगिक वसाहतींमधील भूखंड अनेकांकडे उद्योगाविना पडून आहेत, तर दुसरीकडे ज्यांना खरोखरच उद्योग थाटायचा आहे,

शासनाचा लाभ : एमआयडीसी लिलाव प्रक्रियेत बोली, वर्षभरात ९५ भूखंड घेतले परत सुहास सुपासे । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एकीकडे औद्योगिक वसाहतींमधील भूखंड अनेकांकडे उद्योगाविना पडून आहेत, तर दुसरीकडे ज्यांना खरोखरच उद्योग थाटायचा आहे, अशांना मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आता एमआयडीसीतील भूखंड मिळवावे लागत आहे. यवतमाळ एमआयडीसीतील ३९६ रूपये मीटर नियमित भाव असणारे व्यापारी भूखंड आता थेट २७०० रूपयांपेक्षा अधिक किंमतीत इच्छुक उद्योजकांना घ्यावे लागले. काही दिवसांपूर्वी यवतमाळ एमआयडीसीतील व्यापारी भूखंडांसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. यात गरजू उद्योजकांनी सहभाग घेतला. लिलावात व्यापारी वर्गातील आयएसओ गटातील ३९६ रूपये मिटरच्या सहा भूखंडांसाठी २७०० रूपयांपेक्षा अधिक बोली लावण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे अशा लिलाव प्रक्रियेद्वारा औद्योगिक वसाहतींमधील भूखंड विक्रीत सर्वाधिक लाभ शासनाचाच आहे. तसेच दलाल अथवा कोणत्याही मध्यस्तीचा प्रश्न या प्रक्रियेत निर्माण होत नाही. पारदर्शकतेमुळे जास्त बोली लावणाऱ्याच भूखंड मिळण्याची संधी अधिक असते. एकीकडे ज्यांना खरोखर उद्योग उभारायचा आहे, असे उद्योजक मोठ्या प्रमाणात बोली बोलून आणि मोठा आर्थिक भूखंड सहन करून एमआयडीसीतील भूखंड घेताना दिसततात. दुसरीकडे कवडीमोल भावात मिळालेले भूखंड अनेकांनी उद्योगाविना जवळ ठेवले आहेत. काहींनी आपल्याकडील भूखंडांचा नियमबाह्य गैरवापर चालविला आहे. अशांवर आता एमआयडीसीने पाश आवळणे सुरू केले आहे. जिल्ह्यात उद्योगाविना व नियमबाह्य असलेले ९५ भूखंड वर्षभरात परत घेण्यात आले आहे. यात येथील एमआयडीसीतील १४ भूखंडांचा समावेश आहे. हे सर्व भूखंड बोझारहित करून पुन्हा वितरित केले जाणार आहे. इतर काहींना एमआयडीसीने नोटीस बजावली आहे. त्यांनी स्वत:हून भूखंड परत केल्यास जिल्ह्यातील नवीन उद्योगांचा मार्ग मोकळा होण्यास निश्चितच मदत होणार आहे.