शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

भूमिअभिलेख विभागाला लागले रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: July 3, 2017 02:02 IST

शेतीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणाऱ्या भूमिअभिलेख विभागाला जिल्ह्यात रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.

फेरफार-मोजणी मंदावली : उपअधीक्षकांच्या १६ पैकी सात जागा रिक्त लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणाऱ्या भूमिअभिलेख विभागाला जिल्ह्यात रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. तालुका स्तरावरील उपअधीक्षकांच्या १६ पैकी तब्बल सात जागा रिक्त असल्याने शेतीचे फेरफार, मोजणी, भूसंपादनाची कामे संथगतीने होत आहे. जिल्ह्यात भूमिअभिलेख उपअधीक्षकांच्या १६ जागा आहेत. मात्र त्यातील सात रिक्त आहेत. दारव्ह्याची जागा ३० जूनला सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहे. तर दिग्रसच्या अधिकाऱ्याची बदली झाल्याने ते कार्यमुक्त झाल्यास ती जागासुद्धा रिक्त होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात १६ पैकी नऊ जागा रिक्त दिसतील. आदिवासी बहूल व नक्षल प्रभावित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झरी तालुक्याला साडेतीन वर्षांपासून भूमिअभिलेख उपअधीक्षकांचे पद रिक्त आहे. मारेगाव अडीच वर्ष, कळंब दोन वर्ष, पुसद दीड वर्ष, तर बाभूळगावला नऊ महिन्यांपासून उपअधीक्षक नाही. महागावातही गेल्या महिन्यापासून उपअधीक्षकांची प्रतीक्षा आहे. पुसदचे पद तीन वर्षांपासून रिक्त होते. तेथे नगर जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त चांगल्या कार्यक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती झाली. परंतु पुसदचा कारभार पाहून या अधिकाऱ्याने एखादी भानगड मागे लागण्याच्या भीतीने निवृत्तीच्या दीड वर्षाआधीच स्वेच्छा निवृत्ती घेतल्याचे सांगितले जाते. येथे जिल्हा अधीक्षक आहेत. तर अमरावती येथे पाच जिल्ह्यांचे मुख्यालय असलेल्या उपसंचालकाचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. तेथे एक अधिकारी फेब्रुवारीमध्ये रुजू झाले व ३१ मे रोजी निवृत्त झाले. त्यांच्या अधिनस्त जिल्हा अधीक्षक (सलग्न) व कार्यालय अधीक्षकांची जागाही रिक्त होती. नुकतीच या पदावर ‘ओएस’ म्हणून नियुक्ती झाली आहे. महत्वाचे अधिकारीच नसल्याने जमिनीचे फेरफार, शेती व प्लॉटची मोजणी, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प, नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच ग्रामीण भागातील कालवे, नहर याचे भूसंपादन संथगतीने सुरू आहे. झरी तालुका भूमिअभिलेख कार्यालयात २१ जागा मंजूर आहे. परंतु त्यातील केवळ पाच जागा भरलेल्या आहेत. त्यामुळे हे कार्यालय अनेकदा एक-दोन कर्मचाऱ्यावर सुरू असल्याचे दिसते. यवतमाळ सारख्या शहरात नगर परीक्षण भूमापकाची एकच जागा आहे. त्यांच्या सहायक नझूल परीक्षण भूमापकाची जागा बदलीमुळे रिक्त आहे.वीज, फोन, इंटरनेटची समस्याभूमिअभिलेख विभाग रिक्त पदांसोबतच सोई-सुविधांच्या अभावानेही त्रस्त आहेत. अनुदान न आल्याने देयक वेळेवर भरले जात नाही. पर्यायाने वीज पुरवठा खंडित होणे, दूरध्वनी सेवा खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे इंटरनेटची सुविधा मिळत नाही. म्हणून भूमिअभिलेखच्या यंत्रणेला खासगी व्यावसायिकांकडे आॅनलाईन कामे, नकाशांच्या झेरॉक्ससाठी आश्रय घ्यावा लागतो. फोन बंद असल्याने तालुकास्तरावरील यंत्रणेशी संपर्क होत नाही. अशा वेळी किमान इनकमिंग तरी दूरसंचार विभागाने सुरू ठेवावे, अशी तेथील यंत्रणेची माहिती आहे. फोन बंद असल्याची संधी साधून ग्रामीण भागातील कर्मचारी गायब होण्याचे प्रकारही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांची ओरड होते.