शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दिग्रसचे भूमिअभिलेख कार्यालय वाऱ्यावर

By admin | Updated: March 21, 2017 00:07 IST

येथील भूमिअभिलेख कार्यालय मागील १६ दिवसांपासून वाऱ्यावर असून त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे.

शेकडो प्रकरणे प्रलंबित : १६ दिवसांपासून प्रभारीसुद्धा नाहीसुनील हिरास दिग्रसयेथील भूमिअभिलेख कार्यालय मागील १६ दिवसांपासून वाऱ्यावर असून त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. फेरफार नोंदीसह मोजणीचे शेकडो प्रकरणे प्रलंबित पडल्याने सामान्य नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दिग्रसचे भूमिअभिलेख कार्यालय नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. जून २०१६ मध्ये आर्णी येथील उपअधीक्षक मस्के यांच्याकडे दिग्रसचा प्रभार होता. त्यावेळी आर्णीवरून ते कारभार पाहायचे. यावेळी दिग्रसवरून संबंधित कर्मचारी कागदपत्रे व सर्व फाईल घेऊन आर्णीला जात होते व त्याच ठिकाणी सह्या केल्या जात होत्या. या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर २२ आॅगस्ट २०१६ पासून परीविक्षाधीन उपअधीक्षक प्रिया बेंबरे यांच्याकडे दिग्रस भूमिअभिलेख कार्यालयाचा प्रभार देण्यात आला. त्यानंतर विविध निवडणुकांना प्रारंभ झाल्यामुळे त्या सातत्याने निवडणूक कर्तव्यावर होत्या. त्या पुसद येथून ये-जा करीत असल्याने अनेकांची कामे रेंगाळली गेली. कार्यालयातील रखडलेल्या कामाला सुरुवात करणार तोच त्यांची एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षणांतर्गत दिल्ली भेट व महाराष्ट्र दर्शन या प्रशिक्षण टप्प्यासाठी निवड झाली. त्या ३ मार्च २०१७ पासून दिल्ली येथे गेल्या आहेत. यानंतर आतापर्यंत उपअधीक्षक भूमिअभिलेखचा प्रभार कुणाकडेही देण्यात आला नाही. याबाबत प्रस्तूत प्रतिनिधीने प्रथम यवतमाळ जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडे दूरध्वनीवरून संपर्क केला असता तेथील दूरध्वनी बंद असल्याचे कळले. त्यानंतर अमरावती येथील भूमिअभिलेखचे उपसंचालक यांच्याशी संपर्क केला असता तेथील नागरगोजे या कर्मचाऱ्याने उपसंचालक मोरे साहेब हे १५ ते १७ मार्चपर्यंत महत्त्वाच्या प्रवासात असल्याचे सांगितले. १८ मार्चला पुन्हा संपर्क साधला असता मिटींगमध्ये असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क झाला असता त्यांना येथील विदारक परिस्थितीची जाणीव करून दिल्यानंतर आर्णी येथील भूमिअधीक्षक मस्के यांना प्रभार देण्यात येणार असून प्रलंबित कामे तत्काळ निकाली काढण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व बाबींचा फटका सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना बसत आहे. दीर्घ कालावधीपासून येथे कोणत्याही अधिकाऱ्याची नेमणूक का करण्यात आली नाही, असे विचारले असता याबाबत आम्ही आमच्या पुणे येथील वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला तसेच येथील परिस्थिती कळवून मार्गदर्शन मागितले. परंतु त्यांच्याकडून कोणतेही पत्रवजा आदेश न आल्यामुळे व्यवस्था होवू शकली नसल्याचे ते म्हणाले. शासनाच्या या दिरंगाईमुळे मात्र दिग्रस तालुक्यातील नागरिकांची कामे, मोजणी प्रकरणे, मार्च एन्डींगची वसुली तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे पगारसुद्धा होवू शकले नाहीत. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातील भूमिउपअधीक्षक कार्यालयात उपअधीक्षकांसह तब्बल २२ पदे मंजूर असून त्यातील बहुतांश रिक्त आहे. परंतु याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे.वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणीदिग्रस भूमिअभिलेख कार्यालयामार्फत नोंदणीकृत झालेले दस्त, खरेदी खत, मृत्यूपत्र, गहाण खत, बोझा कमी करणे, तसेच प्लॉट व शेतीची मोजणी अशी विविध कामे केली जातात. ही कामे संबंधित पक्षकारांनी अर्ज दाखल केल्यानंतर १५ ते २० दिवसानंतरही होत नसल्याचे दिसून येते. फेरफार मंजूर होवून नोंद होणे गरजेचे आहे. त्यामुळे ४ मार्चपूर्वीचे व त्यानंतर आलेली संपूर्ण प्रकरणे सध्या रखडली आहे. नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातून नागरिक या ठिकाणी येतात. त्यांचा वेळ व पैसाही वाया जात आहे. याबाबत वरिष्ठांनी तसेच महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी लक्ष घालून दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.