शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार एकर जमिनीचे भूमिहिनांना वाटप

By admin | Updated: May 6, 2015 01:49 IST

कर्मवीर दादासाहेब गायकवड सबळकीरण व स्वाभीमान योजनेतून यवतमाळ जिल्ह्यात पाच हजार एकर

यवतमाळ : कर्मवीर दादासाहेब गायकवड सबळकीरण व स्वाभीमान योजनेतून यवतमाळ जिल्ह्यात पाच हजार एकर जमिनीचे वाटप करण्यात आले असून एक हजार ३३३ भूमिहीनांना हक्काची शेती मिळाली आहे. यातून या भूमिहीनांच्या जीवनात प्रगतीची पहाट उगवणार आहे.समाजिक न्याय विभागाकडून भूमिहीन शेतमजूरांना हक्काची जमीन देण्यासाठी २००४ मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवड सबळकीरण व स्वाभीमान योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्याला १९ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यापैकी १६ कोटी १८ लाख खर्च करण्यात आले आहे. त्यातून जमीन खरेदी करण्यात आली आहे. यातून ९५ एकर ओलीताची तर चार हजार ९०६ एकर कोरडवाहू शेतजमीन भूमिहीनांमध्ये वाटण्यात आली आहे. प्राप्त अनुदानापैकी अद्यापही दोन कोटी २१ लाखाची रक्कम अखर्चित आहे. यामध्ये २०१५-१६ यावर्षात ६० लाखाचे अनुदान मिळाले आहे. यातून आठ लाभार्थ्यांना जमीन देण्यात येणार आहे. याशिवाय नव्याने सहा कोटींच्या जमीन वाटपाचा प्रस्ताव तयार केला आहे. यातून १९७ हेक्टर शेतजमिनीची खरेदी प्रस्तावित आहे. याच योजनेतील मुरझडी लाल व पाटापांगरा येथील ७४ एकर जमीन खरेदी प्रकरणात दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. याशिवाय २००९-१० मध्ये सामाजिक वनीकरण विभागास २४ एकर जमीनीच्या तूकडे हस्तांतरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)