शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

‘एमआयडीसी’मध्ये भूखंड वितरण प्रक्रिया तूर्त बंद

By admin | Updated: November 4, 2016 02:07 IST

जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत असलेल्या औद्योगिक वसाहतींमधील भूखंडांसाठी आवेदन स्वीकारण्याची प्रक्रिया तूर्तास बंद करण्यात आली आहे.

इच्छुकांचा हिरमोड : सुविधांचा अभाव, केवळ दहा एमआयडीसी क्रियाशीलयवतमाळ : जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत असलेल्या औद्योगिक वसाहतींमधील भूखंडांसाठी आवेदन स्वीकारण्याची प्रक्रिया तूर्तास बंद करण्यात आली आहे. यामागे सोयी-सुविधांचा अभाव हे मुख्य कारण आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला असून त्यांना आवेदनसुद्धा करता येणार नाही. जवळपास एक वर्ष ही परिस्थिती कायम राहील.शासनाच्या नवीन धोरणानुसार उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. औद्योगिक परिसरात आवश्यक त्या सोयी-सुविधांसह, आॅनलाईन आवेदन आणि विविध परवानग्यांची संख्या कमी करण्यावर भर आहे. जेणेकरून उद्योग-व्यवसायाला चालना मिळून स्थानिक बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध होऊ शकेल. यासाठी एमआयडीसी परिसरात भूखंड उपलब्ध करून देण्यात येत आहे. नवीन एमआयडीसी सुरू करण्यावरही जोर आहे. तसेच ज्यांनी एमआयडीसीत भूखंड घेतला आणि नियमानुसार ठराविक कालावधीत तेथे उद्योग थाटला नाही, अशा लोकांचे भूखंड परत घेऊन ते पुन्हा वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात उद्योगाविना असलेले ५६ भूखंड एमआयडीसीने जप्त केले आहे. सध्या जिल्ह्यातील विविध एमआयडीसींमध्ये भूखंड आहेत. परंतु आवश्यक त्या सोयी-सुविधा म्हणजेच रस्ते, वीज व पाणी नसल्याने तूर्तास भूखंड वितरण आणि त्यासाठीचे अर्ज स्वीकारणे एमआयडीसी कार्यालयाने बंद केले आहे. केवळ पुसद येथे सर्व सुविधा असलेले काही भूखंड आहेत. त्यामुळे पुसदसाठी १८ नोव्हेंबरपर्यंत आवेदन स्वीकारले गेले. या आवेदनावर योग्य प्रक्रिया पार पाडल्यानंतर पुन्हा दोन-तीन महिन्यांनी पुसद एमआयडीसीसाठी आवेदन स्वीकारले जाऊ शकते. जिल्ह्यातील यवतमाळसह इतर औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योग थाटण्याची महत्वाकांक्षा बाळगून असणाऱ्यांना नवीन भूखंडासाठी आवेदन करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. साधारणत: एक वर्षांनी उपलब्ध भूखंडांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होईल. (प्रतिनिधी)तीन नवीन एमआयडीसी प्रस्तावितयवतमाळ जिल्ह्यात सध्या तेरा ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. त्यातील दहाच एमआयडीसी क्रियाशील असून इतर ठिकाणी केवळ फलक लागले आहेत. आता पुन्हा तीन नवीन औद्योगिक वसाहती प्रस्तावित आहेत. यामध्ये पांढरकवडा, नेर आणि आर्णीचा समावेश आहे. या तिन्ही एमआयडीसी सुरू होण्याबाबत वेगाने प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच या ठिकाणी त्या सुरू होतील. केवळ एमआयडीसी होऊन भागणार नाही, तर त्या ठिकाणी मोठे उद्योग सुरू होणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या-त्या परिसरातील विकास शक्य आहे.