शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

‘एमआयडीसी’मध्ये भूखंड वितरण प्रक्रिया तूर्त बंद

By admin | Updated: November 4, 2016 02:07 IST

जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत असलेल्या औद्योगिक वसाहतींमधील भूखंडांसाठी आवेदन स्वीकारण्याची प्रक्रिया तूर्तास बंद करण्यात आली आहे.

इच्छुकांचा हिरमोड : सुविधांचा अभाव, केवळ दहा एमआयडीसी क्रियाशीलयवतमाळ : जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत असलेल्या औद्योगिक वसाहतींमधील भूखंडांसाठी आवेदन स्वीकारण्याची प्रक्रिया तूर्तास बंद करण्यात आली आहे. यामागे सोयी-सुविधांचा अभाव हे मुख्य कारण आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला असून त्यांना आवेदनसुद्धा करता येणार नाही. जवळपास एक वर्ष ही परिस्थिती कायम राहील.शासनाच्या नवीन धोरणानुसार उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. औद्योगिक परिसरात आवश्यक त्या सोयी-सुविधांसह, आॅनलाईन आवेदन आणि विविध परवानग्यांची संख्या कमी करण्यावर भर आहे. जेणेकरून उद्योग-व्यवसायाला चालना मिळून स्थानिक बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध होऊ शकेल. यासाठी एमआयडीसी परिसरात भूखंड उपलब्ध करून देण्यात येत आहे. नवीन एमआयडीसी सुरू करण्यावरही जोर आहे. तसेच ज्यांनी एमआयडीसीत भूखंड घेतला आणि नियमानुसार ठराविक कालावधीत तेथे उद्योग थाटला नाही, अशा लोकांचे भूखंड परत घेऊन ते पुन्हा वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात उद्योगाविना असलेले ५६ भूखंड एमआयडीसीने जप्त केले आहे. सध्या जिल्ह्यातील विविध एमआयडीसींमध्ये भूखंड आहेत. परंतु आवश्यक त्या सोयी-सुविधा म्हणजेच रस्ते, वीज व पाणी नसल्याने तूर्तास भूखंड वितरण आणि त्यासाठीचे अर्ज स्वीकारणे एमआयडीसी कार्यालयाने बंद केले आहे. केवळ पुसद येथे सर्व सुविधा असलेले काही भूखंड आहेत. त्यामुळे पुसदसाठी १८ नोव्हेंबरपर्यंत आवेदन स्वीकारले गेले. या आवेदनावर योग्य प्रक्रिया पार पाडल्यानंतर पुन्हा दोन-तीन महिन्यांनी पुसद एमआयडीसीसाठी आवेदन स्वीकारले जाऊ शकते. जिल्ह्यातील यवतमाळसह इतर औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योग थाटण्याची महत्वाकांक्षा बाळगून असणाऱ्यांना नवीन भूखंडासाठी आवेदन करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. साधारणत: एक वर्षांनी उपलब्ध भूखंडांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होईल. (प्रतिनिधी)तीन नवीन एमआयडीसी प्रस्तावितयवतमाळ जिल्ह्यात सध्या तेरा ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. त्यातील दहाच एमआयडीसी क्रियाशील असून इतर ठिकाणी केवळ फलक लागले आहेत. आता पुन्हा तीन नवीन औद्योगिक वसाहती प्रस्तावित आहेत. यामध्ये पांढरकवडा, नेर आणि आर्णीचा समावेश आहे. या तिन्ही एमआयडीसी सुरू होण्याबाबत वेगाने प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच या ठिकाणी त्या सुरू होतील. केवळ एमआयडीसी होऊन भागणार नाही, तर त्या ठिकाणी मोठे उद्योग सुरू होणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या-त्या परिसरातील विकास शक्य आहे.