शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

लाखो सेवानिवृत्तांचा रामलीला मैदानावर गुरुवारी देशव्यापी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 16:43 IST

येत्या ७ डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीत देशभरातील निवृत्त कर्मचारी एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत.

ठळक मुद्देवाढीव निवृत्ती वेतनाचा प्रश्न, ३१ मेच्या परिपत्रकाचा विरोध

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : सवलत प्राप्त कंपनी आणि सवलत प्राप्त नसलेल्या कंपनी असा भेदभाव करून श्रम आणि रोजगार मंत्रालयाने देशभरातील लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनपासून वंचित ठेवले आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही निवृत्तांची मुस्कटदाबी केली जात असल्याने येत्या ७ डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीत देशभरातील निवृत्त कर्मचारी एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत.शासकीय, निमशासकीय व खासगी कंपन्यांना ‘कर्मचारी निवृत्ती वेतन योजना १९९५’ लागू आहे. यात मिळणारे निवृत्ती वेतन फारच नगण्य म्हणजे १ ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहे. केंद्रशासनाने पगाराची मर्यादा ६५०० घालून दिल्यामुळे दरमहा केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन फंडात ५४१ रुपये जमा होत होते. केंद्र शासन ५४१ च्या तुलनेत त्यात ७५ रुपये जमा करीत होते. ज्यांना ६५०० पेक्षा जास्त रक्कम गुंतवायची आहे, अशा मालक आणि कर्मचाºयांनी संयुक्तपणे संमती देऊन रक्कम गुंतवावी, अशी सुधारणा या योजनेत १९९६ मध्ये करण्यात आली. परंतु ही बाब सदस्यांना कळविण्यात आली नाही.कालांतराने माहिती मिळाल्यावर कर्मचाऱ्यांनी ‘कर्मचारी भविष्य निधी संघटन’ यांना उपरोक्त तरतूद अमलात आणून वाढीव निवृत्ती वेतन देण्याची विनंती केली. पण ती फेटाळण्यात आली. कर्मचारी भविष्य निधी संघटनाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाजूने आदेश दिला. निवृत्त कर्मचाऱ्यांकडून मूळ पगार अधिक महागाई भत्त्याच्या ८.३३ टक्के रक्कम दरमहा व्याजासह घेऊन निवृत्ती वेतनाचा फायदा देण्यात यावा, असा आदेश न्यायालयाने ४ आॅक्टोबर २०१६ रोजी दिला.परिपत्रकात सुधारणा की कर्मचाऱ्यांत भेदभाव?कर्मचारी भविष्य निधी संघटन यांनी २३ मार्च २०१७ रोजी तसे परिपत्रकही काढले होते. पण नंतर ३१ मे २०१७ रोजी नवे परिपत्रक काढून २३ मार्चच्या परिपत्रकात सुधारणा केली. सवलत प्राप्त व सवलत प्राप्त नसलेली कंपनी असे वर्गीकरण केले. सवलत प्राप्त कंपनीच्या देशातील लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना ज्यादा निवृत्ती वेतनापासून वंचित केले. कर्मचारी भविष्य निधी संघटनाच्या नकारात्मक भूमिकेचा निषेध करण्यासाठी देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. ३१ मेचे अन्यायकारक परिपत्रक मागे घेतले नाही तर आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधानांसह सर्व खासदारांनाही निवेदन देऊन या प्रश्नात हस्तक्षेप करण्याची विनंती सेवानिवृत्तांनी केली आहे.

टॅग्स :Governmentसरकार