शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बोगीच्या दारात ‘लॅडर’ बसवा, मृत्यूला परत पाठवा! दहावीच्या विद्यार्थ्याने शोधला उपाय

By अविनाश साबापुरे | Updated: September 1, 2023 11:45 IST

गाडी आणि फलाटातील अंतर बुजविणारी ऑटोमॅटिक पायरी : जर्मनीकडून पेटंट

अविनाश साबापुरे

यवतमाळ : रेल्वेत चढताना किंवा उतरताना अनेक प्रवासी घसरून पडतात, रेल्वे आणि फलाटामधील ‘गॅप’मध्ये पडून त्यांचा चिरडून मृत्यू होतो. परंतु, आता यवतमाळच्या दहाव्या वर्गातील विद्यार्थ्याने या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधला आहे. रेल्वेचे दार आणि फलाटातील अंतर ‘बुजविणारी’ ऑटोमॅटिक पायरी त्याने तयार केली आहे. विशेष म्हणजे, त्याच्या या संशोधनाला जर्मनीचे पेटेंटही मिळाले आहे.

‘एक्स्टेंडेबल स्टेप लॅडर सिस्टिम’ असे त्याच्या या संशोधनाचे नाव आहे. तर समृद्ध राजू रामेकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मूळचे यवतमाळ येथील व आता अदिलाबाद येथे स्थायिक झालेले प्रसिद्ध रेडिओलाॅजिस्ट डाॅ. राजू रामेकर यांचा तो मुलगा आहे. सध्या तो दहाव्या वर्गात शिकत आहे. रेल्वे आणि रेल्वे फलाट यामध्ये थोडे अंतर असते. याच अंतरात अनेक जण फसून मृत्युमुखी पडतात. रेल्वे फलाटावर थांबण्यापूर्वीच अनेक जण उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करतात. त्यात घात होतो. तसेच काही वृद्ध, दिव्यांग बांधव रेल्वेतून उतरताना त्यांचा तोल जातो. अशा घटनांमधील मृत्यू रोखण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरणारे आहे.

‘लॅडर’ असे वाचवते जीव

समृद्ध रामेकर याने तयार केलेले स्टेप लॅडर म्हणजे एक प्रकारची ऑटोमॅटिक उघडणारी आणि बंद होणारी शिडी किंवा पायरीच आहे. रेल्वेच्या दारात ती बसविली जाईल. दारावर भार पडताच ती चटकन उघडली जाईल. रेल्वे आणि फलाटावरील ‘गॅप’च्या वर ती येईल. म्हणजे मधल्या अंतरात माणूस पडण्यापासून वाचेल. शिवाय, थोड्या वेळानंतर ही शिडी आपोआप हळूहळू बंद होऊन पूर्ववत होईल. तसेच नवीन प्रकारच्या वंदेभारतसारख्या इलेक्ट्रिक रेल्वेमध्ये तर ही शिडी दार उघडताच उघडेल आणि दार बंद होताच बंदही होईल.

वर्षाला होतात अडीचशे मृत्यू

या संशोधनाबाबत समृद्ध रामेकर म्हणाला की, मी परिवारासोबत गावाला जात असताना रेल्वेतून पडून दगावलेली व्यक्ती पाहिली. नाहक मृत्यू ओढवणारी ही घटना केवळ रेल्वे व फलाटातील अंतरामुळे घडते, असे मला वाटले. त्यामुळे ही ‘गॅप’ भरून काढणारे असे काहीतरी डिव्हाइस तयार करण्याचा विचार केला. त्यातूनच ‘एक्स्टेंडेबल स्टेप लॅडर’ तयार झाले. मला याचे पेटेंट मिळाले आहे, मात्र भारतीय रेल्वेने याचा वापर करावा, एवढीच इच्छा आहे. कारण भारतात अशा प्रकारच्या अपघातात वर्षाला सुमारे २५० प्रवाशांचा मृत्यू होतो.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे