शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

एसटीत कोविडचे नियम पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST

२६ मे रोजी विभाग नियंत्रकांनी कामगार संघटनेची बैठक बोलाविली होती. वास्तविक विभाग नियंत्रकांचे कक्ष बैठक घेण्याऐवढे विस्तीर्ण नाही. यानंतरही त्यांनी विभाग नियंत्रकांसह सात अधिकारी आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी अशा १७ जणांची बैठक घेतली. कमीत कमी कर्मचाºयांमध्ये कामकाज चालवावे, असे आदेश असताना विभागीय कार्यालयामध्ये १०० टक्के उपस्थिती ठेवली जाते.

ठळक मुद्देकर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह : १०० टक्के उपस्थितीत काम, रोष व्यक्त करत केले होते काम बंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात ‘कोविड-१९’चे नियम अधिकारी ते कर्मचाऱ्यांकडून पायदळी तुडविले जात आहे. विशेष म्हणजे, या कार्यालयाचे काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहे. कामगार संघटनांची बैठक घेण्यापासून ते १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यापर्यंत या कार्यालयाने नियम पायदळी तुडविण्याचा प्रताप केलाआहे.लोकांनी गर्दी करू नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावून राहणे, सॅनिटायझरचा वापर, साबणाने हात स्वच्छ धुणे आदी नियम घालून देण्यात आले आहे. यातील काही बाबी कर्मचारी वैयक्तिकरित्या पाळत असल्या तरी बैठका, ठरवून दिलेल्या मर्यादेत हजेरीचे नियम पाळले जात नाही. कोरोनाचा प्रकोप वाढत चाललेला असतानाही महामंडळाच्या विभागीय कार्यालयाला जाग कशी येत नाही, हा प्रश्न याठिकाणी उपस्थित केला जात आहे.२६ मे रोजी विभाग नियंत्रकांनी कामगार संघटनेची बैठक बोलाविली होती. वास्तविक विभाग नियंत्रकांचे कक्ष बैठक घेण्याऐवढे विस्तीर्ण नाही. यानंतरही त्यांनी विभाग नियंत्रकांसह सात अधिकारी आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी अशा १७ जणांची बैठक घेतली. कमीत कमी कर्मचाºयांमध्ये कामकाज चालवावे, असे आदेश असताना विभागीय कार्यालयामध्ये १०० टक्के उपस्थिती ठेवली जाते. या प्रकारात साथरोग अधिनियमाचा भंग झाला. याप्रकरणी विभाग नियंत्रकांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रादेशिक सचिव अरुण गाडगे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. त्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे सोमवार, ७ सप्टेंबर रोजी पुन्हा गाडगे यांनी तक्रार देवून विभाग नियंत्रकांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. विभागीय कार्यालयात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह आल्यानंतर कर्मचाºयांनी बाहेर निघून रोष व्यक्त केला होता.नियमापेक्षा अधिक प्रवासी घेवून वाहतूकएसटी बसद्वारे ‘कोविड-१९’चे नियम तोडून प्रवासी वाहतूक केली जात आहे. या प्रकारात कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती खुद्द महामंडळ कर्मचाºयांकडून व्यक्त केली जात आहे. शिवाय स्वत:च्या सुरक्षिततेविषयीसुद्धा त्यांच्याकडून चिंता व्यक्त केली जात आहे. आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू झाल्यापासून काही मार्गावर ३५ ते ४० प्रवासी घेवून एसटी बसेस धावत आहे. २२ पेक्षा अधिक प्रवासी घेऊ नये, ज्येष्ष्ठ नागरिक , बालकांची वाहतूक करण्यात येवू नये आदी नियम ‘कोविड-१९’ अंतर्गत घालून देण्यात आले आहेत. यानंतरही यवतमाळ आगारातून सुटणाऱ्या बसेसमधून नियम तोडून प्रवासी वाहतूक होत आहे. बसस्थानकावर एसटी बसेसमध्ये प्रवासी भरणाºया कर्मचाºयांकडूनच जादा प्रवासी घेण्याची सक्ती केली जात असल्याची ओरड कर्मचाºयांमधून होत आहे. ठरवून दिलेल्या संख्येनुसारच प्रवासी वाहतूक करावी, अशी मागणी प्रवाशांकडूनही होत आहे. यासंदर्भात यवतमाळ आगार व्यवस्थापक रमेश उईके यांना विचारले असता, नियमानुसारच प्रवासी वाहतूक केली जात आहे. गर्दी वाढलेल्या मार्गावर अधिक बसेस सोडण्यात येते. कदाचित एखाद्यावेळी प्रवाशाच्या विनंतीवरून जादा वाहतूक झाली असू शकते. मात्र आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे ते म्हणाले.