शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोसदनीचा घाट होणार सरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:26 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गावरील ‘कोसदनी’चा घाट प्रसिद्ध आहे. हा घाट डोंगराच्या मधातून गेला. घाट तसा लांब नाही. मात्र घाटाखालील वळण ‘जिवघेणे’ ठरले आहे. तेथे सातत्याने अपघात होतात.

ठळक मुद्देअपघात मालिका : आत्तापर्यंत गेले शेकडो जीव

हरिओम बघेल।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गावरील ‘कोसदनी’चा घाट प्रसिद्ध आहे. हा घाट डोंगराच्या मधातून गेला. घाट तसा लांब नाही. मात्र घाटाखालील वळण ‘जिवघेणे’ ठरले आहे. तेथे सातत्याने अपघात होतात. आता रस्ता रूंदीकरणात हा घाटच नाहीसा होणार आहे.नागपूर-बोरी-तुळजापूर हा मार्ग आता ‘राष्ट्रीय महामार्ग’ झाला आहे. त्यामुळे आता हा ८० फूट रूंद असलेला रस्ता तब्बल २०० फुटांचा होणार आहे. हा रस्ता चारपदरी होणार आहे. मात्र कोसदनी घाटातील अपघात भविष्यात बंद होतील किंवा नाही, याबाबत साशंकताच आहे. या घाटात आत्तापर्यंत समोरासमोर धडक लागल्यानेच मोठ्या प्रमाणात अपघात घडले. वरून खाली ऊतरणारे वाहन समोरील वाहनावर जाऊन आदळल्याने अपघात झाले. वरुन खाली ऊतरताना वळण असल्याने अंदाज चुकतो व अपघात होतो. हा प्रकार नेहमी घडतो.रस्ता रुंदीकरणात घाटातील जिवघेणे वळण सरळ होणार आहे. परिणामी कोसदनी घाट नाहीसा होईल. त्यामुळे अपघाताची भीती कमी होईल. रस्ता रूंदीकरणाला किमान एक किंवा दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे. या भागात जंगली भाग जादा असल्याने रूंदीकरणाला परवानगी मिळण्यास वेळ लागणार आहे. घाटापुढे नाल्यावर मोठा पूल होणार आहे. यामुळे या घाटाची ‘लेव्हल मेंन्टेन’ होईल. परिणामी हा रस्ता सरळ होईल. प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. अपघाताची मालिका बंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नुकतेच १२ भाविकांचे गेले बळीआत्तापर्यंत कोसदनी घाटात अनेक मोठे अपघात घडले. नुकत्याच झालेल्या अपघातात पंजाब, हरियाणा, दिल्ली, नागपूर येथील १२ भाविकांचा मृत्यू झाला. त्यापूर्वीही अनेकांनी अपघातात जीव गमावला. अनेकांना कायमचे अपंगत्व आले. अनेकांचे संसार अपघातांनी उघड्यावर पडले. मात्र रस्ता रूंदीकरणात हा घाटच नाहीसा होण्याची शक्यता आहे. हा घाट रूंद होणार असल्यामुळे भविष्यात तेथे वळण राहणार नाही, अशी माहिती नॅशनल हायवेचे अभियंता एस.बी. जुनगरे यांनी दिली.

टॅग्स :highwayमहामार्ग