शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

कोसदनीचा घाट होणार सरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:26 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गावरील ‘कोसदनी’चा घाट प्रसिद्ध आहे. हा घाट डोंगराच्या मधातून गेला. घाट तसा लांब नाही. मात्र घाटाखालील वळण ‘जिवघेणे’ ठरले आहे. तेथे सातत्याने अपघात होतात.

ठळक मुद्देअपघात मालिका : आत्तापर्यंत गेले शेकडो जीव

हरिओम बघेल।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गावरील ‘कोसदनी’चा घाट प्रसिद्ध आहे. हा घाट डोंगराच्या मधातून गेला. घाट तसा लांब नाही. मात्र घाटाखालील वळण ‘जिवघेणे’ ठरले आहे. तेथे सातत्याने अपघात होतात. आता रस्ता रूंदीकरणात हा घाटच नाहीसा होणार आहे.नागपूर-बोरी-तुळजापूर हा मार्ग आता ‘राष्ट्रीय महामार्ग’ झाला आहे. त्यामुळे आता हा ८० फूट रूंद असलेला रस्ता तब्बल २०० फुटांचा होणार आहे. हा रस्ता चारपदरी होणार आहे. मात्र कोसदनी घाटातील अपघात भविष्यात बंद होतील किंवा नाही, याबाबत साशंकताच आहे. या घाटात आत्तापर्यंत समोरासमोर धडक लागल्यानेच मोठ्या प्रमाणात अपघात घडले. वरून खाली ऊतरणारे वाहन समोरील वाहनावर जाऊन आदळल्याने अपघात झाले. वरुन खाली ऊतरताना वळण असल्याने अंदाज चुकतो व अपघात होतो. हा प्रकार नेहमी घडतो.रस्ता रुंदीकरणात घाटातील जिवघेणे वळण सरळ होणार आहे. परिणामी कोसदनी घाट नाहीसा होईल. त्यामुळे अपघाताची भीती कमी होईल. रस्ता रूंदीकरणाला किमान एक किंवा दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे. या भागात जंगली भाग जादा असल्याने रूंदीकरणाला परवानगी मिळण्यास वेळ लागणार आहे. घाटापुढे नाल्यावर मोठा पूल होणार आहे. यामुळे या घाटाची ‘लेव्हल मेंन्टेन’ होईल. परिणामी हा रस्ता सरळ होईल. प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. अपघाताची मालिका बंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नुकतेच १२ भाविकांचे गेले बळीआत्तापर्यंत कोसदनी घाटात अनेक मोठे अपघात घडले. नुकत्याच झालेल्या अपघातात पंजाब, हरियाणा, दिल्ली, नागपूर येथील १२ भाविकांचा मृत्यू झाला. त्यापूर्वीही अनेकांनी अपघातात जीव गमावला. अनेकांना कायमचे अपंगत्व आले. अनेकांचे संसार अपघातांनी उघड्यावर पडले. मात्र रस्ता रूंदीकरणात हा घाटच नाहीसा होण्याची शक्यता आहे. हा घाट रूंद होणार असल्यामुळे भविष्यात तेथे वळण राहणार नाही, अशी माहिती नॅशनल हायवेचे अभियंता एस.बी. जुनगरे यांनी दिली.

टॅग्स :highwayमहामार्ग