शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

कोसदनीचा घाट होणार सरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:26 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गावरील ‘कोसदनी’चा घाट प्रसिद्ध आहे. हा घाट डोंगराच्या मधातून गेला. घाट तसा लांब नाही. मात्र घाटाखालील वळण ‘जिवघेणे’ ठरले आहे. तेथे सातत्याने अपघात होतात.

ठळक मुद्देअपघात मालिका : आत्तापर्यंत गेले शेकडो जीव

हरिओम बघेल।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गावरील ‘कोसदनी’चा घाट प्रसिद्ध आहे. हा घाट डोंगराच्या मधातून गेला. घाट तसा लांब नाही. मात्र घाटाखालील वळण ‘जिवघेणे’ ठरले आहे. तेथे सातत्याने अपघात होतात. आता रस्ता रूंदीकरणात हा घाटच नाहीसा होणार आहे.नागपूर-बोरी-तुळजापूर हा मार्ग आता ‘राष्ट्रीय महामार्ग’ झाला आहे. त्यामुळे आता हा ८० फूट रूंद असलेला रस्ता तब्बल २०० फुटांचा होणार आहे. हा रस्ता चारपदरी होणार आहे. मात्र कोसदनी घाटातील अपघात भविष्यात बंद होतील किंवा नाही, याबाबत साशंकताच आहे. या घाटात आत्तापर्यंत समोरासमोर धडक लागल्यानेच मोठ्या प्रमाणात अपघात घडले. वरून खाली ऊतरणारे वाहन समोरील वाहनावर जाऊन आदळल्याने अपघात झाले. वरुन खाली ऊतरताना वळण असल्याने अंदाज चुकतो व अपघात होतो. हा प्रकार नेहमी घडतो.रस्ता रुंदीकरणात घाटातील जिवघेणे वळण सरळ होणार आहे. परिणामी कोसदनी घाट नाहीसा होईल. त्यामुळे अपघाताची भीती कमी होईल. रस्ता रूंदीकरणाला किमान एक किंवा दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे. या भागात जंगली भाग जादा असल्याने रूंदीकरणाला परवानगी मिळण्यास वेळ लागणार आहे. घाटापुढे नाल्यावर मोठा पूल होणार आहे. यामुळे या घाटाची ‘लेव्हल मेंन्टेन’ होईल. परिणामी हा रस्ता सरळ होईल. प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. अपघाताची मालिका बंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नुकतेच १२ भाविकांचे गेले बळीआत्तापर्यंत कोसदनी घाटात अनेक मोठे अपघात घडले. नुकत्याच झालेल्या अपघातात पंजाब, हरियाणा, दिल्ली, नागपूर येथील १२ भाविकांचा मृत्यू झाला. त्यापूर्वीही अनेकांनी अपघातात जीव गमावला. अनेकांना कायमचे अपंगत्व आले. अनेकांचे संसार अपघातांनी उघड्यावर पडले. मात्र रस्ता रूंदीकरणात हा घाटच नाहीसा होण्याची शक्यता आहे. हा घाट रूंद होणार असल्यामुळे भविष्यात तेथे वळण राहणार नाही, अशी माहिती नॅशनल हायवेचे अभियंता एस.बी. जुनगरे यांनी दिली.

टॅग्स :highwayमहामार्ग