शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कोल्हापुरी बंधाऱ्याचा पुलाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:05 IST

लगतच्या बोरगाव (पुंजी) येथून वाहत असलेल्या अडाण नदीवर ८० हेक्टर सिंचन क्षमता अपेक्षित धरुन ३१ खुले दरवाजे असलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधाºयामुळे नदीवर काही अंतरावर असलेल्या पुलाला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देबोरगाव (पुंजी) बंधारा : खनिज वाहून चालले, प्रशासनाचे दुर्लक्ष

शाहीद खान ।लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : लगतच्या बोरगाव (पुंजी) येथून वाहत असलेल्या अडाण नदीवर ८० हेक्टर सिंचन क्षमता अपेक्षित धरुन ३१ खुले दरवाजे असलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे नदीवर काही अंतरावर असलेल्या पुलाला धोका निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने २००२-२००३ मध्ये सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून बोरगाव येथे कोल्हापुरी बंधारा बांधला. २०१२-२०१३ मध्ये अतिवृष्टीमुळे नदीला महापूर आला होता. त्यावेळी पुराच्या पाण्याबरोबर आलेली मोठी लाकडे, काडी कचरा, गाळ बंधाऱ्याच्या ओपनिंगमध्ये अडकला. परिणामी ३१ दरवाजांमधून होणारा पाण्याचा प्रवाह बंद झाला. महापुराच्या तडाख्याने बंधाऱ्याच्या डाव्या बाजूची जमीन खरडून गेली. यातून नदीचा नवी प्रवाह तयार झाला आहे.बंधाºयात अडकलेला काडीकचरा तसाच आहे. गाळही साचून आहे. त्यामुळे पाणी सामाजिक वनिकरण विभागाच्या सागवान व बांबूची झाडे असलेल्या नर्सरीत जात आहे. नदीला पूर आल्यास नर्सरीत पाणी शिरत असल्याने वनसंपदेचे व खनिज संपत्तीचे नुकसान होत आहे. खनिज संपत्ती वाहून जात आहे. शेतात पाणी शिरत असल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. बंधाऱ्यापासून काही अंतरावरच नदीवर पूल आहे. या पुलालाही हादरे बसत आहे. पूल क्षतीग्रस्त होण्याची शक्यता बळावली आहे. या पुलाचे नुकसान झाल्यास या मार्गावरील सावळी (सदोबा), पार्डी (नस्कारी), तळणी, कुऱ्हा अशा अनेक गावांबरोबरच ३० ते ४० गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटण्याची भीती आहे. नदीच्या नवीन प्रवाहाने डाव्या बाजूचा नदी काठ खरडत आहे. पुलापर्यंत जमीन खरडत येण्यास थोडे अंतर शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात पूल व रस्त्याला धोका होण्याची शक्यता आहे. मात्र जिल्हा परिषदेचा सिंचन विभाग या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे.जमीन सामाजिक वनीकरणाचीपरिसरातील जमीन सामाजिक वनीकरण विभागाच्या अखत्यारित येते. त्यामुळे पूल व रस्त्याची दुरूस्ती करणे शक्य नसल्याचे सिंचन विभागातर्फे सांगितले जाते. दुसरीकडे पूल दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. नदीचा नवा प्रवाह जिल्हा प्रशासनाकडून बेदखल आहे. शासकीय स्तरावर कुणीच दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिक संकटात सापडले आहे. या समस्येची प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुनील पोतगंटवार व परिसरातील गावकºयांनी दिला आहे.

टॅग्स :Damधरण