शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

कोल्हापुरी बंधाऱ्याचा पुलाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:05 IST

लगतच्या बोरगाव (पुंजी) येथून वाहत असलेल्या अडाण नदीवर ८० हेक्टर सिंचन क्षमता अपेक्षित धरुन ३१ खुले दरवाजे असलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधाºयामुळे नदीवर काही अंतरावर असलेल्या पुलाला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देबोरगाव (पुंजी) बंधारा : खनिज वाहून चालले, प्रशासनाचे दुर्लक्ष

शाहीद खान ।लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : लगतच्या बोरगाव (पुंजी) येथून वाहत असलेल्या अडाण नदीवर ८० हेक्टर सिंचन क्षमता अपेक्षित धरुन ३१ खुले दरवाजे असलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे नदीवर काही अंतरावर असलेल्या पुलाला धोका निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने २००२-२००३ मध्ये सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून बोरगाव येथे कोल्हापुरी बंधारा बांधला. २०१२-२०१३ मध्ये अतिवृष्टीमुळे नदीला महापूर आला होता. त्यावेळी पुराच्या पाण्याबरोबर आलेली मोठी लाकडे, काडी कचरा, गाळ बंधाऱ्याच्या ओपनिंगमध्ये अडकला. परिणामी ३१ दरवाजांमधून होणारा पाण्याचा प्रवाह बंद झाला. महापुराच्या तडाख्याने बंधाऱ्याच्या डाव्या बाजूची जमीन खरडून गेली. यातून नदीचा नवी प्रवाह तयार झाला आहे.बंधाºयात अडकलेला काडीकचरा तसाच आहे. गाळही साचून आहे. त्यामुळे पाणी सामाजिक वनिकरण विभागाच्या सागवान व बांबूची झाडे असलेल्या नर्सरीत जात आहे. नदीला पूर आल्यास नर्सरीत पाणी शिरत असल्याने वनसंपदेचे व खनिज संपत्तीचे नुकसान होत आहे. खनिज संपत्ती वाहून जात आहे. शेतात पाणी शिरत असल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. बंधाऱ्यापासून काही अंतरावरच नदीवर पूल आहे. या पुलालाही हादरे बसत आहे. पूल क्षतीग्रस्त होण्याची शक्यता बळावली आहे. या पुलाचे नुकसान झाल्यास या मार्गावरील सावळी (सदोबा), पार्डी (नस्कारी), तळणी, कुऱ्हा अशा अनेक गावांबरोबरच ३० ते ४० गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटण्याची भीती आहे. नदीच्या नवीन प्रवाहाने डाव्या बाजूचा नदी काठ खरडत आहे. पुलापर्यंत जमीन खरडत येण्यास थोडे अंतर शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात पूल व रस्त्याला धोका होण्याची शक्यता आहे. मात्र जिल्हा परिषदेचा सिंचन विभाग या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे.जमीन सामाजिक वनीकरणाचीपरिसरातील जमीन सामाजिक वनीकरण विभागाच्या अखत्यारित येते. त्यामुळे पूल व रस्त्याची दुरूस्ती करणे शक्य नसल्याचे सिंचन विभागातर्फे सांगितले जाते. दुसरीकडे पूल दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. नदीचा नवा प्रवाह जिल्हा प्रशासनाकडून बेदखल आहे. शासकीय स्तरावर कुणीच दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिक संकटात सापडले आहे. या समस्येची प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुनील पोतगंटवार व परिसरातील गावकºयांनी दिला आहे.

टॅग्स :Damधरण