शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

यवतमाळ जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे गावेच्या गावे झाली किडनीरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 11:02 IST

फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे शंभराहून अधिक बळी गेलेले असताना यंदा तीव्र टंचाईत भूगर्भातील दूषित पाणी पिल्याने गावेच्या गावे किडनी रुग्ण बनले आहेत.

ठळक मुद्देकिडनी आजाराचे थैमान रोज ५० रुग्णांची डायलिसिससाठी अमरावतीकडे धाव

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नापिकी, फवारणीतील विषबाधा या कारणांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मरण गाजले. आता याच जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर पाणी पिल्याने मरत आहेत. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे शंभराहून अधिक बळी गेलेले असताना यंदा तीव्र टंचाईत भूगर्भातील दूषित पाणी पिल्याने गावेच्या गावे किडनी रुग्ण बनले आहेत. येथून दररोज ५० रुग्ण केवळ डायलिसीससाठी अमरावतीला जात आहेत. तर तेवढेच रुग्ण तपासणीसाठी धाव घेत आहेत.जिल्ह्यातील ४५२ गावांमधील पाण्याचे स्त्रोत फ्लोराईडयुक्त असल्याची शासकीय आकडेवारी आहे. प्रत्यक्षात हजारो गावे दूषित पाणी पिउन जगत आहेत आणि हळूहळू किडनी खराब होऊन मरणाकडे वाटचाल करीत आहेत. एकेका कुटुंबात किडनीचे तीन-तीन रुग्ण आढळत आहेत. उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. जमिनीच्या पोटात खोल-खोल विंधनविहिरी खोदून पाणी उपसले जात आहे. जेवढ्या खोलातून पाणी काढले, ते तेवढेच जास्त दूषित. त्यातूनच यवतमाळसह घाटंजी, पांढरकवडा, झरीजामणी, उमरखेड, दिग्रस, नेर, दारव्हा या तालुक्यांमधील खेड्यांत सध्या किडनीच्या रुग्णांचे प्रमाण दरदिवशी वाढत आहे. वसंतनगर, चोपण, मारेगाव, खैरगाव, आंबेझरी, आमडी, जरंग, साखरा, मुरली आदी खेड्यांमध्ये गंभीर स्थिती आहे. आसोला गावात तर किडनीच्या आजाराने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुरली गावात गेल्या दहा वर्षात ५० जण दगावल्याचे सांगितले जाते.

बंदी असलेली गोळी किराणा दुकानातदूषित पाण्याने किडनीचे रुग्ण वाढत असताना यवतमाळात डायलिसीसची सुविधाच नाही. ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजूरच दूषित पाण्याचे बळी ठरत आहेत. त्यामुळे शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने नुकतेच अमरावती येथील किडनी विकार तज्ज्ञ डॉ. अविनाश चौधरी यांचे शिबिर आसोला गावात घेतले. त्यावेळी डॉ. चौधरी म्हणाले, माझ्या ओपीडीमध्ये दररोज यवतमाळ जिल्ह्यातून रुग्ण येत आहेत.५० जण तर डायलिसीससाठीच येत आहेत. रोज बोलेरो गाडी भरून रुग्ण येत आहेत. विशेष म्हणजे, शेतमजूर चक्क किरणा दुकानातून पेन किलर म्हणून निमोसुलाईड गोळी घेऊन खाताना आढळले. ही गोळी किडनीवर मारा करते. बंदी असलेली ही गोळी किराणा दुकानातून कशी मिळते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

‘नीरी’ने तपासावे पाणीज्या भागातील पाणीस्त्रोतांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण जास्त आहे तेथील पाण्याची तपासणी वर्षातून किमान दोन वेळा व्हायला पाहिजे. शेकडो खेड्यातील पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, स्टोरियम, आयरन, कार्बोनेट, सल्फेट यांचे प्रमाण जास्त आढळते. अशा ‘हार्ड वॉटर’ची तपासणी ‘नीरी’सारख्या संस्थेमार्फत होणे आवश्यक आहे. अधिक क्षारयुक्त पाणी हे किडनी आजाराचे मूळ कारण आहे. तणनाशकातील ग्लायफासेट हे रसायन थेट जमिनीत जाऊन नंतर पाणी व खाद्यस्त्रोतांमध्ये मिसळले जातात. त्यामुळेही या आजाराची शक्यता वाढते. वारंवार लघवी येणे, कंबर दुखणे, मीठ खावेसे वाटणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य