शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

खरिपातून मूग, उडीद बाद

By admin | Updated: July 7, 2014 00:10 IST

पोळ्याच्या आधी हातात येणारा मूग, उडीद यावर्षी लांबलेल्या पावसाने खरीप पेरणीतून बाद झाला आहे. पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड होणारा उडीद, मूग यंदा पेरलाच गेला नाही.

पुसद : पोळ्याच्या आधी हातात येणारा मूग, उडीद यावर्षी लांबलेल्या पावसाने खरीप पेरणीतून बाद झाला आहे. पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड होणारा उडीद, मूग यंदा पेरलाच गेला नाही. आता शेतकरी सोयाबीन पेरणीचे नियोजन करताना दिसत आहे.गतवर्षी मान्सून वेळेवर दाखल झाल्याने खरिपाची पेरणीही उरकली होती. यंदा पावसाळा सुरू होऊन महिना उलटला पण अद्याप पेरणी योग्य पाऊस पडला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून यावर्षी प्रथम मूग, उडीदची पेरणी वेळ निघून गेल्याने शेतकऱ्यांना ही पिके घेता येणार नाहीत. त्याऐवजी सोयाबीन, तूर, कापूस आणि मका ही पिके घ्यावी लागणार आहेत. विदर्भात साधारणत: ७ ते २१ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होते. १५ जुलैनंतर खरीप पेरणी पूर्ण होते. पण यावर्षी मान्सूनने दगा दिल्याने संपूर्ण खरीप पेरणी धोक्यात आली आहे. मूग, उडीद पीक यंदाच्या पेरणीतून जवळपास बाद झाले आहे. याचे उत्पादन यावर्षी शून्य राहील.१५ जुलैपर्यंत पेरणी योग्य पाऊस झाला तर सोयाबीनची पेरणी करावी. त्यासोबतच आंतरपीक म्हणून तरू, कपाशी पीक घ्यावे. जमिनीत ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये. अन्यथा बियाणे मिळणार नाही. पेरणी करताना बियाणे जास्त वापरावे. खताचा वापर कमी करावा. बदलते हवामान, पावसाचा खंड, कीड व रोगांचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या सर्वांचा उत्पादनावर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी केले आहे.मान्सूनच्या लेटलतिफतेने शेतकरी वर्ग चिंताक्रांत झाला असून खरीप ज्वारीची पेरणी होणार नसल्याने बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जाणार. धान्य व गुरांसाठी चारा मिळणार नाही. बाजारात ज्वारीची आवक कमी मागणी जास्त होऊन भाव वाढतील. मूग, उडीद, डाळ यांचे भाव गगनाला पोहोचतील. सर्वसामान्यांना खरेदी करणे परवडणार नाही. पाऊस लांबल्याने कपाशी, मका, सोयाबीन बियाणे जास्त प्रमाणात पेरावे व लागवड करावी लागणार आहे. त्यामुळे खर्चात वाढ होऊन उत्पादनात मोठी घट येणार आहे, असे शेतकरीवर्गातून प्रतिक्रिया उमटत आहे. (तालुका प्रतिनिधी)