शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

खैरगावच्या इसमाचा गळा चिरुन खून

By admin | Updated: April 6, 2015 00:11 IST

जुन्या वादात एका इसमाचे अपहरण करून तिघांनी त्याचा गळा चिरुन खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत वर्धा

जुना वाद : प्रेत फेकले वर्धा नदीच्या पात्रात, तिघांना अटक वडकी : जुन्या वादात एका इसमाचे अपहरण करून तिघांनी त्याचा गळा चिरुन खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत वर्धा नदीच्या पात्रात फेकून देण्यात आले. ही घटना राळेगाव तालुक्यातील खैरगाव-कासार येथे उघडकीस आली. पोलिसांंनी तिघांना अटक केली आहे. चंद्रभान मारेगामा (६०) असे मृताचे नाव आहे. तर शंकर दादाराव राऊत (४०), रवी नारायण तागडे (४०), राजू बाबाराव उरवते (३५) सर्व रा. खैरगाव असे आरोपींची नावे आहे. चंद्रभान हा ३० मार्चच्या रात्री घरुन तीन मित्रांसोबत निघून गेला होता. पाच दिवस झाले तरी थांगपत्ता लागत नसल्याने त्याचा मुलगा मारोती याने वडकी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन शंका व्यक्त केली. पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासात पोलिसांनी शंकर राऊत, रवी तागडे आणि राजू उरवते या तिघांना ताब्यात घेतले. त्यांना बोलते केले असता त्यांनी घटनाक्रम सांगितला. ३० मार्च रोजी चंद्रभान आपल्या घरी होता. त्यावेळी गावातीलच शंकर राऊत याने घराबाहेर बोलावून नेले. रवी तागडे याच्या मोटरसायकलवर बसून हे तिघे गेले. त्यानंतर राजू उरवते हा मित्रही गेला. तिघेही दुचाकीवरून सखी लोणी मार्गाने घेऊन गेले. एका शेतात चंद्रभानला दारू पाजली. तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका दुप्पट्याने त्याचा गळा आवळला आणि धारदार शस्त्राने त्यानंतर गळा चिरला. प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी या तिघांनी चंद्रभानचे प्रेत वर्धा जिल्ह्यातील बोपापूर गावच्या नदीच्या पात्रात पाण्यात फेकून दिले. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्या ठिकाणी चंद्रभानचा धडापासून शीर वेगळे असलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी त्या तिघांना अटक करून भादंवि ३०२, ३०१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तिघेही आरोपी गावातीलच असून त्यांच्यात मैत्री होती. मात्र काही दिवसांपासून जुना वाद सुरू होता. या वादात चंद्रभानचा खून करण्यात आला. अधिक तपास वडकीचे ठाणेदार अमोल माळवे, सतीश राऊत, रमेश पिदूरकर, प्रवीण तालकोकुलवार करीत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून खुनाचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. (वार्ताहर)