शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

अंथरुणाला खिळलेल्या वनपालाची केली जिल्हा बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:00 IST

आजारी असल्याने चालताही येत नसल्याचे उपवनसंरक्षक यांना सांगितले. मात्र त्यांनी  दया दाखविली नसल्याचे सांगत,  महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा) १९८१ नियम ७९ परिशिष्ट ३ नियम १ ते १० मधील तरतुदीनुसार अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला लागू होतो. मात्र यानुसारही आपल्याला लाभ देण्यात आला नसल्याचे ते म्हणाले.. मे २०१९ पासून आजतागायत  कोणतीही रजा मंजूर केली नाही. यामुळे  वेतन, वैद्यकीय खर्चसुद्धा मिळालेला नाही.  

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  अर्धांगवायू झाल्याने अंथरुणाला खिळलेल्या वनपालाची थेट जिल्ह्याबाहेर वाशिम येथे बदली केली. इतकेच नव्हे तर त्यांना पुसद येथून तत्काळ कार्यमुक्तही करण्यात आले. या   कारभारामुळे उपासमार होत असून, वनविभागाची यंत्रणा विनाकारण त्रास देत असल्याची खंत कर्मचारी रमेश सुरोशे यांनी व्यक्त केली आहे. पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्रात तपासणी नाक्यावर कार्यरत असताना सुरोशे यांना ९ मे २०१९ रोजी कर्तव्यावर असतानाच अर्धांगवायूचा झटका आला. यातून ते अजूनही सावरलेले नाहीत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. अंथरुणावर असतानाच कुठलीही पूर्वकल्पना न देता सामाजिक वनीकरण वाशिम येथे त्यांची विभाग बदली करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना उपवनसंरक्षक यांनी तत्काळ कार्यमुक्तही केले. आजारी असल्याने चालताही येत नसल्याचे उपवनसंरक्षक यांना सांगितले. मात्र त्यांनी  दया दाखविली नसल्याचे सांगत,  महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा) १९८१ नियम ७९ परिशिष्ट ३ नियम १ ते १० मधील तरतुदीनुसार अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला लागू होतो. मात्र यानुसारही आपल्याला लाभ देण्यात आला नसल्याचे ते म्हणाले.. मे २०१९ पासून आजतागायत  कोणतीही रजा मंजूर केली नाही. यामुळे  वेतन, वैद्यकीय खर्चसुद्धा मिळालेला नाही.   जगण्याचा मूलभूत अधिकारच बाधित केला आहे. या अन्यायाविरोधात राज्याच्या लोकायुक्त, वनविभागाचे प्रधान सचिव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याचे सुरोशे यांनी सांगितले.   

रुग्णालयात असताना सक्तीची कार्यमुक्ती का?- सोईच्या कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतरही वरिष्ठ त्याला कार्यमुक्त करीत नाही. रमेश सुरोशे यांच्या प्रकरणात ते रुग्णालयात भरती असतानाही त्यांना परस्पर कार्यमुक्त केले. येथे वरिष्ठांनी सहानुभूती दाखविलेली नाही. त्यांना अडचणीच्या काळात मदत सोडा, हक्काचे वेतनही दिलेले नसल्याचे सुराेशे यांनी सांगितले. वनपाल पदावर  एकच पदावधी झालेला असताना विभागाबाहेर केलेली बदलीही निमयबाह्य असल्याचे सुरोशे यांचे म्हणणे आहे.

 शेंबाळपिंपरी वन नाक्यावर असलेले वनपाल रमेश सुरोशे यांची २०१९ मध्ये बदली झाली. मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशावरुनच त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. या प्रकरणात यापेक्षा जास्त माहिती नाही. - सचिन सावंत, वनपरिक्षेत्र अधिकारी

 

टॅग्स :forest departmentवनविभाग