शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

अंथरुणाला खिळलेल्या वनपालाची केली जिल्हा बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:00 IST

आजारी असल्याने चालताही येत नसल्याचे उपवनसंरक्षक यांना सांगितले. मात्र त्यांनी  दया दाखविली नसल्याचे सांगत,  महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा) १९८१ नियम ७९ परिशिष्ट ३ नियम १ ते १० मधील तरतुदीनुसार अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला लागू होतो. मात्र यानुसारही आपल्याला लाभ देण्यात आला नसल्याचे ते म्हणाले.. मे २०१९ पासून आजतागायत  कोणतीही रजा मंजूर केली नाही. यामुळे  वेतन, वैद्यकीय खर्चसुद्धा मिळालेला नाही.  

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  अर्धांगवायू झाल्याने अंथरुणाला खिळलेल्या वनपालाची थेट जिल्ह्याबाहेर वाशिम येथे बदली केली. इतकेच नव्हे तर त्यांना पुसद येथून तत्काळ कार्यमुक्तही करण्यात आले. या   कारभारामुळे उपासमार होत असून, वनविभागाची यंत्रणा विनाकारण त्रास देत असल्याची खंत कर्मचारी रमेश सुरोशे यांनी व्यक्त केली आहे. पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्रात तपासणी नाक्यावर कार्यरत असताना सुरोशे यांना ९ मे २०१९ रोजी कर्तव्यावर असतानाच अर्धांगवायूचा झटका आला. यातून ते अजूनही सावरलेले नाहीत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. अंथरुणावर असतानाच कुठलीही पूर्वकल्पना न देता सामाजिक वनीकरण वाशिम येथे त्यांची विभाग बदली करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना उपवनसंरक्षक यांनी तत्काळ कार्यमुक्तही केले. आजारी असल्याने चालताही येत नसल्याचे उपवनसंरक्षक यांना सांगितले. मात्र त्यांनी  दया दाखविली नसल्याचे सांगत,  महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा) १९८१ नियम ७९ परिशिष्ट ३ नियम १ ते १० मधील तरतुदीनुसार अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला लागू होतो. मात्र यानुसारही आपल्याला लाभ देण्यात आला नसल्याचे ते म्हणाले.. मे २०१९ पासून आजतागायत  कोणतीही रजा मंजूर केली नाही. यामुळे  वेतन, वैद्यकीय खर्चसुद्धा मिळालेला नाही.   जगण्याचा मूलभूत अधिकारच बाधित केला आहे. या अन्यायाविरोधात राज्याच्या लोकायुक्त, वनविभागाचे प्रधान सचिव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याचे सुरोशे यांनी सांगितले.   

रुग्णालयात असताना सक्तीची कार्यमुक्ती का?- सोईच्या कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतरही वरिष्ठ त्याला कार्यमुक्त करीत नाही. रमेश सुरोशे यांच्या प्रकरणात ते रुग्णालयात भरती असतानाही त्यांना परस्पर कार्यमुक्त केले. येथे वरिष्ठांनी सहानुभूती दाखविलेली नाही. त्यांना अडचणीच्या काळात मदत सोडा, हक्काचे वेतनही दिलेले नसल्याचे सुराेशे यांनी सांगितले. वनपाल पदावर  एकच पदावधी झालेला असताना विभागाबाहेर केलेली बदलीही निमयबाह्य असल्याचे सुरोशे यांचे म्हणणे आहे.

 शेंबाळपिंपरी वन नाक्यावर असलेले वनपाल रमेश सुरोशे यांची २०१९ मध्ये बदली झाली. मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशावरुनच त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. या प्रकरणात यापेक्षा जास्त माहिती नाही. - सचिन सावंत, वनपरिक्षेत्र अधिकारी

 

टॅग्स :forest departmentवनविभाग