शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सणासुदीत शांतता राखा

By admin | Updated: August 14, 2016 01:08 IST

आगामी काळात होऊ घातलेला पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा आदी सणासुदीत कायदा व सुव्यवस्था अबाधित शांतता राखा, ...

पोलीस महानिरीक्षक : उमरखेड, पुसदमध्ये शांतता समितीची सभा उमरखेड/पुसद : आगामी काळात होऊ घातलेला पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा आदी सणासुदीत कायदा व सुव्यवस्था अबाधित शांतता राखा, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक (अमरावती परिक्षेत्र) विठ्ठलराव जाधव यांनी केले. शनिवारी उमरखेड आणि पुसद पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकींमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. उमरखेड येथे बोलताना पोलीस महानिरीक्षक यांनी दोन वर्षापूर्वी गणेशोत्सवादरम्यान झालेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत यंदा शांतता ठेवण्याची सूचना केली. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, प्रभारी डिवायएसपी सदानंद मानकर, उमरखेडचे ठाणेदार अनिल पाटील, बिटरगावचे ठाणेदार सूरज बोंडे, पुसद शहरचे ठाणेदार गजानन शेळके, पुसद ग्रामीणचे ठाणेदार धनंजय जगदाळे उपस्थित होते. उमरखेड आणि पुसद येथे झालेल्या बैठकांमध्ये नागरिकांकडून आलेल्या सूचनांचे पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वागत केले. उमरखेड येथील शांतता समितीच्या बैठकीत माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, इनायतउल्ला जनाब, नंदकिशोर अग्रवाल, माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल, नारायण भट्टड, मौलाना अख्तर नदवी, प्रशांत पतेवार, अ‍ॅड. संजय जाधव, साजीद जागिरदार, बळवंतराव नाईक, संजय भंडारे, महेश काळेश्वरकर, एजाज जनाब, सतीश नाईक, नितीन भुतडा, शिवाजी वानखेडे, शिवाजी माने, रमेश चव्हाण, प्रकाश आर्य, डॉ. अनिल काळबांडे, सदाशिव भेंडीकर, पांडुरंग शिंदे, लक्ष्मीबाई मलकुलवार उपस्थित होते. (लोकमत चमू) उमरखेड ठाणेदारांना अल्टीमेटम उमरखेड शहरात चालू असलेल्या अवैध धंद्यांवर तत्काळ पायबंद घालावा. तसेच नागरिकांनी बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मांडलेल्या समस्यांची दखल घेऊन तत्काळ निपटारा करा, असे निर्देश पोलीस महानिरीक्षकांनी उमरखेडचे ठाणेदार अनिल पाटील यांना दिले. या समस्या सोडविण्यासाठी काही दिवसांचा अल्टीमेटम दिला. पोलिसांचा सामान्यांशी संपर्क नाही पुसदमध्ये शांतता समितीच्या बैठकीला अत्यल्प उपस्थिती राहते याचे कारण म्हणजे पोलिसांचा सर्वसामान्यांशी संपर्क नाही, असे गाऱ्हाणे नागरिकांनी मांडले. पूर्वी शांतता समितीच्या बैठकीला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहात होते. मात्र आता पोलीसच सामान्यांना जवळ करीत नसल्याने नागरिकांनी बैठकीकडे पाठ फिरविली आहे.