शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नेरच्या ७५ अनाथ मुलींसाठी उभारला कन्यादान निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 21:49 IST

सातवा वेतन आयोग लागला का हो गुरुजी? आपल्याला किती अरिअर्स मिळेल? केंद्राप्रमाणे मिळेल की नाही?... हेच प्रश्न सध्या शिक्षकांच्या चर्चांमध्ये सुपरहिट आहेत. पण शिक्षक केवळ पैसा कमावण्यासाठी नसतो. विद्यार्थ्यांना अन् अवघ्या समाजालाच ज्ञानश्रीमंत बनविणे हे त्यांचे कर्तव्य असते.

ठळक मुद्देमृत्यूने उलगडली थोरवी : निवृत्तीनंतर मुख्याध्यापकाने कष्टातून पै-पै जोडली

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : सातवा वेतन आयोग लागला का हो गुरुजी? आपल्याला किती अरिअर्स मिळेल? केंद्राप्रमाणे मिळेल की नाही?... हेच प्रश्न सध्या शिक्षकांच्या चर्चांमध्ये सुपरहिट आहेत. पण शिक्षक केवळ पैसा कमावण्यासाठी नसतो. विद्यार्थ्यांना अन् अवघ्या समाजालाच ज्ञानश्रीमंत बनविणे हे त्यांचे कर्तव्य असते. नेरच्या एका शिक्षकाने असाच समाजशिक्षकाचा वास्तूपाठ घालून दिला आहे. ७५ अनाथ मुलींसाठी त्यांनी स्वत:च्या कष्टातून कन्यादान निधी उभा केला. याची कुणाला कुणकुणही लागू दिली नाही. परवा ते जग सोडून गेले, तेव्हा त्यांच्या या मोठेपणाची नेरवासीयांना माहिती मिळाली अन् सारेच त्यांच्या दातृत्वापुढे नतमस्तक झाले.या शिक्षकाचे नाव आहे नारायणराव बोरकर. नुकतेच वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे मेंदूच्या आजाराने निधन झाले. माणसाच्या मृत्यूनंतर मोठी चर्चा होते. तशीच बोरकर गुरुजींचीही झाली. या चर्चेतूनच त्यांच्या मोठेपणाची ओळख सर्वांनी पटली.नारायण बोरकर हे जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. काही वर्षांपूर्वी ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. पण सेवानिवृत्तीचा काळ स्वत:पुरता विचार करत सुखाने घालविण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, हा त्यांचा निर्धार होता. बोरकर यांनी नेर अर्बन पतसंस्थेत डेली कमिशन एजंट म्हणून काम सुरू केले. पण हे काम स्वत:साठी नव्हते. त्यामागे वेगळाच उद्देश होता. या कामातून त्यांना जे कमिशन मिळायचे, त्यातून त्यांनी समाजातील अनाथ, गरीब मुलींसाठी पैसा जमा केला. साडेसहा वर्षांच्या दामदुप्पट योजनेत त्यांनी ७५ मुलींच्या नावाने ५००, १००० रुपयांचे बाँड घेतले. याची इतर कुणाला माहिती दिली नाही. केवळ ज्या मुलींच्या नावे हे बाँड काढले, त्यांच्यापर्यंत बाँड पोहोचवून दिले. या माध्यमातून त्यांनी ‘कन्यादान निधी’ची तरतूद केली होती. इतर कुणालाही माहिती नसली तरी पतसंस्थेला याची माहिती होती. त्यामुळेच या कामाची दखल घेऊन पतसंस्थेने त्यांना महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कारही बहाल केला होता.निवृत्तीनंतरही समाजातील निराधार मुलींसाठी झटणारे नारायणराव बोरकर हे आपल्या नोकरीच्या कालावधीतही उत्तम शिक्षक होते. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी संत गाडगेबाबा यांची प्रेरणा घेऊन शिवाजी नगर परिसरात खराटा घेऊन स्वच्छता केली. शिष्यवृत्ती परीक्षेत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यामुळे अनेक विद्यार्थी शासनाची शिष्यवृत्ती मिळवून शिकू शकले. या संवेदनशील निवृत्त मुख्याध्यापकाच्या निधनाने नेर शहर हळहळले. त्यांच्या मागे देवीदास बोरकर, नंदकिशोर बोरकर यांच्यासह पाच मुले आहेत.नारायणराव बोरकर यांनी निवृत्तीनंतर डेली कलेक्शनची एजन्सी घेतली. मिळणाऱ्या कमिशनमधून त्यांनी गरीब मुलींसाठी दामदुप्पट अंतर्गत किमान ७५ मुलींच्या नावाने डिपॉझिट टाकले. १०१ मुलींच्या नावे ते कन्यादान योजनेत रक्कम गुंतविणार होते. पण मृत्यूने त्यांचा संकल्प थांबला.- प्रदीप झाडे, महाव्यवस्थापक,नेर अर्बन पतसंस्था