शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

मशागतीची कामे ठप्प

By admin | Updated: April 25, 2015 01:58 IST

बदलत्या ऋतुचक्रामुळे शेतकरीवर्ग धास्तावला आहे. शिवाय शेतमालाला बाजारपेठेत अतिशय कमी दरात विकावे लागत असल्याने लागवड खर्चही हाती येत नाही.

पांडुरंग भोयर सोनखासबदलत्या ऋतुचक्रामुळे शेतकरीवर्ग धास्तावला आहे. शिवाय शेतमालाला बाजारपेठेत अतिशय कमी दरात विकावे लागत असल्याने लागवड खर्चही हाती येत नाही. अशी स्थिती गेल्या तीन वर्षापासून कमी-अधिक प्रमाणात निर्माण झाली आहे. यावर्षी तर अवकाळी पावसाचे तांडव अद्यापही सुरूच आहे. यामुळे हादरलेल्या शेतकऱ्याने अद्यापही मशागतीच्या कामाला सुरूवात केली नाही. हजारो एकर जमीन पडीत ठेवण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहे. नेर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सोनखास या गावाला लागून किमान एक हजार ५०० एकर शेतजमीन आहे. परिसरातील इतरही गावांचा यात समावेश आहे. लहान-मोठा आणि मध्यम अश्या तिन्ही प्रकारचे शेतकरी येथे आहे. सातत्याने होत असलेल्या नापिकीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी चक्क जमीन पडीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जमीन कसने शक्य नसल्याने ज्याच्याकडे ५० एकर शेत आहे तो शेतकरी १० ते १५ एकरातच लागवड करण्याची तयारी करत आहे. शेती हा अनेकांच्या उपजिवीकेचा आधार असला तरी आता त्यातून पोटाची खळगी भरने शक्य होत नसल्याचे दिसत असल्याने अनेकांनी शेतीतून काढता पाय घेतला आहे. शेती कसताना मोठे भांडवल जवळ असणे आवश्यक आहे. याशिवाय योग्य दर्जाचे बी-बियाणे मिळणे, खतांची टंचाई सर्वात महत्वाचे म्हणजे वेळोवेळी शेतमजूर न मिळाल्यामुळे होणारे नुकसान, वन्य प्राण्यांचा त्रास या सर्व संकटांवर मात करूनही शेतकरी आपली जमीन कसत आला. आता मात्र निसर्गाच्या ऋतुचक्रातच बदल झाल्याचे दिसत आहे. संपूर्ण वर्षभर अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने जवळपास सर्वच पिके उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत बाजारपेठेत किमान शेतमालाचा भाव चांगला असणे अपेक्षीत होता, मात्र एकीकडे नापिकी आणि हाती आलेले पीक उद्ध्वस्त होत असतानाच दुसरीकडे बाजारमूल्यही झपाट्याने कमी झाले. शेतकऱ्यांची अडचण ओळखून व्यापाऱ्यांनी पडेल भावात धान्याची खरेदी केली. कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू, तूर या धान्याचे भाव व्यापाऱ्याच्या मर्जीनेच ठरविण्यात आले. लावलेला खर्चही निघाला नाही. या परिस्थितीला सातत्याने तीन वर्षापासून शेतकरी तोंड देत आहे. आता मात्र तो मेटाकुटीस आला असून, झेपेल तेवढीच शेतजमीन कसायची या मानसिकतेत आहे. मक्ता, बटईचे दर घसरले२० एकरापेक्षा अधिक जमीन असलेले शेतकरी, नोकरदार शेतकरी आपली शेतजमीन मक्ता, बटईने देत होते. यावर्षी मात्र मक्ता, बटईने जमीन करण्यास कुणीही तयार नाही. त्यामुळेच कोरवाहू जमिनीचा मागील वर्षी एक एकराचा मक्ता तीन हजार रुपये होता. तो यावर्षी दीड ते दोन हजारावरच आला आहे. ओलिताच्या शेतीलाही पाच हजारा ऐवजी आता तीन हजार रुपये देण्यासाठीसुद्धा कुणी तयार नाही. अशी परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवल्याचे जाणकार शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यांत्रिकीकरणाने रोखीचा व्यवहारपूर्वी परंपरागत पद्धतीने शेतीची मशागत केली जात होती, तेव्हा बैलांचा उपयोग होत होता. आता मात्र शेतमजूर व सालगडी मिळत नसल्याने शेतीची मशागत ट्रॅक्टरव्दारेच करावी लागते. डिझलचे दर लक्षात घेता शेतकऱ्याला नगदी पैसे मोजून द्यावे लागतात. याशिवाय इतर कामांसाठीसुद्धा शेतकऱ्यांना रोखीचाच व्यवहार करावा लागतो. उत्पन्नासाठी मात्र वर्षभर वाट पाहावी लागते.