शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांच्या तुरुंग कहाण्यांचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 21:39 IST

शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेल्या कैद्यांचे उर्वरित आयुष्य कसे असते, याचा अंगावर शहारे आणणारा थरार त्यांच्याच तोंडून बाहेर पडला. एकदा कारागृहाचा शिक्का लागला की कुटुंब उद्ध्वस्त होते, रक्ताचे नातेवाईक, शेजारी व समाजही दुरावतो.

ठळक मुद्देकुटुंब उद्ध्वस्त : समाज-नातेवाईकांचा दुरावा, लग्न-समारंभ, कामालाही बोलवेना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेल्या कैद्यांचे उर्वरित आयुष्य कसे असते, याचा अंगावर शहारे आणणारा थरार त्यांच्याच तोंडून बाहेर पडला. एकदा कारागृहाचा शिक्का लागला की कुटुंब उद्ध्वस्त होते, रक्ताचे नातेवाईक, शेजारी व समाजही दुरावतो. लग्न समारंभात टाळले जाते, एवढेच काय गावात कुणी कामालाही बोलावत नाही, अशी व्यथा कैद्यांनी बोलून दाखविली.कैदी व न्यायाधीन बंद्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘वऱ्हाड’ या स्वयंसेवी संस्थेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज-मोझरी (जि. अमरावती) येथे किलबिल सेंटरमध्ये ‘तुरुंग कहाण्या : बंदीवास ते पुनर्वसन’ हा कार्यक्रम घेतला. २९, ३० व ३१ डिसेंबर असे तीन दिवस हा कार्यक्रम झाला. विदर्भाच्या यवतमाळसह ११ जिल्ह्यातील सुमारे १०० कैदी-न्यायाधीन बंद्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. त्यात तब्बल ४० महिलांचा समावेश होता. उपस्थितांपैकी बहुतांश खुनाच्या गुन्ह्यातील होते.कुणी २० वर्षे तर कुणी १० वर्षे शिक्षा भोगलेले, सत्र न्यायालयाने शिक्षा दिली, परंतु उच्च न्यायालयात निर्दोष सुटलेल्यांचा त्यात समावेश होता. या निवासी कार्यक्रमाला बाहेरुन कोणत्याही वक्त्याला बोलाविण्यात आले नव्हते. तर उपस्थित कैदीच एकमेकांचे नातेवाईक, मित्र व वक्ते झाले होते. त्यांनी आपले थरारक अनुभव या कार्यक्रमात कथन केले. यावेळी त्यांनी कारागृहात चालणारे धक्कादायक प्रकारही उघड केले.पॅरोल-फर्लो रजा महागलीपॅरोल-फर्लो रजा पूर्वी १०० रुपयांच्या बाँडवर जामीन देऊन मिळत होती. मात्र शासनाने आता हे नियम कडक केले असून २० ते २५ हजार रुपयांचा जामीन मागितला जातोय. आधीच सर्व उद्ध्वस्त झालेल्यांनी २५ हजार आणायचे कोठून, असा प्रश्न उपस्थित केला गेला.जिवंतपणीच मृत्यूच्या यातनाकारागृहातली शिक्षा तुलनेने सुसह्य असते. पण कारागृहातून बाहेर आल्यावर भोगावा लागणारा सामाजिक बहिष्कार जिवंतपणीच मृत्यूच्या यातना देत असतो. हाच थरारक, विदारक अनुभव कैद्यांनी बोलून दाखविला. यावेळी बहुतेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या कैद्यांच्या सुटकेसाठी ‘वऱ्हाड’ने प्रयत्न केले, हे विशेष!यवतमाळच्या कैद्याने गमावले वर्षभरात कुटुंबातील दोन जीव, धक्क्याने झाले मृत्यूयवतमाळच्या एका कैद्याने सांगितले की, मी कारागृहात गेलो याचा धक्का कुटुंबाला सहन करता आला नाही. त्यामुळे दीड वर्षातच कोणताही आजार नसलेल्या पत्नी व पाठोपाठ मुलाचे निधन झाले.अकोल्यातील महिलेने सांगितले की, तिचा पती कारागृहात आहे. तो सुटावा म्हणून घरदार विकून फी दिली. मात्र सुटका झाली नाही. आता उच्च न्यायालयात जाण्याची आर्थिक कुवत नाही. लहान मुलगा आहे, त्यामुळे रहावे कुठे, जगावे कसे, हा प्रश्न आहे. जागा नसल्याने घरकूलही मिळू शकत नाही.बुलडाण्यातील महिलेने सांगितले की, कौटुंबिक प्रकरणात आम्ही दोघी कारागृहात होतो. आम्ही जामिनावर आलो, परंतु आमच्या कुटुंबातील चौघेही पुरुष कारागृहात आहेत. सासू व दोन जाऊ एवढ्या तीन महिलाच बाहेर आहेत. पुरुषांना सोडवावे कसे, याचा प्रश्न उभा आहे.एका कैद्याने सांगितले की, मी १९ वर्षे जन्मठेप भोगली. परंतु मी निर्दोष आहे, पाहिजे तर गावकऱ्यांना विचारा. एका मृत्यूपूर्व बयानाच्या आधारे मला शिक्षा झाली आणि माझे आयुष्यच उद्ध्वस्त झाले.एक कैदी म्हणाला, कारागृहातून बाहेर पडल्यावर खुनाचा अनुभव आहे म्हणून थेट खूनाच्याच सुपाऱ्यांची आॅफर येऊ लागली. एकवेळ हातून खून करण्याची चूक झाली. म्हणून पुन्हा-पुन्हा खून करणार काय? असे ठणकावत ही आॅफर धुडकावली.एका कैद्याने सांगितले की, गुन्हा घडला, शिक्षा झाली, प्रायश्चित्त घेतले. पण आता पुन्हा कधीही त्या वाटेने जाणे नाही.