शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

संघर्षाची व संवादाची यात्रा ही आमची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:54 IST

पाच वर्ष शासक नव्हे तर सेवक म्हणून काम केले. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा जनादेश हवा आहे. जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेवर पुन्हा भाजप-सेनेचा झेंडा फडकवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : दारव्हा येथील सभेत मांडला कामाचा लेखाजोखा, महाजनादेश यात्रेचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : पाच वर्ष शासक नव्हे तर सेवक म्हणून काम केले. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा जनादेश हवा आहे. जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेवर पुन्हा भाजप-सेनेचा झेंडा फडकवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.दारव्हा येथील शिवाजी स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा तालुक्यात दाखल झाल्यानंतर बोरी आणि बोदेगाव येथे स्वागत झाले. सभेला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कामगार मंत्री डॉ. संजय कुंटे, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार, आमदार प्रवीण पोटे, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे उपस्थित होते.विरोधक महाजनादेश यात्रेवर टीका करीत असले तरी यात्रा ही भाजपची परंपरा आहे. विरोधात असताना संघर्षाची आणि सत्तेत संवादाची यात्रा काढत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसली. आम्ही मात्र ११ कोटींची कर्जमाफी दिली, १९२ कोटी पीक विमा आणि पाच हजार ७०० कोटींचे पीक कर्ज वाटप केले. यवतमाळ-वर्धा-नांदेड रेल्वे मार्गासाठी ९७ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले. वर्षभरात या मार्गाचा एक टप्पा सुरू करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.तत्पूर्वी आमदार प्रवीण पोटे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, महादेवराव सुपारे, डॉ. अजय दुबे यांनी विचार व्यक्त केले. भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय राहणे यांनी आभार मानले. मंचावर भाजप-शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.आगामी मुख्यमंत्रीही फडणवीसच -संजय राठोडमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड आवर्जुन उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे मंचावर आगमन झाल्यानंतर एकमेव ना. संजय राठोड यांचेच मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त भाषण झाले. त्यांच्या भाषणालाही उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. राज्याचा पुढचा मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस होतील यात मला शंका वाटत नाही, अशा शब्दात ना. संजय राठोड यांनी विश्वास व्यक्त केला. पाच वर्षात मुख्यमंत्र्यांची समर्थपणे साथ मिळाली, त्यामुळे महसूल विभागात अनेक निर्णय घेता आले. मुख्यमंत्र्यांनी चांगल्या पद्धतीने अनेक प्रश्नांची सोडवणूक केल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस