शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

संघर्षाची व संवादाची यात्रा ही आमची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:54 IST

पाच वर्ष शासक नव्हे तर सेवक म्हणून काम केले. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा जनादेश हवा आहे. जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेवर पुन्हा भाजप-सेनेचा झेंडा फडकवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : दारव्हा येथील सभेत मांडला कामाचा लेखाजोखा, महाजनादेश यात्रेचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : पाच वर्ष शासक नव्हे तर सेवक म्हणून काम केले. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा जनादेश हवा आहे. जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेवर पुन्हा भाजप-सेनेचा झेंडा फडकवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.दारव्हा येथील शिवाजी स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा तालुक्यात दाखल झाल्यानंतर बोरी आणि बोदेगाव येथे स्वागत झाले. सभेला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कामगार मंत्री डॉ. संजय कुंटे, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार, आमदार प्रवीण पोटे, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे उपस्थित होते.विरोधक महाजनादेश यात्रेवर टीका करीत असले तरी यात्रा ही भाजपची परंपरा आहे. विरोधात असताना संघर्षाची आणि सत्तेत संवादाची यात्रा काढत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसली. आम्ही मात्र ११ कोटींची कर्जमाफी दिली, १९२ कोटी पीक विमा आणि पाच हजार ७०० कोटींचे पीक कर्ज वाटप केले. यवतमाळ-वर्धा-नांदेड रेल्वे मार्गासाठी ९७ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले. वर्षभरात या मार्गाचा एक टप्पा सुरू करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.तत्पूर्वी आमदार प्रवीण पोटे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, महादेवराव सुपारे, डॉ. अजय दुबे यांनी विचार व्यक्त केले. भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय राहणे यांनी आभार मानले. मंचावर भाजप-शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.आगामी मुख्यमंत्रीही फडणवीसच -संजय राठोडमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड आवर्जुन उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे मंचावर आगमन झाल्यानंतर एकमेव ना. संजय राठोड यांचेच मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त भाषण झाले. त्यांच्या भाषणालाही उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. राज्याचा पुढचा मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस होतील यात मला शंका वाटत नाही, अशा शब्दात ना. संजय राठोड यांनी विश्वास व्यक्त केला. पाच वर्षात मुख्यमंत्र्यांची समर्थपणे साथ मिळाली, त्यामुळे महसूल विभागात अनेक निर्णय घेता आले. मुख्यमंत्र्यांनी चांगल्या पद्धतीने अनेक प्रश्नांची सोडवणूक केल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस