शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षाची व संवादाची यात्रा ही आमची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:54 IST

पाच वर्ष शासक नव्हे तर सेवक म्हणून काम केले. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा जनादेश हवा आहे. जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेवर पुन्हा भाजप-सेनेचा झेंडा फडकवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : दारव्हा येथील सभेत मांडला कामाचा लेखाजोखा, महाजनादेश यात्रेचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : पाच वर्ष शासक नव्हे तर सेवक म्हणून काम केले. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा जनादेश हवा आहे. जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेवर पुन्हा भाजप-सेनेचा झेंडा फडकवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.दारव्हा येथील शिवाजी स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा तालुक्यात दाखल झाल्यानंतर बोरी आणि बोदेगाव येथे स्वागत झाले. सभेला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कामगार मंत्री डॉ. संजय कुंटे, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार, आमदार प्रवीण पोटे, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे उपस्थित होते.विरोधक महाजनादेश यात्रेवर टीका करीत असले तरी यात्रा ही भाजपची परंपरा आहे. विरोधात असताना संघर्षाची आणि सत्तेत संवादाची यात्रा काढत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसली. आम्ही मात्र ११ कोटींची कर्जमाफी दिली, १९२ कोटी पीक विमा आणि पाच हजार ७०० कोटींचे पीक कर्ज वाटप केले. यवतमाळ-वर्धा-नांदेड रेल्वे मार्गासाठी ९७ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले. वर्षभरात या मार्गाचा एक टप्पा सुरू करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.तत्पूर्वी आमदार प्रवीण पोटे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, महादेवराव सुपारे, डॉ. अजय दुबे यांनी विचार व्यक्त केले. भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय राहणे यांनी आभार मानले. मंचावर भाजप-शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.आगामी मुख्यमंत्रीही फडणवीसच -संजय राठोडमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड आवर्जुन उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे मंचावर आगमन झाल्यानंतर एकमेव ना. संजय राठोड यांचेच मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त भाषण झाले. त्यांच्या भाषणालाही उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. राज्याचा पुढचा मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस होतील यात मला शंका वाटत नाही, अशा शब्दात ना. संजय राठोड यांनी विश्वास व्यक्त केला. पाच वर्षात मुख्यमंत्र्यांची समर्थपणे साथ मिळाली, त्यामुळे महसूल विभागात अनेक निर्णय घेता आले. मुख्यमंत्र्यांनी चांगल्या पद्धतीने अनेक प्रश्नांची सोडवणूक केल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस