शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिवनदायिनी निर्गुडेने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:10 IST

शहराजवळून वाहणाऱ्या जिवनदायीनी निर्गुडा नदीने अखेर तळ गाठला आहे. या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडल्याने नोव्हेंबरपर्यंत निर्गुडा नदीमध्ये पाणी कायम होते. परंतु आता ही नदी तळ गाठत असल्यामुळे वणीवर पुन्हा पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचे पुन्हा संकट : नवरगाव धरणात केवळ ६८.६९ टक्के जलसाठा

म.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहराजवळून वाहणाऱ्या जिवनदायीनी निर्गुडा नदीने अखेर तळ गाठला आहे. या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडल्याने नोव्हेंबरपर्यंत निर्गुडा नदीमध्ये पाणी कायम होते. परंतु आता ही नदी तळ गाठत असल्यामुळे वणीवर पुन्हा पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. सध्या नवरगावच्या धरणात केवळ ६८.६९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.शहराची लोकसंख्या जवळपास ८० ते ९० हजरांच्यावर असून निर्गुडा नदीद्वारेच नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. नळाद्वारे पाणी सोडण्याची योजना १९५८ पासून सुरू झाली. तेव्हा १५ ते २० हजार लोकांसाठी ही योजना कार्यान्वीत होती. मात्र आता शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या वेकोलिच्या कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत गेली. त्यामुळे नवरगाव धरणातून पाणी आरक्षित करून वणीत पाणी पुरवठा सुरू होता. नगरपरिषदेने मागीलवर्षी ५.९५ दलघमी पाणी आरक्षित केले.जिल्हाधिकाºयांनी या पाण्याचे नियोजन करून शहराला पाणी दिले. धरणात अल्प प्रमाणात पाणी असल्यामुळे महिन्यातून दोनवेळा पाणी सोडण्याचे नियोजन केले, तर राजूर पीठने शहराला चांगला आधार देऊन २० ते २५ ट्युबवेलमार्फत शहराची कशीबशी तहान भागविली. मागीलवर्षी १५ कोटी रूपयांची वर्धा नदीवरून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजना आणली. मात्र जुलै महिन्यात या नदीला मोठा पूर आल्याने नदीवरचे तीन पंप वाहून गेले. त्यामुळे वणीपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. सध्या नगरपरिषदेने ४.०० दलघमी पाणी आरक्षित केले आहे. २.०० दलघमी पाणी वर्धा नदीतून घेतले आहे. नवरगाव धरणात सध्या ८.५७ दलघमी पाणीसाठा असून ६८.६९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. नवरगाववरून या नदीत ००.१८ दलघमी पाणी सोडले असून ते गुरूवारी वणीपर्यंत पोहोचणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.कोळसा खाणीमुळे बावनमोडी नाला पडला कोरडागावाजवळून बारामाही वाहणाऱ्या बावनमोडी नाल्यातील जलसाठा आटल्याने गावातील नळयोजना प्रभावित झाली आहे. या नाल्याचा उगमस्थान राजूर येथे आहे. मात्र कोळसा खाणीमुळे सध्या पाण्याचा प्रवाह बंद पडला आहे. परिणामी गावकऱ्यांना ऐन हिवाळ्यातच पाणीसाठी भटकंती करावी लागत आहे. बावनमोडी नाल्याच्यालगत राजूर येथील विटभट्टी असून नाल्यावर इंजिन लावून विटाभट्टीसाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे या नाल्याचे खोलिकरण व साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :riverनदी