शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

जिवनदायिनी निर्गुडेने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:10 IST

शहराजवळून वाहणाऱ्या जिवनदायीनी निर्गुडा नदीने अखेर तळ गाठला आहे. या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडल्याने नोव्हेंबरपर्यंत निर्गुडा नदीमध्ये पाणी कायम होते. परंतु आता ही नदी तळ गाठत असल्यामुळे वणीवर पुन्हा पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचे पुन्हा संकट : नवरगाव धरणात केवळ ६८.६९ टक्के जलसाठा

म.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहराजवळून वाहणाऱ्या जिवनदायीनी निर्गुडा नदीने अखेर तळ गाठला आहे. या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडल्याने नोव्हेंबरपर्यंत निर्गुडा नदीमध्ये पाणी कायम होते. परंतु आता ही नदी तळ गाठत असल्यामुळे वणीवर पुन्हा पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. सध्या नवरगावच्या धरणात केवळ ६८.६९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.शहराची लोकसंख्या जवळपास ८० ते ९० हजरांच्यावर असून निर्गुडा नदीद्वारेच नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. नळाद्वारे पाणी सोडण्याची योजना १९५८ पासून सुरू झाली. तेव्हा १५ ते २० हजार लोकांसाठी ही योजना कार्यान्वीत होती. मात्र आता शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या वेकोलिच्या कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत गेली. त्यामुळे नवरगाव धरणातून पाणी आरक्षित करून वणीत पाणी पुरवठा सुरू होता. नगरपरिषदेने मागीलवर्षी ५.९५ दलघमी पाणी आरक्षित केले.जिल्हाधिकाºयांनी या पाण्याचे नियोजन करून शहराला पाणी दिले. धरणात अल्प प्रमाणात पाणी असल्यामुळे महिन्यातून दोनवेळा पाणी सोडण्याचे नियोजन केले, तर राजूर पीठने शहराला चांगला आधार देऊन २० ते २५ ट्युबवेलमार्फत शहराची कशीबशी तहान भागविली. मागीलवर्षी १५ कोटी रूपयांची वर्धा नदीवरून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजना आणली. मात्र जुलै महिन्यात या नदीला मोठा पूर आल्याने नदीवरचे तीन पंप वाहून गेले. त्यामुळे वणीपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. सध्या नगरपरिषदेने ४.०० दलघमी पाणी आरक्षित केले आहे. २.०० दलघमी पाणी वर्धा नदीतून घेतले आहे. नवरगाव धरणात सध्या ८.५७ दलघमी पाणीसाठा असून ६८.६९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. नवरगाववरून या नदीत ००.१८ दलघमी पाणी सोडले असून ते गुरूवारी वणीपर्यंत पोहोचणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.कोळसा खाणीमुळे बावनमोडी नाला पडला कोरडागावाजवळून बारामाही वाहणाऱ्या बावनमोडी नाल्यातील जलसाठा आटल्याने गावातील नळयोजना प्रभावित झाली आहे. या नाल्याचा उगमस्थान राजूर येथे आहे. मात्र कोळसा खाणीमुळे सध्या पाण्याचा प्रवाह बंद पडला आहे. परिणामी गावकऱ्यांना ऐन हिवाळ्यातच पाणीसाठी भटकंती करावी लागत आहे. बावनमोडी नाल्याच्यालगत राजूर येथील विटभट्टी असून नाल्यावर इंजिन लावून विटाभट्टीसाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे या नाल्याचे खोलिकरण व साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :riverनदी