शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जिवनदायिनी निर्गुडेने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:10 IST

शहराजवळून वाहणाऱ्या जिवनदायीनी निर्गुडा नदीने अखेर तळ गाठला आहे. या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडल्याने नोव्हेंबरपर्यंत निर्गुडा नदीमध्ये पाणी कायम होते. परंतु आता ही नदी तळ गाठत असल्यामुळे वणीवर पुन्हा पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचे पुन्हा संकट : नवरगाव धरणात केवळ ६८.६९ टक्के जलसाठा

म.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहराजवळून वाहणाऱ्या जिवनदायीनी निर्गुडा नदीने अखेर तळ गाठला आहे. या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडल्याने नोव्हेंबरपर्यंत निर्गुडा नदीमध्ये पाणी कायम होते. परंतु आता ही नदी तळ गाठत असल्यामुळे वणीवर पुन्हा पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. सध्या नवरगावच्या धरणात केवळ ६८.६९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.शहराची लोकसंख्या जवळपास ८० ते ९० हजरांच्यावर असून निर्गुडा नदीद्वारेच नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. नळाद्वारे पाणी सोडण्याची योजना १९५८ पासून सुरू झाली. तेव्हा १५ ते २० हजार लोकांसाठी ही योजना कार्यान्वीत होती. मात्र आता शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या वेकोलिच्या कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत गेली. त्यामुळे नवरगाव धरणातून पाणी आरक्षित करून वणीत पाणी पुरवठा सुरू होता. नगरपरिषदेने मागीलवर्षी ५.९५ दलघमी पाणी आरक्षित केले.जिल्हाधिकाºयांनी या पाण्याचे नियोजन करून शहराला पाणी दिले. धरणात अल्प प्रमाणात पाणी असल्यामुळे महिन्यातून दोनवेळा पाणी सोडण्याचे नियोजन केले, तर राजूर पीठने शहराला चांगला आधार देऊन २० ते २५ ट्युबवेलमार्फत शहराची कशीबशी तहान भागविली. मागीलवर्षी १५ कोटी रूपयांची वर्धा नदीवरून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजना आणली. मात्र जुलै महिन्यात या नदीला मोठा पूर आल्याने नदीवरचे तीन पंप वाहून गेले. त्यामुळे वणीपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. सध्या नगरपरिषदेने ४.०० दलघमी पाणी आरक्षित केले आहे. २.०० दलघमी पाणी वर्धा नदीतून घेतले आहे. नवरगाव धरणात सध्या ८.५७ दलघमी पाणीसाठा असून ६८.६९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. नवरगाववरून या नदीत ००.१८ दलघमी पाणी सोडले असून ते गुरूवारी वणीपर्यंत पोहोचणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.कोळसा खाणीमुळे बावनमोडी नाला पडला कोरडागावाजवळून बारामाही वाहणाऱ्या बावनमोडी नाल्यातील जलसाठा आटल्याने गावातील नळयोजना प्रभावित झाली आहे. या नाल्याचा उगमस्थान राजूर येथे आहे. मात्र कोळसा खाणीमुळे सध्या पाण्याचा प्रवाह बंद पडला आहे. परिणामी गावकऱ्यांना ऐन हिवाळ्यातच पाणीसाठी भटकंती करावी लागत आहे. बावनमोडी नाल्याच्यालगत राजूर येथील विटभट्टी असून नाल्यावर इंजिन लावून विटाभट्टीसाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे या नाल्याचे खोलिकरण व साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :riverनदी