शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

येळाबाराच्या महिला वनरक्षकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

By admin | Updated: January 10, 2017 01:05 IST

महिला वनरक्षकाचा पतीनेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना शहरालगतच्या जांब परिसरातील

बेरोजगार पतीकडून छळ, वसतिगृहात आश्रय : मृतक जमादाराची मुलगी यवतमाळ : महिला वनरक्षकाचा पतीनेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना शहरालगतच्या जांब परिसरातील खरोली शिवारात सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. या घटनेने वन विभागासह शहरात एकच खळबळ उडाली. पूनम रणजित भाटी (२७) असे मृत वनरक्षकाचे नाव आहे. पूनमचा विवाह २००६ मध्ये जांब येथील रणजित नरेश भाटी (३०) याच्याशी झाला होता. त्यावेळी रणजित हा औरंगाबाद येथे खासगी कंपनीत नोकरीवर होता. दरम्यान लग्नानंतर पूनमला वन विभागात वनरक्षक म्हणून २०१५ मध्ये नोकरी लागली होती. ती सध्या वडगाव जंगल वनपरिक्षेत्रातील येळाबारा येथे विशेष सेवा रक्षक म्हणून कार्यरत होती. पत्नीला नोकरी लागल्याने रणजितने नोकरी सोडून दिली आणि दोघेही जांब येथे राहू लागला. पत्नी नोकरी करणारी आणि रणजित बेरोजगार असा संसार सुरू होता. त्यातूनच रणजितचा पुरुषी अहंकार जागृत झाला. पूनमचा छळ सुरू झाला. तिला मारहाण केली जात होती. या जाचाला कंटाळूनच पूनमने यवतमाळ येथील मुलींच्या वसतिगृहात आश्रय घेतला होता. सोमवारी सकाळी रणजित मुलीच्या वसतिगृहात आला. त्याने पूनमला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून खरोली शिवारातील स्वत:च्या शेतात नेले. त्या ठिकाणी त्याने पूनमचा दगडाने ठेचून खून केला. या घटनेची माहिती होताच परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान रणजितचा चुलत भाऊ मनोज रमेश भाटी याने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रणजितला ताब्यात घेतले. दरम्यान पूनमचे वडील सुदर्शन धांदू रा. रुद्रापूर ता. बिलोली जि. नांदेड यांना या घटनेची माहिती मिळाली. ते हदगाव ठाण्यात जमादार म्हणून कार्यरत आहे. या खुनात भाटी कुटुंबातील इतरही काही जण सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र वृत्तलिहिस्तोवर पोलिसांनी धांदू यांची तक्रार नोंदवून घेतली नव्हती. तपास ठाणेदार महिपालसिंग चांदा यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक धनरे करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी) -तर अनर्थ टळला असता ४दरम्यान रणजितकडून पैशासाठी तिला नेहमीच त्रास दिला जात होता. अनेकदा तो मुलींच्या वसतिगृहात जाऊन पूनमला भेटण्याचा प्रयत्न करीत होता. याच जाचाला कंटाळून पूनमने १५ दिवसापूर्वी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पती-पत्नीच्या भांडणात पोलिसांनी नेहमीप्रमाणे तक्रार नोंदविण्याऐवजी समजूत काढून त्यांना परत पाठविले. त्याच वेळी पोलिसांनी रणजितविरुद्ध कारवाई केली असती तर आज ही घटना घडली नसती.