शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

येळाबाराच्या महिला वनरक्षकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

By admin | Updated: January 10, 2017 01:05 IST

महिला वनरक्षकाचा पतीनेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना शहरालगतच्या जांब परिसरातील

बेरोजगार पतीकडून छळ, वसतिगृहात आश्रय : मृतक जमादाराची मुलगी यवतमाळ : महिला वनरक्षकाचा पतीनेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना शहरालगतच्या जांब परिसरातील खरोली शिवारात सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. या घटनेने वन विभागासह शहरात एकच खळबळ उडाली. पूनम रणजित भाटी (२७) असे मृत वनरक्षकाचे नाव आहे. पूनमचा विवाह २००६ मध्ये जांब येथील रणजित नरेश भाटी (३०) याच्याशी झाला होता. त्यावेळी रणजित हा औरंगाबाद येथे खासगी कंपनीत नोकरीवर होता. दरम्यान लग्नानंतर पूनमला वन विभागात वनरक्षक म्हणून २०१५ मध्ये नोकरी लागली होती. ती सध्या वडगाव जंगल वनपरिक्षेत्रातील येळाबारा येथे विशेष सेवा रक्षक म्हणून कार्यरत होती. पत्नीला नोकरी लागल्याने रणजितने नोकरी सोडून दिली आणि दोघेही जांब येथे राहू लागला. पत्नी नोकरी करणारी आणि रणजित बेरोजगार असा संसार सुरू होता. त्यातूनच रणजितचा पुरुषी अहंकार जागृत झाला. पूनमचा छळ सुरू झाला. तिला मारहाण केली जात होती. या जाचाला कंटाळूनच पूनमने यवतमाळ येथील मुलींच्या वसतिगृहात आश्रय घेतला होता. सोमवारी सकाळी रणजित मुलीच्या वसतिगृहात आला. त्याने पूनमला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून खरोली शिवारातील स्वत:च्या शेतात नेले. त्या ठिकाणी त्याने पूनमचा दगडाने ठेचून खून केला. या घटनेची माहिती होताच परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान रणजितचा चुलत भाऊ मनोज रमेश भाटी याने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रणजितला ताब्यात घेतले. दरम्यान पूनमचे वडील सुदर्शन धांदू रा. रुद्रापूर ता. बिलोली जि. नांदेड यांना या घटनेची माहिती मिळाली. ते हदगाव ठाण्यात जमादार म्हणून कार्यरत आहे. या खुनात भाटी कुटुंबातील इतरही काही जण सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र वृत्तलिहिस्तोवर पोलिसांनी धांदू यांची तक्रार नोंदवून घेतली नव्हती. तपास ठाणेदार महिपालसिंग चांदा यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक धनरे करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी) -तर अनर्थ टळला असता ४दरम्यान रणजितकडून पैशासाठी तिला नेहमीच त्रास दिला जात होता. अनेकदा तो मुलींच्या वसतिगृहात जाऊन पूनमला भेटण्याचा प्रयत्न करीत होता. याच जाचाला कंटाळून पूनमने १५ दिवसापूर्वी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पती-पत्नीच्या भांडणात पोलिसांनी नेहमीप्रमाणे तक्रार नोंदविण्याऐवजी समजूत काढून त्यांना परत पाठविले. त्याच वेळी पोलिसांनी रणजितविरुद्ध कारवाई केली असती तर आज ही घटना घडली नसती.