शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पाणी पुरवठा योजनेची जॅकवेल इमारत कोसळली, पांढरकवडा नगर परिषद : ५० वर्षांपूर्वीची जुनी होती योजना, सणासुदीत उद्भवली पाणी समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:46 IST

रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे राजू केराम हे अस्थायी कर्मचारी पाणीपुरवठ्याचे विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले होते. विद्युत ...

रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे राजू केराम हे अस्थायी कर्मचारी पाणीपुरवठ्याचे विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले होते. विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी विद्युत मोटारीचे स्वीच सुरू करून बाजूला जात नाही तोच अचानक पत्त्याच्या बिल्डिंग प्रमाणे जॅकवेलची ही इमारत क्षणात कोसळली. सुदैवाने केराम हे दोन फूट अंतरावर दूर असल्यामुळे ते थोडक्यात बचावले. ही माहिती शहरात कर्णोपकर्णी पसरताच घटनास्थळावर प्रचंड गर्दी जमा झाली होती. नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. नगर परिषदेतर्फे शहराला खुनी नदीच्या पाण्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा योजना ही अतिशय जुनी आहे. १९७१ पासून ही योजना सुरू झाली. राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी या गावाजवळ ५० वर्षांपूर्वी १९७० मध्ये जॅकवेलचे काम करण्यात आले. जॅकवेलची इमारत ही अतिशय जीर्ण झाली होती. नगरपरिषदेने याकडे गांभीर्याने वेळीच लक्ष द्यायला पाहिजे होते. या ठिकाणीच पाण्याचे स्त्रोत असून खुनी नदीतून पाणी पुरवठा केला जातो. या ठिकाणावरून जॅकवेलद्वारे प्रथम शहरातील तीन पाण्याच्या टाक्या भरल्या जातात व तेथून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होतो. जॅकवेल इमारतीमध्ये ३० अश्वशक्तीचे दोन व २० अश्वशक्तीचे दोन असे चार मोटर पंप बसविण्यात आले होते. ५० वर्षांपूर्वीची ही इमारत पूर्णतः जीर्ण झाली होती. केव्हा कोसळेल याची शाश्वती नव्हती. अखेर रविवारी ही इमारत कोसळली. त्यामुळे शहरात नियमितपणे होणाऱ्या पाणी पुरवठ्याला बाधा येणार आहे.

बॉक्स : तात्पुरता पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न

ज्या ठिकाणावरून संपूर्ण पांढरकवडा शहराला नियमित पाणीपुरवठा होत होता त्या ठिकाणावरील जॅकवेलची इमारत कोसळल्यामुळे पाणी पुरवठ्याची समस्या उदभवणार आहे. ही समस्या नगरपरिषदेला तातडीने सोडवावी लागणार आहे. खुनी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यास तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषदेने सायखेडा सिंचन प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी नऊ किलोमीटर पाईपलाईन टाकली होती. त्यासाठी सायखेडा प्रकल्पात ३० अश्वशक्तीचे तीन मोटर पंप बसविण्यात आले होते. हे मोटर पंप आता तात्पुरते खुनी नदीवर बसवून शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला जोडण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या कामाला बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.