शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘अप-डाउन’ करणे अशक्य, तेच गाव म्हणा अवघड !

By admin | Updated: May 14, 2017 01:14 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचा हंगाम आला की ‘वाद’ नवा नसतो. पण यंदाच्या बदल्यांमध्ये कारण नसताना

बदल्यांसाठी गावांची अस्मिता पणाला : शिक्षकांच्या हिशेबाने गावकरी अचंब्यात लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचा हंगाम आला की ‘वाद’ नवा नसतो. पण यंदाच्या बदल्यांमध्ये कारण नसताना खेडेगावांची ‘ओळख’ पणाला लागली आहे. बदलीस इच्छूक बहुतांश शिक्षक आपले गाव ‘अवघड’च असल्याचा दावा करीत आहे. पण आपल्या गावापर्यंत रस्ता येतो, मग ते अवघड कसे? असा निरागस प्रश्न गावकऱ्यांना पडत आहे. शिक्षकांच्या बदल्या करताना यंदा संपूर्ण जिल्ह्यातील गावांची दोन तऱ्हेने विभागणी करण्यात येत आहे. अवघड क्षेत्र आणि सर्वसाधारण क्षेत्र. अवघड क्षेत्रात मोडणाऱ्या गावातील शिक्षकाची केवळ तीन वर्षांची सेवा झालेली असेल तरी तो बदलीस पात्र ठरणार आहे. तर सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षकाला १० वर्षांची सेवा झाल्याविना बदलीची संधी नाही. मुख्य म्हणजे, अवघड क्षेत्रातील गाव कसे ठरवावे, याचा निश्चित निकष शासनाने ठरवून दिलेला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतील ते गाव अवघड, अशी परिस्थिती आहे. त्याच वेळी बदलीसाठी अनेक वर्षांपासून वाट पाहात असलेल्या शिक्षकांची संख्या मात्र मोठी आहे. त्यामुळे आपल्या शाळेचे गाव ‘अवघड क्षेत्रात’ यावे यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे. वास्तविक, ज्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी दळणवळणाची सोय नाही, रस्ता नाही, परिवहन महामंडळाची बस जात नाही, शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे, अशा गावांचा समावेश अवघड क्षेत्रात होण्याची गरज आहे. परंतु, ज्या गावांचे अंतर तालुकास्थळापासून खूप जास्त आहे, अशीच गावे अवघड क्षेत्रात घेण्यासाठी शिक्षक आग्रही आहेत. कारण अशा गावांमध्ये शिक्षकांना दररोज ‘अप-डाउन’ करणे शक्य होत नाही. वास्तविक, ही गावे दूर असली तरी तेथे डांबरी रस्ता पोहोचलेला आहे, नियमित बस जाते. त्यामुळे तेथील सामान्य गावकरी मात्र आपल्या गावाला ‘सर्वसाधारण क्षेत्रा’ गाव मानतात. पण गावचे गुरुजी मात्र त्याच गावाला ‘अवघड’ ठरविण्याचा मागे लागले आहेत.