शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

‘अप-डाउन’ करणे अशक्य, तेच गाव म्हणा अवघड !

By admin | Updated: May 14, 2017 01:14 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचा हंगाम आला की ‘वाद’ नवा नसतो. पण यंदाच्या बदल्यांमध्ये कारण नसताना

बदल्यांसाठी गावांची अस्मिता पणाला : शिक्षकांच्या हिशेबाने गावकरी अचंब्यात लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचा हंगाम आला की ‘वाद’ नवा नसतो. पण यंदाच्या बदल्यांमध्ये कारण नसताना खेडेगावांची ‘ओळख’ पणाला लागली आहे. बदलीस इच्छूक बहुतांश शिक्षक आपले गाव ‘अवघड’च असल्याचा दावा करीत आहे. पण आपल्या गावापर्यंत रस्ता येतो, मग ते अवघड कसे? असा निरागस प्रश्न गावकऱ्यांना पडत आहे. शिक्षकांच्या बदल्या करताना यंदा संपूर्ण जिल्ह्यातील गावांची दोन तऱ्हेने विभागणी करण्यात येत आहे. अवघड क्षेत्र आणि सर्वसाधारण क्षेत्र. अवघड क्षेत्रात मोडणाऱ्या गावातील शिक्षकाची केवळ तीन वर्षांची सेवा झालेली असेल तरी तो बदलीस पात्र ठरणार आहे. तर सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षकाला १० वर्षांची सेवा झाल्याविना बदलीची संधी नाही. मुख्य म्हणजे, अवघड क्षेत्रातील गाव कसे ठरवावे, याचा निश्चित निकष शासनाने ठरवून दिलेला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतील ते गाव अवघड, अशी परिस्थिती आहे. त्याच वेळी बदलीसाठी अनेक वर्षांपासून वाट पाहात असलेल्या शिक्षकांची संख्या मात्र मोठी आहे. त्यामुळे आपल्या शाळेचे गाव ‘अवघड क्षेत्रात’ यावे यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे. वास्तविक, ज्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी दळणवळणाची सोय नाही, रस्ता नाही, परिवहन महामंडळाची बस जात नाही, शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे, अशा गावांचा समावेश अवघड क्षेत्रात होण्याची गरज आहे. परंतु, ज्या गावांचे अंतर तालुकास्थळापासून खूप जास्त आहे, अशीच गावे अवघड क्षेत्रात घेण्यासाठी शिक्षक आग्रही आहेत. कारण अशा गावांमध्ये शिक्षकांना दररोज ‘अप-डाउन’ करणे शक्य होत नाही. वास्तविक, ही गावे दूर असली तरी तेथे डांबरी रस्ता पोहोचलेला आहे, नियमित बस जाते. त्यामुळे तेथील सामान्य गावकरी मात्र आपल्या गावाला ‘सर्वसाधारण क्षेत्रा’ गाव मानतात. पण गावचे गुरुजी मात्र त्याच गावाला ‘अवघड’ ठरविण्याचा मागे लागले आहेत.