शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

‘अप-डाउन’ करणे अशक्य, तेच गाव म्हणा अवघड !

By admin | Updated: May 14, 2017 01:14 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचा हंगाम आला की ‘वाद’ नवा नसतो. पण यंदाच्या बदल्यांमध्ये कारण नसताना

बदल्यांसाठी गावांची अस्मिता पणाला : शिक्षकांच्या हिशेबाने गावकरी अचंब्यात लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचा हंगाम आला की ‘वाद’ नवा नसतो. पण यंदाच्या बदल्यांमध्ये कारण नसताना खेडेगावांची ‘ओळख’ पणाला लागली आहे. बदलीस इच्छूक बहुतांश शिक्षक आपले गाव ‘अवघड’च असल्याचा दावा करीत आहे. पण आपल्या गावापर्यंत रस्ता येतो, मग ते अवघड कसे? असा निरागस प्रश्न गावकऱ्यांना पडत आहे. शिक्षकांच्या बदल्या करताना यंदा संपूर्ण जिल्ह्यातील गावांची दोन तऱ्हेने विभागणी करण्यात येत आहे. अवघड क्षेत्र आणि सर्वसाधारण क्षेत्र. अवघड क्षेत्रात मोडणाऱ्या गावातील शिक्षकाची केवळ तीन वर्षांची सेवा झालेली असेल तरी तो बदलीस पात्र ठरणार आहे. तर सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षकाला १० वर्षांची सेवा झाल्याविना बदलीची संधी नाही. मुख्य म्हणजे, अवघड क्षेत्रातील गाव कसे ठरवावे, याचा निश्चित निकष शासनाने ठरवून दिलेला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतील ते गाव अवघड, अशी परिस्थिती आहे. त्याच वेळी बदलीसाठी अनेक वर्षांपासून वाट पाहात असलेल्या शिक्षकांची संख्या मात्र मोठी आहे. त्यामुळे आपल्या शाळेचे गाव ‘अवघड क्षेत्रात’ यावे यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे. वास्तविक, ज्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी दळणवळणाची सोय नाही, रस्ता नाही, परिवहन महामंडळाची बस जात नाही, शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे, अशा गावांचा समावेश अवघड क्षेत्रात होण्याची गरज आहे. परंतु, ज्या गावांचे अंतर तालुकास्थळापासून खूप जास्त आहे, अशीच गावे अवघड क्षेत्रात घेण्यासाठी शिक्षक आग्रही आहेत. कारण अशा गावांमध्ये शिक्षकांना दररोज ‘अप-डाउन’ करणे शक्य होत नाही. वास्तविक, ही गावे दूर असली तरी तेथे डांबरी रस्ता पोहोचलेला आहे, नियमित बस जाते. त्यामुळे तेथील सामान्य गावकरी मात्र आपल्या गावाला ‘सर्वसाधारण क्षेत्रा’ गाव मानतात. पण गावचे गुरुजी मात्र त्याच गावाला ‘अवघड’ ठरविण्याचा मागे लागले आहेत.