शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

यवतमाळात जगणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:00 IST

प्रचंड उन्हाच्या झळा, तीव्र पाणीटंचाई सोसणाऱ्या यवतमाळकरांना पावसाळाही प्रचंड तापदायक ठरणार आहे. विकास कामांच्या नावाखाली शहर जागोजागी खोदण्यात आले आहे. हे खड्डे अजूनही कायम आहे. पाऊस बरसल्यानंतर या ठिकाणावरून वाहने धावताना असंख्य अपघात घडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसावधान : जलस्रोत दूषित, रस्त्यांवरील खोदकामे, बेसुमार वाहनांनी वाढविले प्रदूषण

जागतिक पर्यावरण दिनरूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रचंड उन्हाच्या झळा, तीव्र पाणीटंचाई सोसणाऱ्या यवतमाळकरांना पावसाळाही प्रचंड तापदायक ठरणार आहे. विकास कामांच्या नावाखाली शहर जागोजागी खोदण्यात आले आहे. हे खड्डे अजूनही कायम आहे. पाऊस बरसल्यानंतर या ठिकाणावरून वाहने धावताना असंख्य अपघात घडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची दाट शक्यता आहे. भरीसभर म्हणजे लोकसंख्येच्या दुपटीहून वाहनांची संख्या झाल्याने वायू प्रदूषणही वाढले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे यवतमाळात जगणे कठीण झाल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहे.सांडपाणी वाहून नेणाºया नाल्या जागोजागी तुंबल्या आहेत. शहरातील मोठे नाले पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात नाल्यांच्या स्वच्छतेची निविदा काढण्यात आल्या नाही. आचारसंहितेमुळे ही निविदा थांबली असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.शहराच्या कामकाजाबाबत नगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे. यात पुन्हा आचारसंहितेमुळे भर पडली. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा आढावा घेतला. मात्र उपाययोजना सुरू झालेल्या नाहीत.अखेर नगरपरिषदेला जागयवतमाळ शहरामध्ये विकास कामे करताना वृक्ष लागवड करण्यासाठी नगरपरिषदेने २० हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे.ही वृक्ष लागवड करताना शहरातील ३०० ओपन स्पेसमध्ये आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली जाणार त्यासाठी ४० ते ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.पावसाळापूर्व सफाईचा विसरशहरातील खोलगट वसाहतींमध्ये दरवर्षी पाणी साचून झोपडपट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी नाल्याचा संपूर्ण प्रवाह वळविण्यात आला आहे. याच सोबत नाल्यांची स्वच्छताही पावसापूर्वी करणे अपेक्षित होते. मात्र निविदा उघडल्याच गेल्या नाही. या निविदा देण्यापूर्वी शहरात मोठा पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात खोलगट वसाहतीमध्ये पाणी शिरुन नुकसान होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षांचे संपूर्ण अधिकार गोठविल्यामुळे प्रशासन काय उपाययोजना करते, याची माहिती नगराध्यक्षांना मिळत नाही, यातून हा गोंधळ उडाला आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण