शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

यवतमाळात जगणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:00 IST

प्रचंड उन्हाच्या झळा, तीव्र पाणीटंचाई सोसणाऱ्या यवतमाळकरांना पावसाळाही प्रचंड तापदायक ठरणार आहे. विकास कामांच्या नावाखाली शहर जागोजागी खोदण्यात आले आहे. हे खड्डे अजूनही कायम आहे. पाऊस बरसल्यानंतर या ठिकाणावरून वाहने धावताना असंख्य अपघात घडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसावधान : जलस्रोत दूषित, रस्त्यांवरील खोदकामे, बेसुमार वाहनांनी वाढविले प्रदूषण

जागतिक पर्यावरण दिनरूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रचंड उन्हाच्या झळा, तीव्र पाणीटंचाई सोसणाऱ्या यवतमाळकरांना पावसाळाही प्रचंड तापदायक ठरणार आहे. विकास कामांच्या नावाखाली शहर जागोजागी खोदण्यात आले आहे. हे खड्डे अजूनही कायम आहे. पाऊस बरसल्यानंतर या ठिकाणावरून वाहने धावताना असंख्य अपघात घडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची दाट शक्यता आहे. भरीसभर म्हणजे लोकसंख्येच्या दुपटीहून वाहनांची संख्या झाल्याने वायू प्रदूषणही वाढले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे यवतमाळात जगणे कठीण झाल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहे.सांडपाणी वाहून नेणाºया नाल्या जागोजागी तुंबल्या आहेत. शहरातील मोठे नाले पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात नाल्यांच्या स्वच्छतेची निविदा काढण्यात आल्या नाही. आचारसंहितेमुळे ही निविदा थांबली असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.शहराच्या कामकाजाबाबत नगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे. यात पुन्हा आचारसंहितेमुळे भर पडली. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा आढावा घेतला. मात्र उपाययोजना सुरू झालेल्या नाहीत.अखेर नगरपरिषदेला जागयवतमाळ शहरामध्ये विकास कामे करताना वृक्ष लागवड करण्यासाठी नगरपरिषदेने २० हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे.ही वृक्ष लागवड करताना शहरातील ३०० ओपन स्पेसमध्ये आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली जाणार त्यासाठी ४० ते ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.पावसाळापूर्व सफाईचा विसरशहरातील खोलगट वसाहतींमध्ये दरवर्षी पाणी साचून झोपडपट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी नाल्याचा संपूर्ण प्रवाह वळविण्यात आला आहे. याच सोबत नाल्यांची स्वच्छताही पावसापूर्वी करणे अपेक्षित होते. मात्र निविदा उघडल्याच गेल्या नाही. या निविदा देण्यापूर्वी शहरात मोठा पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात खोलगट वसाहतीमध्ये पाणी शिरुन नुकसान होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षांचे संपूर्ण अधिकार गोठविल्यामुळे प्रशासन काय उपाययोजना करते, याची माहिती नगराध्यक्षांना मिळत नाही, यातून हा गोंधळ उडाला आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण