शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

मारेगावातील विलगीकरण कक्ष पडला ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

राज्यात कोरोना संचारबंदीत बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना गावी जाता यावे, यासाठी संचारबंदीत थोडी शिथिलता मिळताच, अनेक नागरिक परराज्यातून व पुणे, मुंबई येथून आपल्या गावाकडे येत आहेत. यात काही परवानगी घेऊन तर काही असेच येत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची उदासीनता : सर्वांनाच केले जातेयं होम क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची दहशत आहे. परराज्यातून अथवा पुणे, मुंबई येथून कोणी गावात आले, तर त्याला गावात घ्यायला गावकरी विरोध करतात. आरोग्य विभागाकडे याला विलगिकरण कक्षात टाकण्याची मागणी करतात. परंतु जिल्हा परिषद शाळेत क्वांरटाईन केलेल्या गोंडबुरांडा येथील युवकाने आत्महत्या केल्यानंतर आरोग्य विभाग बाहेरून आलेल्या व्यक्तींना फक्त होमक्वांरटाईन करीत असल्याने विलगिकरण कक्ष ओस पडले आहेत.राज्यात कोरोना संचारबंदीत बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना गावी जाता यावे, यासाठी संचारबंदीत थोडी शिथिलता मिळताच, अनेक नागरिक परराज्यातून व पुणे, मुंबई येथून आपल्या गावाकडे येत आहेत. यात काही परवानगी घेऊन तर काही असेच येत आहे. तालुका प्रासशानाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत तालुक्यात मुंबई येथून ३२, पुणे येथून ८४, तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून ३११ नागरिक तालुक्यात आले. यासोबतच आंध्रप्रदेशातून सहा, पश्चिम बंगालमधून दोन, राजस्थानातून आठ, मध्यप्रदेशातून १०, तेलंगाणातून २४, गुजरातमधून सात, कर्नाटक तीन, उत्तरप्रदेश दोन, बिहार दोन, छत्तीसगढमधून दोन, असे एकूण ४९३ नागरिक संचारबंदीकाळात तालुक्यात आल्याची नोंद आहे.अजुनही नागरिकांचे येणे सुरूच असल्याने ही आकडेवारी आणखी वाढणार आहे. मोठ्या प्रमाणात बाहेरून नागरिक येत असल्याने कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे बाहेरून गावात कोणी दाखल झाले की नागरिक प्रशासनाला तात्काळ याबाबत माहिती देत आहेत. या सर्वांना विलगिकरण कक्षातच ठेवण्याची मागणी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या