शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक गुन्हे शाखेकडे दोन डझन गुन्ह्यांचा तपास

By admin | Updated: July 30, 2016 00:43 IST

जिल्ह्यातील सर्वात महत्वाची ब्रँच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेकडे दोन डझन गुन्हे तपासाला आहेत.

अधिकाऱ्यांची वाणवा : आर्थिक शाखेकडे सर्वाधिक आठ गुन्हे यवतमाळ : जिल्ह्यातील सर्वात महत्वाची ब्रँच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेकडे दोन डझन गुन्हे तपासाला आहेत. परंतु सध्या या शाखेकडे तपासासाठी पुरेसे अधिकारी नसल्याचे सांगितले जाते. स्थानिक गुन्हे शाखेची धुरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या खांद्यावर आहे. यांच्या दिमतीला पोलीस निरीक्षक लष्करे, सहायक निरीक्षक पतिंगे, फौजदार मनवर यांची फौज आहे. परंतु गंभीर गुन्ह्यांच्या तपासाची व्याप्ती लक्षात घेता अधिकाऱ्यांची ही फौज कमी पडत आहे. कर्मचाऱ्यांचा आकडा मोठा दिसत असला तरी त्यातील अनेक कर्मचारी हे टेबलवरील कारकुनी कामातच व्यस्त असतात. स्थानिक गुन्हे शाखेकडे काही महिन्यांपूर्वी सुमारे ९० ते ९५ गुन्ह्यांचा तपास होता. तपासाचा वेग वाढल्याने हे गुन्हे कमी झाले आहेत. तरीही आजच्या घडीला एलसीबीकडे २४ गुन्हे तपासाला आहेत. त्यातील सर्वाधिक आठ गुन्हे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आहे. उर्वरित १६ गुन्ह्यांमध्ये खून, फसवणूक, आयटी अ‍ॅक्ट, अफरातफर या सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यातील धामणगाव रोड स्थित भरतीया यांच्याकडे झालेली लाखो रुपयांची चोरी आणि महागाव तालुक्यातील साखर घोटाळा हे पोलिसांसाठी आव्हानात्मक गुन्हे ठरले आहेत. महागावातील घोटाळ्यात महसूल व पुरवठा विभागाच्या यंत्रणेचा संबंध येत असल्याने पूर्वपरवानगी घेऊनच तपास करावा लागत असल्याचे सांगितले जाते. सुशिक्षितांना लालसा भोवली ग्रामीण अशिक्षित जनता आमिषाला बळी पडून फसविली जाणे समजण्यासारखे आहे. परंतु शहरातील उच्चभ्रू आणि सुशिक्षित नागरिकसुद्धा लालसेला बळी पडून गंडविले जात असल्याची काही प्रकरणे पुढे आली आहे. जादा व्याजदर, दुप्पट मोबदला अशा चक्रव्युहात ही प्रतिष्ठीत मंडळी अडकल्याने फसविली गेली आहे. बँका, पतसंस्थांनी फसविल्याची अनेक प्रकरणे आहेत. वित्तीय संस्थांकडून व्यवहारात फसवणूक झाल्याचे आठ गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासाला आहेत. यातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेतील ५२ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा नुकताच सीआयडीला वर्ग झाला. जागृती अ‍ॅग्रो फुडस् अ‍ॅन्ड इन्फ्रा या कंपनीने शेतकरी गुंतवणूकदारांना पाच कोटीने फसविले आहे. याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) जागृती अ‍ॅग्रो फुडस्ची संचालिका न्यायालयीन कोठडीत जागृती अ‍ॅग्रो फुडस्ने जिल्ह्यात पाच कोटी रुपयांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. शेतीपूरक व्यवसायात ७० महिन्यात दहापट मोबदल्याचे आमिष देऊन ही फसवणूक झाली आहे. या प्रकरणात नऊ आरोपी असून जाई राज गायकवाड या प्रमुख संचालिकेला भंडारा जिल्ह्याच्या लाखणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. शुक्रवारी तिची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. तिला ताब्यात घेण्यासाठी अमरावती, बुलडाणा, सोलापूर, चंद्रपूर पोलिसही प्रयत्नरत असल्याचे सांगण्यात आले.