शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

अवैध खरेदीचा एपीएमसीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 22:01 IST

वणी शहरातील विविध भागात असलेल्या अवैध धान्य खरेदी केंद्रांमुळे वणी बाजार समितीला चांगलाच फटका बसत आहे. शुक्रवारी बाजार समितीच्या पथकाने अशा तीन केंद्रावर धाडी टाकल्या. तत्पूर्वी संभाजी ब्रिगेडनेदेखिल बुधवारी नांदेपेरा मार्गावर सुरू असलेल्या एका केंद्रावर धाड टाकून पोलखोल केली.

ठळक मुद्देधाडसत्राने धान्य व्यापारी हादरले : वणी शहरात १५ पेक्षा अधिक अवैध केंद्रे

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी शहरातील विविध भागात असलेल्या अवैध धान्य खरेदी केंद्रांमुळे वणी बाजार समितीला चांगलाच फटका बसत आहे. शुक्रवारी बाजार समितीच्या पथकाने अशा तीन केंद्रावर धाडी टाकल्या. तत्पूर्वी संभाजी ब्रिगेडनेदेखिल बुधवारी नांदेपेरा मार्गावर सुरू असलेल्या एका केंद्रावर धाड टाकून पोलखोल केली.वणी तालुक्यात सोयाबीनची कापणी झाली असून हे सोयाबीन विक्रीसाठी वणी येथे आणले जात आहे. या शेतकऱ्यांनी धान्य खासगी व्यापाऱ्यांनाच विकावे, यासाठी काही दलाल सक्रिय झाले असून शेतकºयांना भुलथापा देऊन हे दलाल शेतकऱ्यांचा माल खासगी व्यापाऱ्यांच्या दारात नेत आहेत. रोखेत चुकारा मिळत असल्याने शेतकरीदेखिल खासगी व्यापाऱ्यांकडे धान्यविक्रीसाठी वळत असल्याचे चित्र आहे. मात्र हा व्यवहार गैरकायदेशीर आहे. शहरात अनेक व्यापाऱ्यांनी धान्य खरेदीसाठी दुकाने उघडली आहेत. नियमानुसार परवानाधारक व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या यार्डातच धान्य खरेदी करावी लागते. परंतु बाजार समितीचा सेस चुकविण्यासाठी या व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या यार्डाबाहेर परस्पर धान्य खरेदीचा सपाटा सुरू केला. यामुळे केवळ बाजार समितीलाच नाही, तर शासनाच्या तिजोरीलादेखिल फटका बसत आहे. बाजार समितीच्या यार्डात धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बाजार समितीचा सेस चुकता करावा लागतो. सोबतच शासनाची बाजार फि अदा करावी लागते. मात्र अनेक व्यापारी हे टाळण्यासाठी स्वतंत्र दुकानदारी उघडून धान्य खरेदी करीत आहे. वणी शहरात १५ पेक्षा अधिक असे खरेदीदार असल्याची माहिती आहे. बाजार समितीने कारवाईचा धडाका असाच सुरू ठेवला, तर त्याचा फायदा बाजार समितीला होणार आहे. बाजार समिती कारवाई करीत असली तरी त्यात राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे.बाजार समितीची तीन व्यापाऱ्यांना नोटीस४वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पथकाने वणी शहरातील तीन प्रतिष्ठानांवर धाडी टाकून अवैधरित्या खरेदी केलेले ६० लाख रूपये किंमतीचे सोयाबीन जप्त केले होते. या तिनही व्यापाऱ्यांना बाजार समितीने शनिवारी नोटीस दिली. व्यापाऱ्यांनी बुडविलेला सेस, बाजार फी व त्यावरील दंडाची रक्कम २४ तासाच्या आत बाजार समितीकडे जमा करावी, अन्यथा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे. यातून दंड, सेस व बाजार फीसाठी बाजार समितीला व्यापाºयांकडून दोन लाख ४९ हजार २६० रूपये दंडापोटी मिळणार आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड