शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आरटीओत खासगी कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

आरटीओ कार्यालयात सर्वाधिक वर्दळ असते. नव्या वाहनांची नोंदणी, जुन्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट, वाहनांचे ट्रान्सपर, शिकाऊ परवाने, नियमित परवाने अशा एक ना अनेक स्वरूपाची कामे येथून केली जातात. या ठिकाणी कर्मचारी वर्गही उपलब्ध आहे. आता तर मोटर वाहन निरीक्षकांची मोठी फौज मिळाली आहे. एकाच वेळी २१ अधिकारी दिमतीला आल्याने कामाचा भार कमी झाला आहे.

ठळक मुद्देकेवळ दोघांंना मंजुरी : नियमित कर्मचाऱ्यांनी ठेवले खासगी नोकर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटराज बºयाचअंशी नियंत्रणात आला आहे. ऑनलाईन प्रक्रिया असल्याने हा बदल दिसत आहे. मात्र आता येथील पूर्णवेळ कर्मचाºयांनी आपल्या हाताखाली खासगी नोकर ठेवले आहे. त्यांच्या माध्यमातूनच अतिशय जोखमीची कामे करवून घेतली जात आहे. यातूनच आरटीओ कार्यालयात काही दिवसांपूर्वी मारहाणीचा प्रकारही घडला होता. त्यानंतरही याबाबत वरिष्ठांची चुप्पी असल्याचे दिसून येते.आरटीओ कार्यालयात सर्वाधिक वर्दळ असते. नव्या वाहनांची नोंदणी, जुन्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट, वाहनांचे ट्रान्सपर, शिकाऊ परवाने, नियमित परवाने अशा एक ना अनेक स्वरूपाची कामे येथून केली जातात. या ठिकाणी कर्मचारी वर्गही उपलब्ध आहे. आता तर मोटर वाहन निरीक्षकांची मोठी फौज मिळाली आहे. एकाच वेळी २१ अधिकारी दिमतीला आल्याने कामाचा भार कमी झाला आहे. आरटीओतील बहुतांश कामे आॅनलाईन पद्धतीने होत असल्याने पूर्वीपेक्षा कामाचा भार तुलनेने कमी झाला आहे. त्यानंतरही येथील कर्मचारी स्वत:च्या पदरी खासगी नोकर बाळगून आहे. पूर्वी एजंटांचा धुमाकूळ आरटीओ कार्यालयात होता. त्याची जागा खासगी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.परिवहन आयुक्तांकडून केवळ दोन खासगी कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर नियुक्तीची परवानगी मिळाली आहे. मात्र या व्यतिरिक्तही दिनेश, नीलेश (आस्थापना), राकेश (मॅडमकडे), बबलू, नितीन (दोघेही तळ मजल्यावर), राजू (शिकाऊ परवाना), गौतम (ट्रायल नोंदणी कक्ष), रिंकू (ट्रॅकवर), बलदेव (कॅम्प) हे खासगी कर्मचारी कार्यरत आहेत. यांचा थेट कामात हस्तक्षेप आहे. अनेक कर्मचाऱ्यांकडे अधिकारी व कर्मचाºयांच्या आॅनलाईन पासवर्ड व डीआयसी आहेत. त्यामुळे महत्वपूर्ण कागदपत्रांना ऑनलाईन मान्यता देण्याचे काम येथून केले जाते.खासगी कर्मचाऱ्यांना वरकमाईची खुली सुट आहे का ?पदरी खासगी कर्मचारी ठेऊन एक पुरक यंत्रणाच आरटीओ कार्यालयात उभी केली आहे. कर्मचारी पदरी कार्यरत असलेल्या खासगी कर्मचाºयांना खरोखरच वेतन देतात की वरकमाईची त्यांना खुली सूट दिली आहे, हाही प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे. अशा प्रकारे खासगी कर्मचाºयांना ठेऊन कारभार चालविण्याचा नैतिक अधिकार आहे का हाही प्रश्न येथे उपस्थित होत आहे. आरटीओतील खासगी कर्मचाºयांना पायबंद घालण्यासाठी स्थानिक पातळीवर कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. दोन अधिकृत खासगी कर्मचारी असताना इतरांनासुद्धा कायम ठेवण्यामागे नेमका कोणता उद्देश आहे, हे अद्याप उलगडलेले नाही.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस