शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आरटीओत खासगी कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

आरटीओ कार्यालयात सर्वाधिक वर्दळ असते. नव्या वाहनांची नोंदणी, जुन्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट, वाहनांचे ट्रान्सपर, शिकाऊ परवाने, नियमित परवाने अशा एक ना अनेक स्वरूपाची कामे येथून केली जातात. या ठिकाणी कर्मचारी वर्गही उपलब्ध आहे. आता तर मोटर वाहन निरीक्षकांची मोठी फौज मिळाली आहे. एकाच वेळी २१ अधिकारी दिमतीला आल्याने कामाचा भार कमी झाला आहे.

ठळक मुद्देकेवळ दोघांंना मंजुरी : नियमित कर्मचाऱ्यांनी ठेवले खासगी नोकर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटराज बºयाचअंशी नियंत्रणात आला आहे. ऑनलाईन प्रक्रिया असल्याने हा बदल दिसत आहे. मात्र आता येथील पूर्णवेळ कर्मचाºयांनी आपल्या हाताखाली खासगी नोकर ठेवले आहे. त्यांच्या माध्यमातूनच अतिशय जोखमीची कामे करवून घेतली जात आहे. यातूनच आरटीओ कार्यालयात काही दिवसांपूर्वी मारहाणीचा प्रकारही घडला होता. त्यानंतरही याबाबत वरिष्ठांची चुप्पी असल्याचे दिसून येते.आरटीओ कार्यालयात सर्वाधिक वर्दळ असते. नव्या वाहनांची नोंदणी, जुन्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट, वाहनांचे ट्रान्सपर, शिकाऊ परवाने, नियमित परवाने अशा एक ना अनेक स्वरूपाची कामे येथून केली जातात. या ठिकाणी कर्मचारी वर्गही उपलब्ध आहे. आता तर मोटर वाहन निरीक्षकांची मोठी फौज मिळाली आहे. एकाच वेळी २१ अधिकारी दिमतीला आल्याने कामाचा भार कमी झाला आहे. आरटीओतील बहुतांश कामे आॅनलाईन पद्धतीने होत असल्याने पूर्वीपेक्षा कामाचा भार तुलनेने कमी झाला आहे. त्यानंतरही येथील कर्मचारी स्वत:च्या पदरी खासगी नोकर बाळगून आहे. पूर्वी एजंटांचा धुमाकूळ आरटीओ कार्यालयात होता. त्याची जागा खासगी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.परिवहन आयुक्तांकडून केवळ दोन खासगी कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर नियुक्तीची परवानगी मिळाली आहे. मात्र या व्यतिरिक्तही दिनेश, नीलेश (आस्थापना), राकेश (मॅडमकडे), बबलू, नितीन (दोघेही तळ मजल्यावर), राजू (शिकाऊ परवाना), गौतम (ट्रायल नोंदणी कक्ष), रिंकू (ट्रॅकवर), बलदेव (कॅम्प) हे खासगी कर्मचारी कार्यरत आहेत. यांचा थेट कामात हस्तक्षेप आहे. अनेक कर्मचाऱ्यांकडे अधिकारी व कर्मचाºयांच्या आॅनलाईन पासवर्ड व डीआयसी आहेत. त्यामुळे महत्वपूर्ण कागदपत्रांना ऑनलाईन मान्यता देण्याचे काम येथून केले जाते.खासगी कर्मचाऱ्यांना वरकमाईची खुली सुट आहे का ?पदरी खासगी कर्मचारी ठेऊन एक पुरक यंत्रणाच आरटीओ कार्यालयात उभी केली आहे. कर्मचारी पदरी कार्यरत असलेल्या खासगी कर्मचाºयांना खरोखरच वेतन देतात की वरकमाईची त्यांना खुली सूट दिली आहे, हाही प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे. अशा प्रकारे खासगी कर्मचाºयांना ठेऊन कारभार चालविण्याचा नैतिक अधिकार आहे का हाही प्रश्न येथे उपस्थित होत आहे. आरटीओतील खासगी कर्मचाºयांना पायबंद घालण्यासाठी स्थानिक पातळीवर कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. दोन अधिकृत खासगी कर्मचारी असताना इतरांनासुद्धा कायम ठेवण्यामागे नेमका कोणता उद्देश आहे, हे अद्याप उलगडलेले नाही.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस