शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

तत्काळचा एक्स्ट्रा ‘शॉक’

By admin | Updated: October 28, 2014 23:04 IST

अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाने अनुदानावर सिंचन विहिरी दिल्या. मात्र विजेची सोय करून दिली नाही. यासाठी त्यांना गेली चार वर्षांपासून विद्युत कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे.

घारफळ : अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाने अनुदानावर सिंचन विहिरी दिल्या. मात्र विजेची सोय करून दिली नाही. यासाठी त्यांना गेली चार वर्षांपासून विद्युत कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. पण, तत्काळ वीज पाहिजे असेल तर अतिरिक्त रक्कम भरावी लागत आहे. वीज खांब आणि तारांसाठी लागणारी ही रक्कम जुळविता जुळविता शेतकऱ्यांना नाकीनऊ येत आहे. पण विद्युत कंपनीच्या धोरणापुढे त्यांनी हात टेकले आहे.परिसरातील सारफळी, सारफळ, सिंदी, एरणगाव, पाचखेड, गवंडी खर्डा, गोंधळी, वीरखेड, वाटखेड आदी गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना जवाहर विहीर आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचा लाभ देण्यात आला. विहिरीसाठी प्रत्यक्ष मिळालेले अनुदान कमी पडल्याने काही शेतकऱ्यांनी स्वत:जवळची रक्कम बांधकामासाठी लावली. एवढा सारा आटापिटा केल्यानंतरही त्यांना विजेसाठी गेली चार वर्षांपासून येरझारा माराव्या लागत आहेत. एकीकडे विद्युत कंपनीने वीज पुरवठ्यासाठीची रककम घेवून घेतली. परंतु वीज पुरवठा करण्यात आला नाही. आता मात्र तत्काळ वीज पाहिजे असेल तर अतिरिक्त रक्कम भरावी लागेल, असे सांगितले जाते. वीज पुरवठ्याच्या खांबांपासून शेतातील विहिरीपर्यंत वीज जोडणी हवी असल्यास तेवढ्या अंतरासाठी लागणाऱ्या खांबाची आणि तारांची रक्कम भरावी लागेल, असा सल्ला दिला जातो. एका खांबासाठी जवळपास १५ हजार रुपये दर ठेवण्यात आला आहे. एखाद्या शेतकऱ्याला तीन खांबाची गरज पडत असेल तर ४५ हजार रुपयांचा आगावू भुर्दंड सोसावा लागणार आहे. विहिरीचे काम पूर्ण करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी काही रक्कम उसनवार आणि कर्जावू घेतली आहे. आता विज पुरवठ्यासाठी लागणारी रक्कम जुळविणे त्यांना शक्य नाही. सुरुवातीला विद्युत कंपनीच्या बाभूळगाव कार्यालयाने विविध कारणे सांगत चार वर्षेपर्यंत वेळ मारून नेली. तांत्रिक अडचणी पुढे केल्या गेल्या. रोहित्रावर विजेचा अतिरिक्त भार पडतो, साहित्य उपलब्ध नाही अशा कारणांचा पाढा वाचला गेला. आता मात्र अतिरिक्त रक्कम भरल्यास वीज पुरवठा केला जाईल, असे सांगितले जाते. यावरून विद्युत कंपनीचे दुटप्पी धोरण लक्षात येते. यात मात्र विहीर पूर्ण करून सिंचन करण्याची आश ठेवून असलेल्या शेतकऱ्याला प्रतीक्षेतच राहावे लागत आहे. (वार्ताहर)