शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

तत्काळचा एक्स्ट्रा ‘शॉक’

By admin | Updated: October 28, 2014 23:04 IST

अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाने अनुदानावर सिंचन विहिरी दिल्या. मात्र विजेची सोय करून दिली नाही. यासाठी त्यांना गेली चार वर्षांपासून विद्युत कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे.

घारफळ : अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाने अनुदानावर सिंचन विहिरी दिल्या. मात्र विजेची सोय करून दिली नाही. यासाठी त्यांना गेली चार वर्षांपासून विद्युत कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. पण, तत्काळ वीज पाहिजे असेल तर अतिरिक्त रक्कम भरावी लागत आहे. वीज खांब आणि तारांसाठी लागणारी ही रक्कम जुळविता जुळविता शेतकऱ्यांना नाकीनऊ येत आहे. पण विद्युत कंपनीच्या धोरणापुढे त्यांनी हात टेकले आहे.परिसरातील सारफळी, सारफळ, सिंदी, एरणगाव, पाचखेड, गवंडी खर्डा, गोंधळी, वीरखेड, वाटखेड आदी गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना जवाहर विहीर आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचा लाभ देण्यात आला. विहिरीसाठी प्रत्यक्ष मिळालेले अनुदान कमी पडल्याने काही शेतकऱ्यांनी स्वत:जवळची रक्कम बांधकामासाठी लावली. एवढा सारा आटापिटा केल्यानंतरही त्यांना विजेसाठी गेली चार वर्षांपासून येरझारा माराव्या लागत आहेत. एकीकडे विद्युत कंपनीने वीज पुरवठ्यासाठीची रककम घेवून घेतली. परंतु वीज पुरवठा करण्यात आला नाही. आता मात्र तत्काळ वीज पाहिजे असेल तर अतिरिक्त रक्कम भरावी लागेल, असे सांगितले जाते. वीज पुरवठ्याच्या खांबांपासून शेतातील विहिरीपर्यंत वीज जोडणी हवी असल्यास तेवढ्या अंतरासाठी लागणाऱ्या खांबाची आणि तारांची रक्कम भरावी लागेल, असा सल्ला दिला जातो. एका खांबासाठी जवळपास १५ हजार रुपये दर ठेवण्यात आला आहे. एखाद्या शेतकऱ्याला तीन खांबाची गरज पडत असेल तर ४५ हजार रुपयांचा आगावू भुर्दंड सोसावा लागणार आहे. विहिरीचे काम पूर्ण करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी काही रक्कम उसनवार आणि कर्जावू घेतली आहे. आता विज पुरवठ्यासाठी लागणारी रक्कम जुळविणे त्यांना शक्य नाही. सुरुवातीला विद्युत कंपनीच्या बाभूळगाव कार्यालयाने विविध कारणे सांगत चार वर्षेपर्यंत वेळ मारून नेली. तांत्रिक अडचणी पुढे केल्या गेल्या. रोहित्रावर विजेचा अतिरिक्त भार पडतो, साहित्य उपलब्ध नाही अशा कारणांचा पाढा वाचला गेला. आता मात्र अतिरिक्त रक्कम भरल्यास वीज पुरवठा केला जाईल, असे सांगितले जाते. यावरून विद्युत कंपनीचे दुटप्पी धोरण लक्षात येते. यात मात्र विहीर पूर्ण करून सिंचन करण्याची आश ठेवून असलेल्या शेतकऱ्याला प्रतीक्षेतच राहावे लागत आहे. (वार्ताहर)